१९२०च्या दशकात लंडनमध्ये राहिलेले कार्यकर्ते, संशोधक आणि अभ्यासकः बाबासाहेब...
यांच्यासोबतच समाजशास्त्रज्ञ फ्रैंकलिन गिडीम्स आणि मानवशास्त्रज्ञ अलेक्झांडर गोल्डनवायझर यांच्याशी संपर्क ठेवला. बाबासाहेबांनी नंतरच्या काळात हाती घेतलेल्या मानवशास्त्रीय विचारांच्या व कामाच्या संदर्भात हे अनुभव महत्त्वाचे ठरले, ज्यामुळे त्यांना जातीची समाजरचना मांडण्याच्या कामी मोठी मदत झाली.
जातीची मांडणी हा या लेखाचा मुख्य विषय नसला तरी जिझस चरेझ गार्झा यांनी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी केलेली ही मांडणी जातीची अचलता प्रस्थापित करण्याच्या कामी मदतीस आली.
बाबासाहेबांचं १९१६ला इंग्लंडमध्ये आगमन झालं व त्यांनी एडविन कॅनन यांच्या देखरेखीखाली ऑक्टोबर १९१६मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास सुरू केला. दरम्यानच्या काळात सिडनी वेब यांनी बाबासाहेबांना ग्रंथालयातील भारत विभागाची कागदपत्रे हाताळण्याची संधी दिली. त्याच वर्षी ११ नोव्हेंबरला बाबासाहेबांनी ग्रे'ज इनमध्ये प्रवेश केला. या वर्षभरात बाबासाहेबांनी राजकीय अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, भूगोल आणि समाजशास्त्र असे अनेक विषय अभ्यासले. पण दुर्दैवाने ऑगस्ट १९१७मध्ये त्यांची शिष्यवृत्ती बंद झाल्याने त्यांना आपला अभ्यास थांबवावा लागला व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने त्यांना चार वर्षात आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठीची मुदतही देऊ केली. ऑगस्ट १९१७मध्ये भारतात परतल्यानंतर ते जुलै १९२०मध्ये आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत येण्याच्या दरम्यान बाबासाहेबांनी बॉम्बेतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स, बॉम्बे इथं राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली. पण यापेक्षाही महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या लंडनच्या अनुभवावरून बाबासाहेबांनी राजकीय कामाचा पाया भरला. साऊथबरो समितीला १९१८च्या शेवटी ते जानेवारी १९१९च्यादरम्यान त्यांनी दिलेल्या पुराव्यातून हे दिसून येतं. आपलं पहिलं नियतकालिक मूकनायक सुरू केलं, ज्याचा पहिला अंक जानेवारी १९२०मध्ये निघाला. त्यासोबतच फेब्रुवारी १९२०मध्ये 'डिप्रेस्ड क्लास' समाजासाठीची बहिष्कृत हितकारणी सभा ही संघटनाही सुरू केली. त्यासोबतच १९२०च्या लंडनमधील प्रवासाच्या पूर्वी त्यांनी दोन मोठ्या दलित सभांना संबोधितही केलं. कोल्हापूरच्या माणगावला भरलेल्या शाहू महाराजांसोबतच्या मेजवानीत त्यांनी केलेलं भाषण आणि नागपूरला भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लास परिषदेच्या दरम्यान मुख्य वक्ते म्हणून त्यांनी केलेलं भाषण या दोन परिषदा महत्त्वाच्या ठरल्या.
या परिषदांच्या काळात 'डिप्रेस्ड क्लास' अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणाची एकोणिसाव्या शतकातील पायाभरणी होत होती. बडोद्याचे महाराजा गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, आंबेडकरांइतके आक्रमक नसल्याने पाठिंबा मिळवू न शकलेले विठ्ठल रामजी शिंदे आणि कोल्हापूरचे महाराज राजश्री शाहू यांच्या माध्यमातून पश्चिम भारतात सामाजिक चळवळीची मोठी लाट सुरू झाली. कोल्हापूरच्या महाराजांनी बाबासाहेबांना आपल्या दुसऱ्या लंडन प्रवासासाठी मदत केली. त्यांनी बाबासाहेबांना ब्राह्मणेतर चळवळीचे इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून पाहिलं व त्यांना याच धर्तीवर आपले विचार मांडण्यासाठी प्रवृत्तही केलं. महाराज बाबासाहेबांना पहिल्यांदा १९१९च्या सुमारास भेटले असावेत. ते स्वतः ब्राह्मणेतर चळवळीचे पक्षकर्ते होते. स्थानिक ब्राह्मणांनी मराठ्यांना क्षत्रिय उपाधी देऊ न केल्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ उभारणाऱ्या महाराजांनी बाबासाहेबांकडे आपला ब्रिटिशांच्या देशात पाठवलेला राजदूत म्हणून पाहिलं. आपले मित्र सर अल्फ्रेड पीस यांच्याशी बोलताना त्यांनी बाबासाहेब भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ब्राह्मणी दुजाभावाविषयी ब्रिटिशांचं मत बदलू शकतील, असा आशाबाद व्यक्त केला.
