🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रारब्ध भोगत असताना नशिबाचे तीन प्रकार आहेत: मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध वज्र प्रारब्ध.*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
भगवंत म्हणतात की माझ्या नामाचा जप केल्याने मंद प्रारब्ध तुटते, खऱ्या संताच्या सहवासात सत्संग केल्याने मध्यम प्रारब्ध तुटते आणि श्रद्धेने विश्वासाने अनन्य भावाने संताला शरण जाऊन माझी नामस्मरण भक्ती केल्याने खडतर असे तीव्र प्रारब्ध तुटते, पण वज्र प्रारब्ध मात्र भोगावे लागते ते भोगून संपवावे हेच उचित असते.
पण जे श्रद्धावान भक्त श्रद्धेने माझा सतत नामजप करतात, त्यांच्या सोबत राहून मी व्यक्तिश: त्यांचे प्रारब्ध सुलभ करण्यासाठी तत्पर असतो.तसेच त्या वज्र प्रारब्धाचा भोग सौम्य करून त्यांची पूर्तता करून घेतो आणि भक्तांना त्या उपरोक्त दुःखाची तीव्रता जाणवू देत नाही.तसे प्रारब्ध आधी निर्माण झाले आणि शरीर नंतर निर्माण झाले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्या संबंधित एक गोष्ट आहे,
एक गुरुजी होते जे नेहमी देवाचे नामस्मरण करत असत.ते खूप म्हातारे झाले होते आणि त्यांचे काही शिष्य त्यांच्यासोबत जवळच्या खोलीत राहत होते.
जेव्हा जेव्हा गुरुजींना शौचास, आंघोळ वगैरेसाठी जायचे असे तेव्हा ते शिष्यांना बोलावून घेत असत आणि शिष्य त्यांना घेऊन जात असत.हळूहळू काही दिवसांनी दोन-तीन वेळा आवाज देऊन शिष्य यायचे, कधी कधी नंतरही उशिरा यायचे....
एके दिवशी रात्री गुरुजींनी निवृत्त होण्यासाठी शिष्यांना बोलावले होते.पण तेवढ्यात एक अनोळखी तरुण लगेच हाकेसर्शी आले आणि अतिशय हळुवार कोमल सुखद स्पर्शाने गुरुजींना निवृत्त केले आणि त्यांना पलंगावर झोपवले.आता हा रोजचाच दिनक्रम झाला.
असे दररोज त्या तरुणाची सेवा बघता,
एके दिवशी गुरुजींना शंका येते की, पूर्वी माझे शिष्य जे गुरुसेवा ह्या विषयावर शिष्य व्याख्यान देण्यात पटाईत होते ते तीन-चार वेळा आवाज देऊनही उशीरा यायचे, पण हा तरुण मुलगा अज्ञात असलेला असूनही जेव्हा पाहिजे तेव्हा किंवा मनात मदतीची गरज आहे ही भावना प्रकट होताच जो समोर न बोलवता हजर असतो.आणि न रागावता न कंटाळता माझे प्रातविधीचे कार्य करतो आणि अगदी हळुवारपणे मला जपतो. हा नक्की आहे तरी कोण?हे पाहण्यासाठी तो तरुण नित्य सेवेसाठी आला असता,
एके दिवशी गुरुजींनी त्या मुलाचा हात धरून विचारले
खरे सांग,तू कोण आहेस?अरे माझे शिष्य आहेत ते देखील ज्या सेवेचा आळस धरितात तीच सेवा तू अगदी सहज कशी करत आहेस.नक्की सांग ना मुला तुझ वास्तव रूप काय आहे?
