#✍️भक्ती संदेश #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 पुनरपि जननं पुनरपि मरणं: जन्म-मरणाच्या चक्राचे 'गुपित' आणि मुक्तीचा मार्ग ॥
श्री )पुनरपि जननं पुनरपि मरणं,
पुनरपि जननी जठरे शयनम्।इह संसारे बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि मुरारे॥
अर्थ = वारंवार जन्म घेणे वारंवार मृत्यू पावणे पुन्हा मातेच्या गर्भात प्रवेश घेणे,( शयन करने )
हे संसार रुपी सागर खूप विशाल आणि मोठा आहे आणि पार करने साठी अंत्यत अवघड आहे हे मुरारी तुमच्या अपार कृपेनें मला यातुन मुक्त करून माझे रक्षण करा
आदि शंकराचार्य यांनी 'भज गोविंदम्' मध्ये रचलेला हा श्लोक केवळ ऐकायला गोड नाही, तर तो मानवी अस्तित्वाचा सर्वात मोठा आरसा दाखवतो. आपण अनेकदा हा श्लोक ऐकतो, पण त्यातील गुह्य गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते
पा ) गर्भवासाचे कष्ट आणि विस्मृतीचे आवरण
श्लोकात म्हटले आहे पुनरपि जननी जठरे शयनम्'(पुन्हा पुन्हा मातेच्या गर्भात झोपणे) अध्यात्म सांगते की, नऊ महिने मातेच्या गर्भात असताना जीवाला आपल्या पूर्वजन्मांची पूर्ण स्मृती असते,त्या अंधारात आणि संकुचित जागेत जीव देवाला प्रार्थना करतो,हे प्रभो मला बाहेर काढ, आता मी फक्त तुझेच स्मरण करेन पण जन्माला आल्यानंतर 'माया' आणि 'विस्मृती कार्य करू लागते आणि आपण पुन्हा त्याच संसारात अडकतो, हे चक्र तोडणे हेच मानवी जीवनाचे मुख्य ध्येय आहे.
द ) *बहुदुस्तारे* = हा संसार कठीण का आहे?
संसाराला 'दुस्तर' (पार करायला कठीण) म्हटले आहे,याचे कारण असे की, आपण ज्याला 'सुख' समजतो, ते प्रत्यक्षात पुढील दुःखाचे बी असते आपण सुखाच्या मागे धावतो आणि नकळत नवीन 'कर्म' तयार करत,ही कर्माची साखळी इतकी गुंतागुंतीची आहे की, एक जन्म ती सोडवण्यासाठी पुरेसा नसतो म्हणून,पुनरपि जननं' (पुन्हा जन्म) हा अनिवार्य होतो,
पुनर्जन्म का होतो? याचे सर्वात मोठे गुपित म्हणजे आपली *वासना* मृत्यूसमयी शरीर सुटते, पण मन सुटत नाही,मनातील अपूर्ण इच्छा,कामना,कोणाबद्दलचा राग किंवा कोणाबद्दलची अति-ओढ हे चुंबकासारखे काम करतात आणि आपल्याला पुन्हा एका नवीन गर्भात (जननी जठरे) खेचून आणतात, जोपर्यंत मनातील वासना शून्य होत नाहीत, तोपर्यंत 'पुनरपि जननं' थांबत नाही,थोडक्यात काय...? तर मनाच्या वासना हेच पुनःरह जन्माचे इंधन आहे
श्री ) श्लोकात म्हटले आहे 'इह संसारे बहुदुस्तारे'. हा संसार कठीण आहे कारण आपण त्यात 'गुंततो'. गुह्य गोष्ट अशी आहे की, आपल्याला संसार सोडायची गरज नाही, फक्त 'पाहण्याची पद्धत' आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. जसा आपण एखादा सिनेमा पाहतो,पडद्यावर दुःख चे सीन आले, की आपण मनाला लावून घेत नाही किंवा त्याच्या जास्ती प्रभावात जातं नाही, कारण आपल्याला माहित असते की हे सत्य नाही, आहे तर असेच या जगता मध्ये जीवन जगत असताना गुंतून न जाता, या संसारात 'साक्षी' होऊन जगणे हीच मुक्तीची पहिली पायरी आहे.
व )*मुरारी* शब्दाचे गुपित
शंकराचार्य येथे 'विष्णू' किंवा 'कृष्ण' न म्हणता 'मुरारी' का म्हणतात? *मुर* नावाचा एक असुर होता जो अहंकाराचे प्रतीक होता. त्याचा नाश करणाऱ्याला *मुरारी* म्हणतात जोपर्यंत आपल्यातील *मी* पणा (अहंकार) जिवंत आहे, तोपर्यंत जन्म-मरणाचे चक्र थांबणार नाही
जेव्हा आपण मुरारीला शरण जातो, तेव्हा तो आपल्यातील अहंकाराचा नाश करतो आणि मगच खऱ्या मुक्तीची दारे उघडतात...अनेकांना वाटते की देवाला प्रार्थना केली की तो आपल्याला स्वर्गात नेईल. पण 'पाहि मुरारे' चा खरा अर्थ आहे हे प्रभू मला अशी बुद्धी दे की मी या मायेच्या जाळ्यात अडकणार नाही( माया म्हणजे काम क्रोध लोभ मोह अहंकार) देवाची खरी कृपा ही संपत्ती किंवा सुख नसून सद् विवेक बुद्धी जागृत होने आहे तेव्हाच माणूस या 'दुस्तर' सागरातून पोहून निघतो, अध्यात्मिक ग्रंथ सांगतात की, गर्भवासात असताना जीव देवासोबत 'करार' करतो की बाहेर गेल्यावर मी फक्त तुझे कार्य करेन. पण मायेचा स्पर्श होताच आपण तो करार विसरतो. आजचा हा क्षण तीच वेळ आहे तो करार आठवण्याची,आपण येथे फक्त ' जीवनबंध स्तिथीत राहण्यासाठी नाही, तर जीवनमुक्त होण्यासाठी आलो आहे आणि हीं आपल्या सर्वांची परीक्षा आहे आणि याला सर्वानी सामोरे जायचेच आहे
ल्ल ) जगाच्या झगमगाटात आपण काय विसरतोय?
आज आपण आपली प्रगती बँक बॅलन्स किंवा बंगला, गाडी सोने, इत्यादी वरून करतो पण विचार करा, हे सर्व याच जन्मापुरते मर्यादित आहे. *पुनरपि जननं* च्या सिद्धांतानुसार, आपण सोबत फक्त आपले 'संस्कार' आणि( संस्कार म्हणजे शरीरा द्वारे कर्म करताना त्या कर्माचा अंश मना मध्ये तयार होने याला अध्यात्मिक भाषेत संस्कार म्हणतात आणी बोली भाषेत सवयी म्हणतात )
'पाप व पुण्य' दोन्ही घेऊन जातो. बाकी सर्व येथेच राहते. हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की, धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ त्या 'शाश्वत' सत्यासाठी सुद्धा काढा( ते शाश्वत सत्य परमेश्वर म्हणजे श्री दत्त प्रभू आहे)
भ ) सुटण्याचा मार्ग काय?
केवळ हा श्लोक म्हटल्याने मुक्ती मिळत नाही. मुक्ती मिळते ती 'जाणीवेतून होते त्या साठी मुरारी च्या म्हणजे परमेश्वराच्या नामाचा आधार घ्यायला पाहिजे तेव्हाच नाम आपले कार्य खालील प्रकारे करणारे आहे
पहिली पायरी- नाम आपल्याला मान्य करायला लावते की आपण एका चक्रात अडकलो आहोत
दुसरी पायरी: नाम हे आपल्या सर्व कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करणे.
तिसरी पायरी नामस्मरणा मधून मुरारी'च्या चरणी पूर्ण शरणागती आणि हे सर्व नामाने होऊ शकते म्हणून तुम्हा सर्वाना विनंती आहे "श्रीपाद श्री वल्लभ " या नामाचा आधार घेऊन या जीवन रुपी संधी चे सोने करा
! श्रीपाद श्री वल्लभअर्पणमस्तु!