political leader

Dr Ramdas Athawale
527 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *मी कुठल्याही बाबाकडे जात नाही तरीही मला मंत्रीपद मिळते - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* पुणे / मुंबई दि. 04 - नाशिकचे खरात, त्याच्या चुकीमुळे गेले आहेत जेलच्या दारात, अशा ओळी सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी खरात प्रकरणावर भाष्य केले. माझा कुठल्याही बाबावर विश्वास नाही, कुठल्याही बाबाकडे मी जात नाही. तरीही मला माझे पद, मंत्रीपद मिळत आहे. कोणीही भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खरातबरोबर अनेकांची नावे जोडली गेली असली, त्याच्याबरोबरचे फोटो असले, त्याच्या गैरप्रकाराशी त्यांचा संबंध असेल असे नाही. त्यामुळे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिकाही ना. रामदास आठवले यांनी मांडली. रिपब्लिकन पक्षाची कार्यकारणी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर ना. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सत्याग्रह केला होता. त्या घटनेचे शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे. सामाजिक समता परिषद आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी नेते, विचारवंत यांना बोलवण्यात येणार आहे. जाती व्यवस्था बदलली पाहिजे. त्यासाठी अनेक शहरात परिषद होणार आहे. तसेच समता परिवर्तन यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरला सातारा येथून ही यात्रा सुरू करून त्याचा समारोप पुण्यात होईल. वेगवेगळे जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी यात्रा जाणार आहे, असे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. आमचे उपमहापौर यांच्यावर अन्याय होता कामा नये. महत्त्वाच्या बैठकीला आमच्या उपमहापौर यांना बोलावले पाहिजे. या बाबत केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्याशी या बाबत चर्चा केली जाईल. कोणताही वाद राहू नये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर हा विषय घातला जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही ना. रामदास आठवले यांनी नमूद केले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE #☸️जय भीम
Dr Ramdas Athawale
536 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 02 - आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चार उमेद‌वार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित 122 जागांवर भाजप प्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला असल्याचे अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील 7 राज्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ना. रामदास आठवले यांनी आसाम विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टीकोन देशभरातील जनतेला आणि आसाममधील जनतेलाही पटलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मुख्यमंत्री हिमंता बिसवा यानी आसामचा सर्वांगीण विकास केला आहे. पायाभूत सुविधा उभारुन आसामचा वेगवान विकास होत आहे. त्यामुळे आसामची जनता भाजप प्रणित एनडीएला बहुमताने विजयी करेल. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनीही भाजप उमेद‌वाराना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. आसाममधील धींग या विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे हिरक ज्योती बोरा तसेच किंगसुकीया विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे इजराईल नंदा, मोरीगाव विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे चेनीराम कोनवार, आणि गौरीपुर विधानसभा मतदारसंघात सैदुर रहमान सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे चारही उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढत आहेत. या चार उमेद‌वारामधुन जे उमेदवार निवडून येतील ते रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा भाजपप्रणित एनडीएला देतील. रिपब्लिकन पक्षाचे जिंकून येणारे उमेदवार सरकार स्थापन करण्यास भाजपला समर्थन देतील अशी अधिकृत घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली. ना. रामदास आठवले हे आसामच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या रिपब्लिकन पक्षाच्या चारही उमेद‌वारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. तसेच भाजपच्याही उमेदवारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. आज त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य भारतातील पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, त्रिपरा, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपुर या सातही राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. | हेमत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #☸️जय भीम #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE
Dr Ramdas Athawale
6.5K जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *एकेकाळी 12 नगरसेवक निवडुन आणणारा रिपब्लिकन पक्ष मुंबईत कुठे आहे ? - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुनावले कार्यकर्त्यांना खडे बोल* मुंबई दि. 30 - रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहे. मणिपुरमध्ये पक्षाला 17 टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाला आहे. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्र पक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते मुंबईचे महापौर पद ही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवुन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समजाला सोबत घेवुन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबुत पुर्नबांधणी करा. असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले. चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य बौध्द धम्म गुरु डॉ. