Politics....

Dr Ramdas Athawale
537 views
1 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ* मुंबई दि. 05 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या तिस-या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातुन राज्यसभेवर 7 खासदार बिनविरोध निवडुन गेलेले आहेत. त्यात ना. रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिस-यांदा बिनविरोध निवड होवून ना. रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिस-या टर्मची सुरुवात ना. रामदास आठवले उद्या दिनांक 6 एप्रिल2026 पासुन करणार आहे. ना. रामदास आठवले यांची एप्रिल 2014 ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये दुस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांच्या दुस-या टर्मची मुदत होती. उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत ना. रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दिनांक 6 एप्रिल 2026 पासुन राज्यसभेच्या त्यांच्या तिस-या टर्मला सुरुवात होणार आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 ते एप्रिल 2032 पर्यत ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. नारामदास आठवले यांना तिस-यांदा राज्यसभेवर निवडुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे. आपल्या तिस-या राज्यसभा सदस्यत्वाची ना. रामदास आठवले उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत शपथ घेणार आहेत. त्यांना देशभरातील आंबेडकरी जनतेने शुभेच्छा दिलेल्या आहेत. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख ##Breakingnews #follow #Politics.... #RAMDASATHAWALE #☸️जय भीम
Dr Ramdas Athawale
535 views
2 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *मी कुठल्याही बाबाकडे जात नाही तरीही मला मंत्रीपद मिळते - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* पुणे / मुंबई दि. 04 - नाशिकचे खरात, त्याच्या चुकीमुळे गेले आहेत जेलच्या दारात, अशा ओळी सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी खरात प्रकरणावर भाष्य केले. माझा कुठल्याही बाबावर विश्वास नाही, कुठल्याही बाबाकडे मी जात नाही. तरीही मला माझे पद, मंत्रीपद मिळत आहे. कोणीही भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खरातबरोबर अनेकांची नावे जोडली गेली असली, त्याच्याबरोबरचे फोटो असले, त्याच्या गैरप्रकाराशी त्यांचा संबंध असेल असे नाही. त्यामुळे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिकाही ना. रामदास आठवले यांनी मांडली. रिपब्लिकन पक्षाची कार्यकारणी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर ना. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सत्याग्रह केला होता. त्या घटनेचे शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे. सामाजिक समता परिषद आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी नेते, विचारवंत यांना बोलवण्यात येणार आहे. जाती व्यवस्था बदलली पाहिजे. त्यासाठी अनेक शहरात परिषद होणार आहे. तसेच समता परिवर्तन यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरला सातारा येथून ही यात्रा सुरू करून त्याचा समारोप पुण्यात होईल. वेगवेगळे जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी यात्रा जाणार आहे, असे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. आमचे उपमहापौर यांच्यावर अन्याय होता कामा नये. महत्त्वाच्या बैठकीला आमच्या उपमहापौर यांना बोलावले पाहिजे. या बाबत केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्याशी या बाबत चर्चा केली जाईल. कोणताही वाद राहू नये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर हा विषय घातला जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही ना. रामदास आठवले यांनी नमूद केले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE #☸️जय भीम
Dr Ramdas Athawale
539 views
3 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 02 - आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चार उमेद‌वार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित 122 जागांवर भाजप प्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला असल्याचे अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील 7 राज्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ना. रामदास आठवले यांनी आसाम विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टीकोन देशभरातील जनतेला आणि आसाममधील जनतेलाही पटलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मुख्यमंत्री हिमंता बिसवा यानी आसामचा सर्वांगीण विकास केला आहे. पायाभूत सुविधा उभारुन आसामचा वेगवान विकास होत आहे. त्यामुळे आसामची जनता भाजप प्रणित एनडीएला बहुमताने विजयी करेल. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनीही भाजप उमेद‌वाराना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. आसाममधील धींग या विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे हिरक ज्योती बोरा तसेच किंगसुकीया विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे इजराईल नंदा, मोरीगाव विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे चेनीराम कोनवार, आणि गौरीपुर विधानसभा मतदारसंघात सैदुर रहमान सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे चारही उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढत आहेत. या चार उमेद‌वारामधुन जे उमेदवार निवडून येतील ते रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा भाजपप्रणित एनडीएला देतील. रिपब्लिकन पक्षाचे जिंकून येणारे उमेदवार सरकार स्थापन करण्यास भाजपला समर्थन देतील अशी अधिकृत घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली. ना. रामदास आठवले हे आसामच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या रिपब्लिकन पक्षाच्या चारही उमेद‌वारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. तसेच भाजपच्याही उमेदवारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. आज त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य भारतातील पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, त्रिपरा, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपुर या सातही राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. | हेमत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #☸️जय भीम #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE
Dr Ramdas Athawale
6.5K views
7 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *एकेकाळी 12 नगरसेवक निवडुन आणणारा रिपब्लिकन पक्ष मुंबईत कुठे आहे ? - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुनावले कार्यकर्त्यांना खडे बोल* मुंबई दि. 30 - रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहे. मणिपुरमध्ये पक्षाला 17 टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाला आहे. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्र पक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते मुंबईचे महापौर पद ही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवुन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समजाला सोबत घेवुन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबुत पुर्नबांधणी करा. असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले. चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य बौध्द धम्म गुरु डॉ. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमीत्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडुन आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडुन आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागुन मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन , आदिवासी सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणुन मी दिल्लीचे तख्त गाठु शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकटयाला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही. आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे. तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. मी कधीच मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढलो नाही. आपल्या पक्षांवर आपण प्रेम केले पाहिजे. गन्ना किसान हे आपल्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळाले आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक जिंकता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करुन पक्षबांधणी करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. माझ्या भिमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार, म्हणून चेंबुरमध्ये होत आहे माझा सत्कार माझ्या आयुष्यात मी कधी मानली नाही हार कारण मी दुश्मनांवर करीत आलो वार सर्वांसाठी माझे उघडे असते दार कारण देशभरात जागी केली दलित नार अशी कविता ना. रामदास आठवले यांनी सादर केली. यावेळी या सत्कार सोहळयाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, सुरेश बारसिंग, फुलाबाई सोनवणे, अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धिरज उबाळे, शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, भाजप नगरसेविका आशा मराठे, रिपाइंचे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, रिपाइंचे मुंबई सरचिटणीस विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख, अजित रणदिवे, रमेश गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, रवि गायकवाड, सुभाष साळवे, अनिस पठाण आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते. यावेळी फाईन आर्ट सभागृह गर्दीने फुलुन गेले होते. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख ###Politics ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #follow
Dr Ramdas Athawale
569 views
10 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन* *पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश* *राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश* मुंबई दि.27- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या पक्षांनी ; विविध रिपब्लिकन गट, विविध संघटनांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे; त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. आंबेडकरी चळवळीतील विविध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात सामील झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष अधिक बलशाली करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनीही रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हाती घेतला पाहिजे. रिपब्लिकन पक्षात सामील होऊन रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट केला पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद सुर्वे;मुंबई अध्यक्ष मंगेश पगारे; राज्य महासचिव डॉ उमेश पवार; राज्य उपाध्यक्ष अशोक तांबे; शशिकांत शिंदे; मोहन बोदडे; नरसिम मुच्छा कट्टा; भीमसेन जाधव; रोहिदास वाघमारे; अनिल लागाडे ; गोविंद साळवी; विक्रम बमना; विजय पंडागळे; तुकाराम हेगडे; चंद्रकांत रुपेकर; कविताताई निकम; फिरोझ शेख; राजू पांचाळ; जोनभाई सांडेवाल; सारिकताई सकपाळ ; राजू कवंदर; लक्ष्मी अम्मा देवेंद्र; माधव कट्टार यांच्यासह शेकडो पीपल्स रिपब्लिकन महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडून मिलिंद सुर्वे यांनी आपल्या नेतृत्वात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगळा गट स्थापन केला होता. त्यांच्या नेतृत्वात मुंबई आणि राज्यातील अनेक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कार्य करीत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे प्रमुख असणारे मिलिंद सुर्वे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षामध्ये ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या जाहीर पक्ष प्रवेशाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी केली. