कैलास किसन बोंबले
815 views
2 days ago
जगामध्ये आतापर्यंत विविध क्षेत्रांत जी प्रगती झाली आहे, त्यामध्ये महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथं महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटवलेला नाही. तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा आणि हीन विचारसरणीमुळे महिलांना नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळाली. त्यांच्या समानतेच्या अधिकाराला नकार देण्यात आला. 'स्त्री म्हणजे चूल आणि मूल' एवढ्यापुरतचं तिचं विश्व मर्यादित करण्यात आलं. मात्र, त्याच महिलांना संधी मिळताच त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. त्यांनी देशाचे नेतृत्व केले, सीमांचे रक्षण केले आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला. एवढेच नव्हे तर त्यांनी अवकाशालाही गवसणी घातली. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात जगत आहोत. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समतेचं आणि न्यायचं कवच दिलं असलं तरी आजही काही प्रतिगामी प्रवृत्ती स्त्रीच्या जन्माला, तिच्या स्वातंत्र्याला, शिक्षणाला, न्यायाला आणि हक्कांना आव्हान देताना दिसतात. त्यामुळे एक संवेदनशील समाजघटक म्हणून अशा अनिष्ट विचारांचा प्रतिकार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हा आपल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श आहे.आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. आजच्या या विशेष दिनी सर्व स्त्रियांच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला आणि योगदानाला सलाम. मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #महिला दीन विशेष