राहुल बोराडे
1.2K views
11 hours ago
राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तंत्रज्ञान विकासात पुढाकार घेतला. भारतात संगणक क्रांती आणण्याचं आणि पंचायतीराज व्यवस्थेचा पाया रचण्याचं श्रेय त्यांना जातं. यासोबतच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशात उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण व विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला. नव्या भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन...! #मा. पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी स्मृतीदिन 💐