:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४६६ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
आमचे सोयरे हरिजन आहेत हरिभक्त आहेत की जे निकिंचन म्हणजे दरिद्री आहेत व दरिद्री असणे हेच ज्यांचे भाग्य आहे. ज्यांचे धैर्य कधी भंगत नाही आणि ज्याचा एकविध भक्ति भाव हरी विषयी असतो आणि त्याच्याच रंगात जे रंगलेले असतात. भूक तहान चिंता हे सर्व विसरून जे नेहमी देवालाच आठवत असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे धन निजस्वरूप नारायणच आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२८/०५/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई