गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
633 views
10 hours ago
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२४४९ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवा तुला माझी आठवण सुद्धा येत नाही हे मला समजले आहे कळले आहे त्यामुळे आता माझा जीव तरी मी कशासाठी सांभाळू. हे अनंता तु तरी आता माझ्या संचिता विषयी काय करशील माझे संचित तसे आहे की तुला माझी आठवण येत नाही त्यामुळे माझ्या जगण्याचा धिक्कार असो. देवा तु पतीत पावन आहेस तुझ्या किर्तीचा ठसा सर्वत्र पसरलेला आहे त्यामुळे तु माझा उध्दार करशील या आशेनेच मी निवांत राहिलो होतो. देवा तुझ्या वाचून दुसरा माझा कोण अंगिकार करणार आहे तुला इतकी हाक मारून देखील तु माझ्याकडे येत नाहीस तुझी भेट देत नाहीस याचा अर्थ असा की तु माझ्या विषयी निष्ठुर झाला आहेस हे मला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु माझ्या जीवाची निराशा केली आहेस त्यामुळे आता मी तुझ्यासाठी माझ्या जीवाचा ही नाश करेल. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.११/०५/२०२६ वार-सोमवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