तेव्हा आपले गुप्त रहस्य उघड झाले आहे हे पाहून तो तरुण म्हणाला अहो आचार्य ज्या ईश्वराची उपासना आपण जन्मभर केलीत जी निष्काम भक्ती आपण आचरण करून इतरांना त्या नवविध भक्तिचा छंद लावला त्यांचे अज्ञान दूर करून त्यांना सद्भक्तीला लावले.ते तुमचे निष्काम भक्तीचे ऋण आम्हावर आहे.म्हणून त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष आपले सुहदय म्हणून आपल्या सेवेसाठी ही लीला केली.आपण काही काळजी करू नये.आपण आणि आपल्या भगवद प्राप्तीच्या देहात आता काही क्षण बाकी आहेत. त्यानंतर ह्या सर्व मायिक द्वंद्व दुखपासून आपण कायम मुक्त होऊन माझ्या स्वरुपी एक व्हाल.
तो तरुण स्वतः स्वरूपाने देवच होता, त्यांनी गुरुजींना त्यांचे खरे रूप दाखवले.
गुरुजी रडतात आणि म्हणतात, हे भगवंता, तू प्रत्यक्ष माझ्या देहादी निवृत्तीचे कार्य करत आहेस, देवा मला किती लाजवशिल अरे अस मी काय पराक्रम केला की एवढी खालची सेवा तुला तुझ्या भक्ताची करावीशी वाटली.भगवंता अरे हे दुःख आमच्याच गतजन्मीची कर्म फळ आहेत जी आता भोग म्हणून पुढे उभी आहेत.अस असतानाही माझ्या साठी एवढे सोसलेस देवा जर तू माझ्यावर एवढा आनंदी आहेस तर मला मुक्ती दे ना.
परमेश्वर म्हणतो की,अरे राजा तुला जे काही त्रास होत आहे ते तुझे प्रारब्ध आहे, तू माझा खरा साधक भक्त आहेस, तू माझ्या नामाचा सतत जप करतोस,एवढेच नाही तर ह्या भक्ती प्रेम रसाचा प्रसाद इतरांनाही प्राप्त व्हावा म्हणून तुझी तळमळ आम्हाला तुझ्यावर प्रेम करायला बाध्य करते.म्हणूनच तुझ्या खर्या निर्मळ भक्ती भावापोटी मला व्यक्तिश: तुझ्या वज्रसमान प्रारब्धात तुझे दुःख सौम्य करण्यासाठी हस्तक्षेप करावेसे वाटले.
गुरुजी म्हणतात, तुझ्या कृपेपेक्षा माझे प्रारब्ध मोठे आहे का? तुझ्या कृपेने माझे नशीब कापता येत नाही का?
भगवंत म्हणतात की माझी कृपा परमशक्तिशाली आहे, ती नक्कीच तुझे प्रारब्ध कापू शकते पण प्रारब्ध कर्म शेष राहिले तर मुक्तीच्या द्वारात आलेल्या तुला ते शेष असलेले कर्मभोग भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागेल.माऊली म्हणतात *,अगा कर्मे जे उरावे l तीही सुख दुखे फळा यावे l आणि तया भोगावया यावे देहा एका ll* पुढच्या जन्मी एखाद्या योनीत येऊन तुला पुन्हा या नशिबाचे भोग भोगावे लागतील, हा कर्माचा नियम आहे, म्हणून तुझे प्रारब्ध स्वतःच्या हाताने तू भोगून कापून घ्यावेसे असे मला वाटते.मात्र त्यानंतर तुला या जन्म-मृत्यूपासून मुक्त करने हे माझे कर्तव्यच आहे.मग ज्या ज्याप्रमाणे बीज भाजले असता ते पुन्हा उगवत नाही तसे कर्मफळ निःशेष नाहीसे झाले की तुझ्यात आणि माझ्यात भेदच उरणार नाही.
*तुका म्हणे गंगा l सागर संगमी l अवघ्या झाल्या उर्मी एकविध ll*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🚩 *ll श्री गुरुदेव दत्त ll* 🚩🙏
#🙏गुरु महिमा😇 #😇भक्ती स्टेट्स #💐संत महंत🙏