मराठी भावार्थ सहित.....
दि.६ फेब्रुवारी २०२६
सुखें होतो कोठे घेतली सुती ।
बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥
काय करूं बहु गुंतलों आतां ।
नये सरतां मागें पुढें ॥२॥
होते गांठी तें सरलें येतां ।
आणीक माथां रीण जालें ॥३॥
सोंकरिलियाविण गमाविलें पिक ।
रांडापोरें भिके लावियेलीं ॥४॥
बहुतांचीं बहु घेतलीं घरें ।
न पडे पुरें कांहीं केल्या ॥५॥
तुका म्हणे काही न धरावी आस ।
जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥६॥
मी यापूर्वी अगदी सुखात होतो, पण आता हा प्रपंचाचा, संसाराचा फास गळ्यात बांधून घेतला आहे. संसारात मी पुरता गुंतलो आहे, मला मागे पुढे कुठेही सरता येत नाही. जे काही गाठीशी होते, ते सारे या प्रपंचात खर्च झाले, आणि आता डोक्यावर कर्ज होऊन बसले. राखले नाही म्हणून पिकलेले शेत सुद्धा लुटले गेले आणि बायका, पोरे भिकेला लागली. या व्यवसायाकरिता अनेकांची घरे ताब्यात घेतली, पण कितीही काही केले तरी ते पुरे पडतच नाही. तुकोबा म्हणतात, हे सारे मिथ्या आहे, खोटे आहे म्हणून कसलीही आशा न धरता सर्वस्वाचा त्याग करून निघून जावे असं वाटतय.
*। ॐ विष्णवे नमः ।*
*। श्री दत्तात्रेयाय नमः।*
#🌻आध्यात्म 🙏