*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१६७४
महाराणी काशीबाई पुण्यतिथी
शिवरायांचा सातव्या पत्नी काशिबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह काशीबाई जाधव यांच्याशी शके १५७९ वैशाख शुद्ध पंचमीला ८/०४/१६५७ रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांच्या उपस्थितीत पार पडला .काशीबाई साहेबांचा जन्म सन १६४८ मध्ये जाधव राव घराण्यात झाला. काशीबाईसाहेब संताजी जाधव यांच्या कन्या होत. संताजी जाधव म्हणजे जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय पुत्र, संताजी जाधवराव यांच्या कन्या म्हणजे काशीबाईसाहेब.
जिजाऊंचे वडील लखुजी जाधव राव व बंधू अचलोजी जाधव राव या दोघांनी जाधवराव घराण्याला १७ व्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुख इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता, पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखुजी जाधव राव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले .या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी जाधव राव यांचे पालन पोषण जिजाऊसाहेबांनीच रायगडावर केले. संताजी राजगडावरच राहिले होते. त्यामुळे त्यांच्या कन्या काशीबाई साहेबांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊसाहेबांनी जाधव भोसले संबंध परत एकदा जवळ केले काशीबाईसाहेब यांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये पाचाड येथे झाला..काशिबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या ऊत्तरेस आहे.
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१६७५
विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमधे जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन १६७३ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी फोंड्यास वेढा घातला परंतु विजापूरचे सैन्य पन्हाळ गडावर चाल करून आल्याने राजांना फोंड्याचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच करावे लागले. १६७४ सालच्या सप्टेंबर महिन्यात महाराजांच्या एका सरदाराने पुन्हा वेढा घातला पण तिथल्या शिबंदीचा किल्लेदार महमदखान ह्याने किल्ला बरेच दिवस लढवल्याने महाराजांच्या सरदाराला वेढा उठवावा लागला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख वेंगुर्ला येथील इंग्रजी वखारातील एक अधिकारी अब्राहम ला. फेबर ह्याने Dutch Governor डच गव्हर्नर जनरल John Mastsuiker ह्याला लिहीलेल्या एका पत्रात केले आहे. त्याआधी इ.स १६७२ साली विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मरण पावला त्याच्या पश्चयात विजापूर राज्यामधे जी दुही माजली त्याची संधी साधून छत्रपती शिवाजीराजांनी १६७५ सालच्या एप्रिल महिन्यात परत फोंड्यास वेढा घातला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात आढळतो. पहिला उल्लेख राजापूरच्या इंग्रजांनी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मुंबईला पाठवलेल्या पत्रातील असून दुसरा कारवार येथील इंग्रजांच्या दिनांक १४ एप्रिल १६७५ मधल्या पत्रातील आहे.
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१७३८
'बाजीराव म्हटल की फक्त मस्तानीच काहीजणांना आठवते.' बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा..
"जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणालाच शक्य होणार नाही आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे. ह्या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल"
पोर्तुगीजांचा गोव्याचा व्हाॅइसराॅय कौंट द सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनियु कार्दिम फाॅइश याला पत्र..
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१९३२
पहिली क्रांतिकारी महिला बिना दास यांनी बंगालचे गर्वनर स्टॅन्ले जॅक्सन यांचे हत्येचा ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रयत्न केला.
कोलकाता विद्यापीठाचे दीक्षांत समारंभात त्यांनी स्टॅन्ले जॅक्सन यांचेवर पिस्तुलातून ५ गोळ्या झाडल्या. त्यांना ९ वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पदवीदान समारंभातच त्यांना अटक झाली व त्यांना त्यावेळी पदवी दिली नाही.
पतीच्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे अज्ञातवासात गेल्या. तेथेच २६ डिसेम्बर १९८६ रोजी निधन झाले.
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१९३९
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) स्मृतिदिन
(जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३)
हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा श्री शिवछत्रपती,*
*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*