*मुलीनसाठी आधुनिक युगात सुवर्णयोग* ; एक वैचारिक मंथन
_________________________
*मुलगी म्हटलं की परिवाराचा आनंद, कौतुक, काळजी, सोनेरी पहाट, सुख समाधान, गोडवा, पिढ्यान पिढ्या चालत आलेला विश्वास, अनेक कुटुंबात मुली नसल्याने देवाधिकांना साकडे घालून, नवस बोलून मुलगी व्हावी म्हणून प्रयत्न करणारी मंडळी दिसते, तर संपूर्ण कुटुंबात एक जरी मुलगी असली तरी तिला संपूर्ण कुटुंब अतिशय मोठ्या प्रमाणावर जीव लावतो, काहींना बहिण तर काहींना भाऊ नसेल परंतु मुलींना सख्ख्या बहिणी प्रमाणे दर्जा देऊन तिची बोळवण करणारा भाऊ तिला समाजात मिळत असतो. पूर्व काळापासून मुलींना पुरुषप्रधान संस्कृतीत पारंपारिक दुय्यम दर्जा जरी असला तरी तिच्या बद्दलचे स्नेह प्रेम आपले जन्मदात्या आई-बाबाच्या नजरेत देवा घरचे गिफ्ट मानले जाते. लाडकी परी ती, एक वेळ मुलापेक्षाही तिला जास्त प्रेम मिळते, यात शंका नाही. आई वडिलांचा तिच्यावर जास्त विश्वास तर आई-वडील कितीही श्रीमंत व कितीही गरीब असले तरी लेकीला कधीही, काही कमी पडू नये म्हणून आयुष्यभर धडपड करणारे आई बाबा पोटाला खाणार नाही, मात्र काही कमी पडून देणार नाहीत.*
*जन्मल्यापासून लाडात वागवत या काळात मुलाप्रमाणे पालन पोषण, स्वतंत्र, शिक्षण तर लग्नसाठी तिला आयुष्याचा चांगल्या कुटुंबातील,सुंदर, जबाबदार, आर्थिक सक्षम, उच्च शिक्षित, नोकरी व आयुष्यात तिला मागे फिरून पाहण्याची गरज पडणार नाही. याची काळजी घेत चांगला वर शोधण्यासाठी खेटराचे तळ घासणारा संवेदनशील बाप आपल्या आयुष्याची कमाई लेकीच्या भल्यासाठी लावण्यात मागे पुढे पाहत नाही. तर आपण गेल्यावर सुद्धा तिची आयुष्यभराची बोळवण आपल्या घरून सुरू राहावी यासाठी चिंता करणारे आई-वडील सगळ्या जबाबदाऱ्यापार पाडून सुद्धा काही तुरळक सासरवाडीतील मंडळी सुनेला एटीएम प्रमाणे वापरणाऱ्यांची बराबरी करून देणारे मायबाप सुद्धा समाजात दिसतात. लेकीचा चेहरा पाहून ती सुखी आहे, किंवा दुःखी आहे. त्याचा अंदाज लावून चिंता व्यक्त करणारे तर हेच काय एखाद्या वेळेस मुलीच वाईट पाऊल पडलं तरी सुद्धा मोठ्या मनाने विष पिणारे मायबाप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.*
*चौदा-पंधरा वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मुला मुलीची सरासरी समानता असल्यामुळे सुशिक्षित, सुंदर, होतकरू मुली अतिशय सामान्य घरी पाडल्यात, काही व्यसनी नवऱ्यामुळे बेरोजगारी, आर्थिक कमजोरीचा सामना करत योग्य तो हुंडा देऊन सुद्धा गरीबीत जीवन जगाव लागले परंतु त्यांनीही निभवून नेले, आता या आधुनिक, नव्या डिजिटल युगात मुलीची संख्या कमी झाल्यामुळे गरिबातल्या गरीब मुलींचे सुद्धा लग्न आर्थिक सक्षम असलेल्या व सुशिक्षित सरकारी नोकरदार, व्यवसायिक, जमीनदारासोबत होत आहे. आई-वडिलांवरील आर्थिक भार सुद्धा कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळे हुंडा पद्धतीला आळा बसून मुलीला जसा आयुष्यात पाहिजेत तसा सुंदर मुलगा, आर्थिक सक्षम, अपेक्षा पूर्ण करणारा मिळत आहेत. दहा-बारा एकरा वाले सुद्धा मुलाला बायको मिळवण्यासाठी स्वतःच्या पदरातून खर्च करायला तयार आहेत, करत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. आई वडिलांची चिंता ही दूर झाली आहे. त्या सामान्य घरातील आई-वडिलांना जसा स्वप्नातील राजकुमार आपल्या मुलीसाठी मिळण्याची अपेक्षा असायची ती आता पूर्ण होत असतांना. काही तुरळक मुली पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या संस्कृती, जबाबदारी, संयम, विश्वासाने, संस्काराने, स्वाभिमानी कुटुंबाच्या अस्मितेला धक्का पोहोचवण्याचे काम करत आहे.*
