चंद्रगुप्ताची कारकीर्द
राजधानी पाटलीपुत्र नगरी हिरण्वती ऊर्फ शॉणभद्र आणि भागीरथी उर्फ गंगा नदी यांच्या संगमाजवळ वसलेली होती. हिची लांबी ५ कोस व रुंदी सुमारे दोन कोस असून तिच्या भोवती मजबूत तट व तटाच्या भोवती खोल खंदक होता. तटाची भिंत ४०० हात रुंद व ३०० हात उंच होती. तटांत ५७० बुरूज व ६४ दरवाजे काढलेले होते असे वर्णन केलेले आढळते.
गावे व खेडी - चंद्रगुप्ताच्या काळी शहरांच्या संख्येने गावांच्या व खेड्यांच्या संख्येशी प्रमाणे हल्लींच्या पेक्षांही कमी होते. पण त्या काळची गांवे व खेडी समृध्द होती. मध्ये हिरवीगार शेते व त्यांच्या भोवताली गावे वसलेली अशी रचना असे. गावांतून एकास एक लागून घरे नसत. गावकरी व खेड्यातले लोक आपल्यांतूनच एखादा प्रतिष्ठित व आपल्या भरवंशाचा असा महाजन निवडून देत. लोकांच्या अडचणी व गान्हाणी, आत्याचार, जुलूम वगैरे गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांस व राजास कळवून दाद लावून घेण्याचे काम त्याच्याकडे असे. सरकारी अधिकारी व केव्हा केव्हा स्वतः राजाही खेड्यापाड्यांस भेट देऊन लोकस्थिती प्रत्यक्ष पाहत व चौकशी करीत. गावची व रस्त्यांची स्वच्छता राखणे, दळणवळणाच्या नव्या सोयी करणे, प्रवासी लोकांना उतरण्यासाठी धर्मशाळा वगैरे बांधणे व त्यांची व्यवस्था पाहणे, विहिरी, तलाव इ. खोदणे व त्यांची दुरुस्ती राखणे, गावकऱ्याच्या विनोदार्थ सार्वजनिक बागबगीचे करणे, गावकऱ्यांना एकत्र जमून विचार करण्यासाठी टाऊन हॉलसारखे सभागृह बांधणे इ. कामे गावकरी स्वतःच करीत व या कामी त्यांनाच स्त्रीवर्गाकडूनही योग्य साहा मिळत असे. अशा रीतीने प्रत्येक गाव हे एकेक लहानसे स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य असे.
संस्कृती - वैदिक युग संपून कित्येक शतके या वेळी लाटलेली होती. तथापि वैदिक धर्माचा व वैदिक संस्कृतीचा लोकांच्या मनावर बसलेला पगडा अद्याप थोडाफार कायम होता. वैदिक काळातल्याप्रमाणे मोठाले यज्ञयाग क्वचित् होत असत. ब्राह्मण पुरोहितांचे बंड विशेषसे नव्हते. कर्मकांडाच्या आवरणाखाली जे अनादि, अक्षर व चैतन्यमय तत्व प्रच्छन्न हाते ते नुकतेच प्रकट होऊ लागले होते. अनेकत्यांत एकत्व, सान्तांत अनंतत्व व नानाविध देवतांच्या स्वरूपांत एका अचित्य, निर्गुण, सर्वसाक्षी, सर्वकर्मप्रवर्तक परमेश्वरी चित्रशक्तीचा विकास शाते लोक पाहू लागले होते इतके दिवस बहिर्मुख असलेली जनतेची दृष्टी आता अंतर्मुख होऊ लागली होती. ज्ञानयुगाची प्रभात होण्याचा हा काळ होता पण इतक्यात अकल्पित विध्न उभे राहिले. इंद्रियदमनपूर्वक ब्रह्मज्ञानप्राप्तीसाठी तपाचरण करणारे तपस्वी त्या काळी होते. त्यांचा प्रभाव समाजावर पडल्यावर कर्मकांडांचे प्रस्थ शिथिल होईल ते दृढ करण्यास आणि समाजात बौद्धधर्ममतांच्या रूपाने विचारस्वतंत्र्य डोकावू लागले होते त्याची हकालपट्टी करण्यास काय करावे या विचारात कर्मठ ब्राह्मण गुंतले होते. शेवटी उपासना, व्रते-वैकल्ये, कृच्छे, प्रायश्चित्तदी मार्ग त्यांना सोयीचे वाटल्यावरून त्यांचा प्रचार त्यांनी जारीने चालविला होता. त्यामुळे पुन्हा नानाप्रकारच्या देवदेवतांची पूजा अर्चा, बलिदान, व्रते, अनुष्ठान इ. प्रकार रुढ होऊ लागले, आणि भारतीय हिंदूसमाजाच्या आध्यात्मिक व नैतिक उन्नतीचा आरंभकाळ आणखी काही वर्षे लांबणीवर पडला. या उन्नतीचे बीज गौतमबुद्धाने पेरून ठेविलेच होते. व ते रूजून अंकुरोदंगमहि चंद्रगुप्ताच्या काळी झालेला होता पण त्या नाजुक रोपांची निगा राखून त्याला जोराने फोफावण्यास लावण्याला आवश्यक असे खतपाणी घालणारा असा उदार महात्मा माळी निर्माण व्हावयाचा होता तो थोडक्याच काळानंतर अशोकाच्या रुपाने अवतीर्ण झाला.