या काळात बाबासाहेबांनी लंडनमध्ये व्यतीत केलेली तीन ते चार वर्षे त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीच्या तुलनेत किरकोळ भासतात आणि म्हणूनच इतिहासकारांनी त्यांच्या चरित्रात लंडनमधील या वास्तव्याला थोडक्यात आटोपण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक इतर राष्ट्रवादी नेते जसे की मो.क. गांधी, मोहम्मद अली जिना, जवाहरलाल नेहरू आणि भारतीय चळवळीत पुढे जाऊन नाव कमावलेले अनेक नेते लंडन किंवा ऑक्सफर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकत होते. आपल्या परदेशी शिक्षणादरम्यान अशा शिक्षणाला गवसणी घालू शकणाऱ्या विशेष वर्गीय अधिकार असणाऱ्या नेत्यांकडे पाहत असतानाच बाबासाहेब आपल्या प्रवासातून एक शाश्वत उभारणी करता येईल का, याकडेही पाहत होते. या काळात त्यांनी लिहिलेल्या व छापलेल्या अनेक अभ्यासांमध्ये सफाईदारपणा नसला तरी त्यांनी नंतरच्या आयुष्यात महत्त्व दिलेल्या 'डिप्रेस्ड क्लास'साठीच्या राजकीय व नागरी हक्कांच्या संदर्भात हे काम महत्त्वाचं होतं. डॉ. ख्रिस्तफ जॅफ़लो यांनी दाखवल्याप्रमाणे बाबासाहेबांनी या काळात केलेलं काम अजून परिपक्व झालं नव्हतं. तरीही आपल्या नंतरच्या बुद्धिवादी मोहिमांमध्ये या कामानं महत्त्वाची पार्श्वभूमी तयार केली. या शैक्षणिक आणि अकादमीक घडामोडींतून तसेच आंतरराष्ट्रीय अनुभवांमधून तयार होणारी विचारसरणी किमान आंबेडकरांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर लागू करण्यासाठी उपकृत ठरली होती.
लंडनमधील हा अनुभव राजकीय चळवळीच्या नेतृत्वासाठी लागणाऱ्या तयारीचा भाग होता, यात शंकाच नाही. बाबासाहेबांच्या लंडनमधील अभ्यासाच्या दोन्ही कालखंडांच्या दरम्यान 'दलितां'च्या हक्कांसाठी व उद्धरांसाठी त्यांनी चालवलेल्या विविध चळवळींची दिशा स्पष्ट झाली. यात फक्त सामाजिक कार्यक्रम, भाषणे आणि नियतकालिके यांचा समावेश नव्हता तर बॉम्बे प्रांताच्या विधीमंडळात दलितांना, नऊ जागा राखीव असाव्यात, या साऊथबरो समितीकडे केलेल्या मागणीचा समावेशही होता. हा 'दलितांच्या' हक्कांकडे थेट संविधानाच्या नजरेतून पाहण्याचा आंबेडकरांचा दृष्टिकोन त्यांच्या अभ्यासातही महत्त्वाचा ठरला. आपल्या पूर्वसुरींप्रमाणे बाबासाहेबांनीही कायद्याचा अभ्यास केला होता मात्र त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या अभ्यासाला समाजशास्त्र, अर्थशास्त्र, समाजाभ्यास व सामाजिक मानवशास्त्राचीही जोड दिली. म्हणून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी निवडलेल्या विषयांचं महत्त्व पुढं सांगितल्याप्रमाणे लक्षात येतं.
प्रिमरोज हिल भागात घर
आपला अभ्यास, राजकीय घडामोडी आणि भारतातील आपल्या संपकाँशी सतत होणाऱ्या देवाणघेवाणीतून वेळ काढून बाबासाहेब यांना इतर काही गोष्टी करण्यासाठी वेळ मिळाला असेल असं दिसत नाही. तरीही या काळादरम्यान त्यांचा विचार आणि लेखन सुस्पष्ट होत असताना त्यांच्या उर्वरित आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या असाव्यात. १९२० मध्ये ब्रिटन आणि भारत यादरम्यान असणार नातं पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या वेगाने बदलत होतं. नवीन संसदीय तरतुदींमधून भारताच्या प्रांतिक आणि आर्थिक राजकारणाला नवी दिशा मिळाली होती तसेच ब्रिटिशांच्या इतर वसाहतींमध्ये देखील अनेक महत्त्वपूर्ण बदल घडत होते. ऑटोमन साम्राज्य संपल्यानंतर मुस्लिमांच्या पवित्र स्थळांची ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होणारी वाताहत आणि त्याविरुद्ध भारतात एम. के. गांधी यांनी सुरू केलेली खिलाफत चळवळ तसेच युद्धोत्तर काळात लागू केलेल्या जुलमी रौलट कायद्याच्या विरोधात उसळलेली संतापाची लाट तसेच ब्रिटिशांच्या ताब्यातील इजिप्त, इराक आणि आयर्लंड अशा इतर वसाहतींमध्ये सुरू झालेले लहानमोठे उठाव यामुळे जगभरातील राजकीय वातावरण बदलत होतं. या राजकीय स्थित्यंतराच्या आणि बंडाच्या कालखंडात आंबेडकर भारताच्या प्रशासनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत विचार करत होते. युद्धाच्या कालखंडानंतर ब्रिटनही मोठ्या प्रमाणात बदलला होता. युद्धानंतर आलेली आर्थिक मंदी, औद्योगिक अशांतता, स्पॅनिश तापाने घातलेला धुमाकूळ तसेच युद्धामध्ये बळी पडलेल्या लोकांच्या जागी मोठ्या प्रमाणात युवतींनी व स्त्रियांनी विविध ठिकाणी काम करायला केलेली सुरुवात या सर्वांविषयी...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
#💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