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमीत्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडुन आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडुन आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागुन मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन , आदिवासी सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणुन मी दिल्लीचे तख्त गाठु शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकटयाला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही. आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे. तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. मी कधीच मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढलो नाही. आपल्या पक्षांवर आपण प्रेम केले पाहिजे. गन्ना किसान हे आपल्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळाले आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक जिंकता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करुन पक्षबांधणी करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. माझ्या भिमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार, म्हणून चेंबुरमध्ये होत आहे माझा सत्कार माझ्या आयुष्यात मी कधी मानली नाही हार कारण मी दुश्मनांवर करीत आलो वार सर्वांसाठी माझे उघडे असते दार कारण देशभरात जागी केली दलित नार अशी कविता ना. रामदास आठवले यांनी सादर केली. यावेळी या सत्कार सोहळयाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, सुरेश बारसिंग, फुलाबाई सोनवणे, अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धिरज उबाळे, शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, भाजप नगरसेविका आशा मराठे, रिपाइंचे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, रिपाइंचे मुंबई सरचिटणीस विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख, अजित रणदिवे, रमेश गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, रवि गायकवाड, सुभाष साळवे, अनिस पठाण आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते. यावेळी फाईन आर्ट सभागृह गर्दीने फुलुन गेले होते. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख ###Politics ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #follow
Dr Ramdas Athawale
563 जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन* *पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश* *राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश* मुंबई दि.27- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या पक्षांनी ; विविध रिपब्लिकन गट, विविध संघटनांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे; त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. आंबेडकरी चळवळीतील विविध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात सामील झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष अधिक बलशाली करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनीही रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हाती घेतला पाहिजे. रिपब्लिकन पक्षात सामील होऊन रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट केला पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद सुर्वे;मुंबई अध्यक्ष मंगेश पगारे; राज्य महासचिव डॉ उमेश पवार; राज्य उपाध्यक्ष अशोक तांबे; शशिकांत शिंदे; मोहन बोदडे; नरसिम मुच्छा कट्टा; भीमसेन जाधव; रोहिदास वाघमारे; अनिल लागाडे ; गोविंद साळवी; विक्रम बमना; विजय पंडागळे; तुकाराम हेगडे; चंद्रकांत रुपेकर; कविताताई निकम; फिरोझ शेख; राजू पांचाळ; जोनभाई सांडेवाल; सारिकताई सकपाळ ; राजू कवंदर; लक्ष्मी अम्मा देवेंद्र; माधव कट्टार यांच्यासह शेकडो पीपल्स रिपब्लिकन महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडून मिलिंद सुर्वे यांनी आपल्या नेतृत्वात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगळा गट स्थापन केला होता. त्यांच्या नेतृत्वात मुंबई आणि राज्यातील अनेक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कार्य करीत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे प्रमुख असणारे मिलिंद सुर्वे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षामध्ये ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या जाहीर पक्ष प्रवेशाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी केली. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अनेक छोटे मोठे गट आहेत. अनेक संघटना आहेत, अनेक आंबेडकरी विचारवंत चळवळीत कार्य करीत आहेत. आपले स्वतंत्रपणे आणि वेगवेगळे कार्य करणाऱ्या या छोट्या मोठ्या संघटना, गटांनी आणि पक्षांनी रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत केला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशभर मजबूत होत आहे. नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता आहे. आता आणखी दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाल्यास एकुण 4 राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळेल. 4 राज्यात मान्यता असणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. भाजप, काँग्रेस, बसपा, आणि आम आदमी पक्षानंतर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून लवकरच मान्यता मिळेल. त्या दृष्टीने आपले काम सुरू असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. सद्या देशात 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने गन्ना किसान हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांत रिपब्लिकन पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पाँडिचेरी आणि पश्चीम बंगाल या दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे भाजपला पाठिंबा आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ मधील काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहील.असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला मान्यता दिल्याने विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुका लढणे हे रिपब्लिकन पक्षाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे काहीं जागांवर रिपब्लिकन पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहणार आहे. असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पु कागदे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. हेमंत रणपिसे प्रसिध्दी प्रमुख ##Breakingnews #follow #☸️जय भीम #RAMDASATHAWALE ###Politics
Dr Ramdas Athawale
618 जणांनी पाहिले