राज्यविस्तार - चंद्रगुप्ताने नंद राज्यापासून मिळविलेल्या मगधाच्या राज्यात वेळोवेळी भर टाकून त्याचा बराच मोठा विस्तार केल्याचे मागच्या प्रकरणात सांगितलेच आहे. रुद्रदामन् त्याने जिंकला होता व तेथे आपला प्रतिनिधी बंदोबस्तासाठी ठेविला होता. म्हैसूर संस्थानात सिद्दापूर येथे सापडलेल्या
ताम्रपटावरून त्या काळच्या मगध राजाच्या विस्ताराचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. त्या काळी दक्षिणेंत चोल, पांड्य, केरल इ. काही मोठाली राज्ये होती. चोल राज्याची राजधानी उरैयुर ही हल्लीच्या त्रिचनापल्लीजवळ होती. पांड्ध राजांची राजधानी मदुरा ही होती; आणि पश्चिमघाटापासून थेट कन्याकुमारीपर्यंतचा मलबार किनाऱ्याचा प्रदेश याला केरल राज्य असे नाव होते. ही चारी राज्ये मगध राज्याच्या दक्षिण सीमा होत्या, म्हणजे पश्चिमेकडील हिंदुकुशपर्वतापासून तो हिमालयाच्या पूर्वभागापर्यंतचा प्रदेश हिमालयापासून तो दक्षिणेकडच्या चोल, पांड्यादी चार राज्यापर्यंतचा प्रदेश इतका मुलूख चंद्रगुप्ताच्या अमलाखाली होता.
मगधराज्याचे तक्षशिला, उज्जयिनी, तोसली व सुवर्णगिरी असे चार मोठाले भाग अथवा इलाखे पाडण्यात आले होते. तक्षशिला प्राचीन काळच्या गांधार राज्याची राजधानी व अतिशय संपन्न नगरी होती. ही विद्येचे एक मोठे केंद्र होती. तेथे चंदगुप्ताने जो अधिकार ठेविला होता त्याच्या ताब्यात सबंध पंजाब व काश्मीर हे प्रांत होते.
उज्जयिनी ही अवंति राज्याची राजधानी होती आणि तेथील अधिकारी माळवा, गुजराथ, सौराष्ट्र व पश्चिमेकडील मुलुख यांच्या बंदोबस्ताचे काम पाहत असे.
सुवर्णगिरी हे स्थान कोठे होते याविषयी नक्की माहिती मिळत नाही. कोणी म्हणतात की खानदेश जिल्ह्यात सोनगीर म्हणून जे ठिकाण हल्ली आहे तेच सुवर्णगिरी होय. कोणी म्हणतात की गायकवाडी राज्यात सोनगड नावाचे एक स्थान आहे तेच पूर्वीचे सुवर्णगिरी. तिसरा एक पक्ष असे सांगतो की म्हैसूर संस्थानात चितळगड जिल्ह्यात सुवर्णगिरी हे ठिकाण होते. हा शेवटचा तर्क खरा दिसतो.
तोसली हे स्थानही अद्याप निश्चित झाले नाही. (धौली येथील अशोकाच्या आदेशात तोसलीचा उल्लेख आहे. व ब्राह्मणगिरी येथील गिरीलिपीत सुवर्णगिरीचा उल्लेख आहे. पण दोन्ही उल्लेखांत ही ठिकाणे निश्चित करण्याचे काही साधन मिळत नाही. व्हिन्सेंट स्मिथच्या मते ओरिसा प्रांतातले धौली हे ठिकाण पूर्वीच्या तोसली असावे, आणि निजामच्या राज्यात मस्की येथे सापडलेल्या लेखात ज्या अर्थी सुवर्णगिरीचा उल्लेख आहे त्या अर्थी ते ठिकाण निजामच्याच राज्यात कोठे...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought