#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश . . . ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. **************
. सत्व, रज, तम हे तीन गुण आहेत. या तीन गुणांच्या क्रियेतून संसार उभा राहिला आहे. संसारातील सारे सजीव या तीन गुणांत विभागले आहेत. वस्तूचे यथार्थ ज्ञान सत्त्वगुण. रागद्वेष हा रजोगुण आणि त्याच्या विपरीत अज्ञान तमोगुण होय.
************************************************
. तुं गुणत्रयातें अव्हेरी । मी माझें हैं न करी l
. एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ll
***************[ ज्ञानेश्वरी-२/२५९]****************
. ------- llअर्थ ll ------
. तु तीनही गुण टाकून दे. 'मी' व 'माझेपण' धरू नकोस. पण तू आपल्या अंतःकरणात आत्मसुखाला मात्र विसरू नकोस.
. ll चिंतन ll
. जे ज्ञानी आहेत ते वेदातील शाश्वत व इष्ट तेवढेच घेतात. 'त्रिगुणाची विशेषता सांगताना भगवंत म्हणतात, 'सत्व, रज, तम हे तीन गुण आहेत. या तीन गुणांच्या क्रियेतून संसार उभा राहिला आहे. संसारातील सारे सजीव या तीन गुणांत विभागले आहेत. वस्तूचे यथार्थ ज्ञान सत्त्वगुण. रागद्वेष हा रजोगुण आणि त्याच्या विपरीत अज्ञान तमोगुण होय. वेदाभ्यास, तप, ज्ञान, इंद्रियनिग्रह, धर्मक्रिया, आत्मचिंतन ही सत्वगुण लक्षणे आहेत. निषिध्द कर्मात रूची, निरंतर विषयोपभोग ही रजोगुण लक्षणे आहेत. सात्विक देवात, रजोगुणता मानवात व तामसी वृत्ती कृमी, कीटक इ. नीच योनीत असते. सत्त्वगुण वाढला आहे की नाही हे ओळखण्याची दोन मुख्य लक्षणे आहेत. पहिले लक्षण धर्मनिष्ठा आणि दूसरे लक्षण स्वधर्माचरण. अर्जुन नेमके हेच विसरला होता म्हणून भगवंतांनी सत्त्वगुणांची थोरवी सांगितली आहे. मोक्षाचे साधन ज्ञान आहे तर धर्माचे स्वधर्माचरण आहे. कर्तेपण स्वतःकडे न घेता ते भगवंतावर सोपवावे. 'मी' 'माझे' म्हणू नये. आपण प्रयत्नपूर्वक कर्म करीत रहावे. त्याचे फळ सहज मिळाले तर ते स्वीकारावे त्याची अपेक्षा करू नये.' असे ज्ञानेश्वर माऊली सुचवितात.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll