सरकारी योजना शेतकरी योजना

❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
31.8K views
2 days ago
१ एप्रिलपासून नोकरदार वर्गासाठी पगाराचे आणि नोकरीचे नियम पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवीन 'वेज कोड'नुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (बेसिक पगार) एकूण पगाराच्या ५० टक्के ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कापली जाणारी रक्कम वाढणार आहे. परिणामी, दरमहा हातात येणारा पगार (टेक होम पे) काहीसा कमी होणार असला तरी, निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल. नोकरी बदलणाऱ्या किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालाय. आता राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरीवरून कमी केल्यानंतर कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार आणि इतर सर्व देणी केवळ दोन दिवसांत द्यावी लागतील. यापूर्वी हा हिशोब पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागायचे. या नवीन नियमांमुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मनमानीला लगाम बसणार असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होणार आहे. #🤗1 एप्रिल पासून होणार मोठे बदल 👉 #1 एप्रिल दिन विशेष #📄सरकारी योजना #सरकारी नियम #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
15.9K views
3 days ago
१ एप्रिलपासून देशभरातील नोकरदारांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. नवीन लेबर कोड आणि प्राप्तिकर नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत बदल होणार असून, टेक-होम सॅलरी कमी होण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे बेसिक सॅलरी CTC च्या किमान ५०% ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे PF आणि ग्रॅच्युइटीचा वाटा वाढणार असून, हातात मिळणारा पगार थोडा कमी होईल. मात्र, निवृत्तीनंतरचा फंड अधिक मजबूत होणार आहे. यासोबतच, कामाच्या वेळेतही बदल होणार आहेत. आठवड्याला ४८ तास काम, ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन, आणि नोकरी सोडल्यानंतर २ दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंट देणे कंपन्यांना बंधनकारक असेल. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आता १ वर्षानंतर ग्रॅच्युइटी मिळणार आहे. 👉 अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा. #🤗1 एप्रिल पासून होणार मोठे बदल 👉 #🌹1 एप्रिल #📄सरकारी योजना #सरकारी नियम #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
10K views
21 days ago
सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारांत येणारी सुट्ट्या पैशांची अडचण दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेय. आता निवडक एटीएममधून १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा काढणे शक्य होणार असून, यासाठी आरबीआयने 'स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर' या विशेष यंत्रांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलाय. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या योजनेची माहिती दिली. सध्या मुंबईसारख्या शहरांत याची चाचणी सुरू असून, यश मिळाल्यास ही सुविधा देशभर राबवण्यात येईल. देशात लहान नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांचे छपाई प्रमाणही वाढवण्यात आलेय. या निर्णयामुळे ग्रामीण भाग आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सुट्ट्या पैशांसाठी होणारी ओढाताण थांबण्यास मदत होईल. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📄सरकारी योजना #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या .
❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
37.4K views
1 months ago
राज्यातील कामगार वर्गासाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राज्य कामगार विभागाने कामगार कायद्यांमध्ये क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, 👉 आठवड्यात ४८ तास काम पूर्ण केल्यास उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी देण्याची नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, 📌 कामगारांनी जर ४८ तासांचं काम तीन किंवा चार दिवसांत पूर्ण केलं, 📌 तर त्यांना पुढील चार किंवा तीन दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे. हा निर्णय लागू झाल्यास, ✔️ कामगारांचा work-life balance सुधारणार ✔️ मानसिक आणि शारीरिक ताण कमी होणार ✔️ खासगी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठा बदल घडणार यासोबतच, ❗ मालकाने वेळेत पगार दिला नाही तर ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. #कायदा #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #सरकारी नियम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