13 दिवसांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे समर्थन* मुंबई दि. 23 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचे समर्थन केले असून, " रिपब्लिकन पक्ष" हा केवळ एका समाजाचा पक्ष राहू नये, अशी भूमिका मांडली आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी या उपवर्गीकरणाला समर्थन दिले आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वच घटकांचा समावेश पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही तशी अपेक्षा होती. विरोध केल्यास रिपब्लिकन पक्ष फक्त महार, बौद्धांचा पक्ष आहे, असा संदेश जाईल. पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार होते. ते सर्व बौद्ध समाजाचे आहे, असे म्हणत होते. इतरही समाजातील लोक रिपब्लिकन पक्षासोबत आले पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. सर्वच जातीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिते. परंतु ते करताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पोहिजे. आरक्षणामुळे बौद्ध समाजाने शिक्षणाचा लाभ घेतला. ते शिकल्याने फायदा झाला. तसाच इतरांचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे उपवर्गीकरण योग्य आहे. बदर समितीचा अहवाल आला असून सरकार योग्य निर्णय घेईल, असे ना. रामदास आठवले म्हणाले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उपवर्गीकरणाचे त्यांनी समर्थन केले. तर व्हीजेएनटी समाजातील घटक मागास आहे. त्यांना वेगळे आरक्षण दिले गेले पाहिजे. त्यांना राजकीय आरक्षणही मिळाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जात वैधता प्रमाणपत्रासाठी १९५० च्या पुराव्याची अट जाचक समजल्या जाते. परंतु हा केंद्राने नियम केला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू, असे ना. रामदास आठवले म्हणाले. दलितांवर आजही अत्याचाराच्या घटना होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा करण्यात आला. परंतु त्याचा गैरवापर होता कामा नये. ज्यांनी अत्याचार केला, त्याच्यावरच हा कायदा लावल्या गेला पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात चौकशी झाल्यावरच अटक करता येईल, असे सांगितले होते. त्यावर ना. रामदास आठवले म्हणाले की, अॅट्रॉसिटी हा केंद्राने केलेला कायदा आहे. त्यात राज्याला बदल करण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्ष- आठवले पक्षाला दोन राज्यात मान्यता आहे. त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पोर्टब्लेअरला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १७ मे महिन्यात होणार आहे. त्याच प्रमाणे तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीत निवडणुका लढविण्यात येतील. पश्चिम बंगालमध्ये भाजपला समर्थन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य पाहिजे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी याचे नेतृत्त्व करावे असेही ते म्हणाले. अशोक खरातांवर कारवाई झाली पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. लोकांनी श्रद्धा ठेवावी, परंतु अंधश्रद्धा ठेवू नये. दिल्लीत मला अनेक बाबा भेटायला बोलावतात. परंतु, मी जात नाही. बाबाच माझ्याकडे येतात, असे ना. रामदास आठवले म्हणाले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #Politics.... ##Breakingnews #follow ###Politics #RAMDASATHAWALE
Dr Ramdas Athawale
687 जणांनी पाहिले
15 दिवसांपूर्वी
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *चवदारतळे सत्याग्रह शताब्दी महोत्सव देशभर साजरा करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* महाड/मुंबई दि. 21 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे केलेल्या पाण्याचा सत्याग्रह हा ऐतिहासीक आणि युगप्रवर्तक सत्याग्रह होता. सामाजिक विषमतेवर मात करुन समतेच्या युगाचा आरंभ करणारा चवदारतळे सत्याग्रह ठरला आहे. हा मानवमुक्तीचा संगर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव संपूर्ण देशात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. महाड चवदार तळे क्रांतीभूमीतील क्रांतीस्तंभाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी राज्यसभेत तीनवेळा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, संपर्क प्रमुख राहुल सोनावले, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापु गायकवाड, सुमित मोरे ; महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे; विवेक पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आपण कुठेच नसतो . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण संसदेमध्ये आणि केंद्रात मंत्री म्हणून पोहचु शकलो. चवदार तळे सत्याग्रहामुळे अस्पृश्यता नष्ट होवून दलितांना मानवतेचे अधिकार मिळाले. त्यामुळे चवदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवी हक्क लढ्यासाठी प्रेरणादायी आहे. समतेच्या हक्कासाठी प्रेरणादायी आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ना.रामदास आठवले यांनी पक्षबांधणी करण्याचे कडू डोस दिले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे मित्रपक्षाच्या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढु नये. रिपब्लिकन पक्षाने मोठया प्रयत्नाने रिपब्लिकन पक्षासाठी गन्ना किसान (ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह मिळवले आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह मिळालेले आहे. त्यामुळे मित्रपक्षांबरोबर आपण राहु, मात्र मित्रपक्षाच्या भरवशावर निवडणुका जिंकणे हे योग्य नाही. कार्यकर्त्यांना आयते काही मिळणार नाही. त्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतील, कष्ट करुन मतदारसंघ बांधले पाहिजे. स्वबळावर निवडणुका जिंकण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. मित्रपक्षाच्या भरवशावर आणि मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुका लढणे आता कार्यकर्त्यांनी बंद केले पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद दाखवून दिली पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. आंबेडकरी जनतेची ताकद प्रचंड आहे. सत्ता कुणाची हे ठरवण्याची ताकद आंबेडकरी जनतेमध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन आंबेडकरी जनतेची एकजुट होणं महत्वाच आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन सर्व दलित आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, बहुजन समाजासह सर्व आंबेडकरी जनतेची एकजुट होणं आवश्यक आहे. पुन्हा आपली रिपब्लिकन ऐक्याची ताकद आपण दाखवणं गरजेच आहे. रिपब्लिकन ऐक्यांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढ आले पाहिजे. मी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे. आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद दिला पाहिजे. असे सांगत ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #☸️जय भीम #RAMDASATHAWALE ###Politics ##Breakingnews #follow