*आई-वडिलांनी दिलेलं प्रेम, स्नेह, स्वातंत्र्याचा पुरेपूर गैरफायदा घेऊन टीव्ही, मोबाईलवर चालू असलेल्या प्रेम रुपी तमाशाचे रूपांतर आपल्या आयुष्यात स्वीकारून आयुष्य उध्वस्त करायला निघाल्या आहेत. अनेक प्रकरण आपल्या कानावर पडत असतात, कोणी प्रियसी चे तुकडे करून फ्रीजमध्ये भरतो तर बायको आपल्या प्रेमासाठी नवऱ्याला ड्रम मधे भरते आता दोन-तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश देवास जिल्ह्यात एका प्रियकरांने आपल्या प्रियसीला हात पाय बांधून निळ्या ड्रामात टाकून मारल्याची बातमी कानावर आली खरंच पूर्वीच प्रेम आता राहिलं नाही, असंच म्हणावे लागेल. कवळ्या मनाला फूस लाऊन शारीरिक, आर्थिक स्वार्थ किंवा बायका मिळत नसेल म्हणून तर क्षणिक सुखाचा अर्थ आता प्रेमाचा झाला की काय असे झाले. परिस्थिती आता मुलींसाठी " सुवर्णयोग " घेऊन आली असताना सुद्धा असं वागणं कितपत फायद्याचं ठरत आहे. हे महत्त्वाचे. प्रेम विवाहातून बोटांवर मोजण्या इतक्या मुलींचे संसार सुखी असतील ही मात्र शेकडो मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. आपल्याला नेमकं काय पाहिजेत व आपण काय मिळवत आहोत. तसेच आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्वाभिमानी कुटुंबाच्या संस्काराचा व आई-वडिलांच्या स्नेह प्रेम स्वातंत्र्य,विश्वासाचा मोबदला काय द्यायचा ते प्रत्येकीने आपल ठरवायची वेळ आली आहे. शेवटी ज्याचे त्याचे नशीब कर्माने लिहिली जाते हे सत्य आहे.*
*प्रेम नक्कीच एक पवित्र बंधन आहे. मात्र ज्या मायमाऊलीने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवले व त्या बापाने आपल्या ताटातील घास कमी करत आपल्याला घडवण्यासाठी त्याग केला. त्यापेक्षा मोठं कुठचं प्रेम असेल असं मला वाटत नाही. असेल तरीसुद्धा आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा ते कधीच मोठे होऊ शकत नाही. एका प्रेमासाठी जन्म दात्याच्या पाठीत खंजर घुसून प्रेमाचा स्वीकार होऊ शकत नाही. असे मला वाटते ते तुमचं कधीच वाईट चितनार नाहीत. चार महिन्यात झालेलं प्रेम तुमच्या आयुष्य खराब करू शकते मात्र आई-वडिलांनी दिलेल्या जोडीदार नक्कीच तुमचं प्रेम समाज, कुटुंब, आई-वडिलांप्रती हजारो पटीने वाढवू आपली शकते. आपली चालत आलेली संस्कृती जोपासू शकते. यात मात्र शंका नाही. काल रस्त्यावर जाता जाता गाण्याचा आवाज आला थोडं थांबून बघितलं तर एक छोटीशी चिमुकली एका दोरीवर हातात समतोलासाठी एक बांबूचा तुकडा तर त्या दोरीवर एक रिंग व त्या रिंगेत चिमुकलीचे पाय गरीब मायबापाचा संसाराचा गाडा ओढत होती. तिचे वय अवघे तीन ते चार वर्षाचे असेल तिच्या खांद्यावरची जबाबदारी व कार्य पाहून डोळे पाणावले, मनात विचार आला जर छोटीशी चिमुकली आपल्या गरीब माय बापाचा संसाराचा गाडा चालवण्यासाठी जीवाची पराकाष्टा करू शकते.*
*तर लाडात वाढवलेल्या आपल्या आई वडिलांची लाडकी परी जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलं ती आई वडिलांचे म्हणण्याप्रमाणे का वागू नये. तिच्या आयुष्याच सोनं होण्यासाठी आई-वडिलांनी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक प्रयत्न आयुष्यभर चालूच ठेवत, नक्कीच आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. खरच या आधुनिक युगात मुलींसाठी " सुवर्णयोग " आला असं म्हणण्यात वावग ठरणार नाही. आज स्त्रीने माणसाच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्रपणे प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केले असले. तरी मात्र अतिशय बिकट अंधारमय काळात माँसाहेब जिजाऊ, महाराणी ताराबाई, सरदार उमाबाई दाभाडे, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सरोजिनी नायडू, आनंदीबाई जोशी, संत बहिणाबाई चौधरी, ताराबाई शिंदे यांच्यासहित अनेक महापुरुषांनी मानवी जीवनात प्रकाश ज्योत पेटवण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचाराची समाजाला आज प्रामुख्याने गरज आहे. खरच या,आधुनिक युगात मुलींसाठी ' सुवर्णयोग ' आला आहे.*
*प्रल्हाद भिसे पाटील*
*पत्रकार, मेहकर 9511345111*
#NewsUpdate #न्यूज24 #NewsToday #बातमी #StandWithJournalists #पत्रकार
#💪बुद्धांची तत्वे📜 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