:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
एकदा की माझे व तुझे हे अंतकरणातून निघले की मग मनुष्याच्या देहावरून अभिमानाचे ओझेच उतरले असे समजावे. मग त्याला काहीही घ्यावे दयावे लागत नाही आणि विचार करून पाहिले तर मनुष्यस्वभाव सुद्धा शुध्द आहे. आशा व मोहजाळाने मनुष्याच्या गळ्याला फासा घातला आहे. असे जरी असले तरी मनुष्याने सुख झाले तरी त्याचा अभिमान वाटू देऊ नये आणि दुःख झाले तरी त्याचा शीण वाटू देऊ नये. मनुष्याने असे म्हणावे की सर्वकर्ता नारायणच आहे केवळ एवढेच शब्द जरी उच्चारले तरी कोणत्याही प्रकारचे सुखदुःख मनुष्याला होणार नाही. तसेच मान अपमान आणि लाभ-हानी हे सारखेच आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात याच अवस्थेला सोवळे असे खरे नाव आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१७/०५/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई