कृपासिंधु
857 views
8 hours ago
#✍️सुविचार #🙏भक्ती सुविचार📝 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 आपल्या रोजच्या बोलण्यात विनोद ,थट्टा ,उपहास आदी प्रकार त्या त्या निमित्ताने येतात . समोरचा जर हे जाणून घेऊ शकला नाही तर मात्र ह्या बोलण्याचा विपरीत परिणाम दिसून येऊ शकतो . पण हे सर्व परस्पर विश्वासावर आधारित असत . जर आत्यंतिक विश्वास नसेल तर ह्या बोलण्यातील मर्म तुमच्यापर्यंत येणे अशक्य आहे . दत्त महाराजांनी अनेकदा आपल्या भक्तांशी संवाद साधताना असे श्रद्धेचा कस पाहणारे उद्गार काढले आहेत ,यात आधी दत्त महाराजांच्या बोलण्यातील मर्म कळणे आवश्यक ठरते अन्यथा हे न कळल्यास श्रद्धा , विश्वास या गोष्टी कसोट्यांवर खऱ्या ठरत नाहीत . दत्त माहात्म्यात आणि गुरुचरित्रात अशी अनेक उदाहरणे आहेत . दत्त माहात्म्यात गर्ग मुनींच्या मार्गदर्शनाने कार्तवीर्य माहूर पर्वतावर दत्त महाराजांच्या सेवेला आला होता . अनेक प्रकारची सेवा कार्तवीर्याने केली . यात पादसंवाहन ,नाना पदार्थ आणून देणे ,फळे हार आणणे आदी कामे होती . निद्रा आणि आळस यांचा त्याग करून कार्तवीर्याने हि सेवा केली मात्र एके दिवशी दत्त महाराजांनी एक लीला दाखविली . केवळ नेत्र कटाक्षाने कार्तवीर्याचे बाहू गळून पडले . दत्त महाराज यावर म्हणाले ,अरे कार्तवीर्या, हे तुला मिळालेले अशुद्ध संगाचे फळ आहे ,माझा संसर्ग दोष हा असा आहे तेव्हा हे अरिष्ट समजून इथून पळ काढावास हे उत्तम . यावेळी कार्तवीर्याने गर्ग मुनींच्या उपदेशाचे स्मरण केले आणि दत्त महाराजांची स्तुती केली ,परिणामस्वरूप महाराजांनी प्रसन्न होत अनेक वरदाने कार्तवीर्याला दिली . ( द मा ६/ २८ पासून पुढे ) आत्यन्तिक श्रद्धा व विश्वास , आणखी काही नाही . अशाच प्रकारे गुरुचरित्रात अठ्ठेचाळीसाव्यात शेतकरी आणि नृसिंहसरस्वतीस्वामी दत्त महाराज यांचा संवाद आहे . गुरुमहाराजांनी पीक कापून टाक म्हटल्यावर या शेतकऱ्याने सर्व पीक कापून टाकले ,अनुष्ठानाहून परत येताना गुरुमहाराजांना ,शेतकऱ्याने ते कापून टाकलेले पीक दाखवले यावर , श्रीगुरु म्हणती तयासी l वाया कापिलें म्हणोनि ll विनोदे तुज सांगितले l तुवा निर्धार कापिलें ll विनोदे तुज सांगितले यावर त्या शेतकऱ्याचा दृढ विश्वास काय म्हणतोय पहा ,तुमचे वाक्य भले l तेचि मज कामधेनू ll दत्त महाराजांचे कोणत्याही अनुषंगाने बोल येवोत ते कल्याणकारकच ठरणार यात शंका नाही . शतपटीने धान्य देत महाराजांनी या शेतकऱ्याचे कल्याण केले . विश्वास हा महत्वाचा ठरतो हे खर !! श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य .