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अनेक छोटे मोठे गट आहेत. अनेक संघटना आहेत, अनेक आंबेडकरी विचारवंत चळवळीत कार्य करीत आहेत. आपले स्वतंत्रपणे आणि वेगवेगळे कार्य करणाऱ्या या छोट्या मोठ्या संघटना, गटांनी आणि पक्षांनी रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत केला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशभर मजबूत होत आहे. नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता आहे. आता आणखी दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाल्यास एकुण 4 राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळेल. 4 राज्यात मान्यता असणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. भाजप, काँग्रेस, बसपा, आणि आम आदमी पक्षानंतर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून लवकरच मान्यता मिळेल. त्या दृष्टीने आपले काम सुरू असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. सद्या देशात 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने गन्ना किसान हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांत रिपब्लिकन पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पाँडिचेरी आणि पश्चीम बंगाल या दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे भाजपला पाठिंबा आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ मधील काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहील.असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला मान्यता दिल्याने विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुका लढणे हे रिपब्लिकन पक्षाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे काहीं जागांवर रिपब्लिकन पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहणार आहे. असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पु कागदे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. हेमंत रणपिसे प्रसिध्दी प्रमुख ##Breakingnews #follow #☸️जय भीम #RAMDASATHAWALE ###Politics
Dr Ramdas Athawale
594 views
11 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा - केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 26 - व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे, असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन 2020 ते 2025 या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते. पुढे बोलताना ना.रामदास आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. देशाचे भविष्य तरुणाईच्या हातात आहे. ही तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडने ही गंभीर समस्या आहे. व्यसन ही सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी सरकार कडून कठोर पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन देखील ना.रामदास आठवले केले. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय टाळावे हे स्वतः ठरवायचे असते, पण व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. एखादे कुटुंब वाचविणे हेच मोठे यश असून त्यातून मिळणारा आशीर्वाद हा खरा ठेवा आहे, असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले. पुरस्कारांतर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी 15 हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, साडी, खण आणि श्रीफळ तसेच संस्था पुरस्कारासाठी 30 हजार रुपये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले या 5 वर्षांच्या पुरस्कार निवडीमध्ये एकूण 100 व्यक्ती व 13 संस्थांचा समावेश आहे. या 100 व्यक्तींपैकी 88 पुरुष व 12 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणि संस्थांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला ना. रामदास आठवले यांनी व्यसनमुक्तीवर काही कविता सादर केल्या..... जर केली तुम्ही रोज नशा; तर समाजात होईल तुमचा हशा ; तुम्ही आहात आमची फार मोठी आशा, आणि मराठी आहे आमची भाषा ! मग का करता तुम्ही नशा? मी करतो नशा... पण ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नशा !! म्हणुन आहे माझ्या जीवनात फार मोठी आशा !!! होईल जर व्यसनमुक्ती; तर वाढेल महाराष्ट्राची शक्ती ! भेंदुबाबाची करु नका भक्ती, असं केल तर कधी होणार नाही तुमची मुक्ती ! ना.रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत या कविता सादर करताच सभागृहात प्रचंड टाळया आणि हशांनी प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow #☸️जय भीम #Politics.... #RAMDASATHAWALE ##Breakingnews
Dr Ramdas Athawale
611 views
13 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट* नवि दिल्ली दि. 24 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सलग तिस-यांदा आपली राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार मानले. यावेळी ना.रामदास आठवले यांनी निळी शाल आणि पुष्पगुच्छ देवुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. आपल्याला सलग तिस-यांदा राज्यसभेवर संधी देवुन केंद्रीयमंत्रिमंडळात सामाजिक न्यायराज्यमंत्री पदाची संधी कायम ठेवल्याबद्दल देशभरातील आंबेडकरी जनतेत, बहुजन समाजात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. राज्यसभेवर तिस-यांदा आपली निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आणि देशभरातील आंबेडकरी जनतेत आनंद साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी यावेळी अनेक विषयांवर ना.रामदास आठवले चर्चा केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ना.रामदास आठवले यांना आता आपण राज्यसभेत 6 वर्ष रहा आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. देशात जणगणना सुरु आहे त्यात धर्मांतरीत बौध्दांच्या जनगणनेविषयी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. दिवंगत प्रधानमंत्री व्हि पी सिंग यांच्या काळात महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. बौध्दांच्या धर्म या रकान्यात बौद्ध आणि जात या रकान्यामध्ये पुर्वाश्रमीच्या जातीच्या अनुक्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. पुर्वाश्रमीच्या महार जातीने महाराष्ट्रात बौध्द धम्मात धर्मांतर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांच्या जनगणनेचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ जातीचा उल्लेख न करता धर्माच्या रकान्यात बौध्द आणि जातीच्या रकान्यात पुर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक 59 हा क्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अनुसुचित जातीच्या यादीत महाराष्ट्रातील महार ही जात 59 क्रमांकावर आहे. जातीचे नाव न लिहीता जातीचा अनुक्रमांक जातीच्या रकान्यात लिहीला पाहिजे अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव आहे. पूर्वी या स्कॉलरशिपमध्ये केवळ भारत सरकारची 10 टक्के रक्कम आणि राज्य सरकारची 90 टक्के रक्कम दिली जात होती. 10 टक्के केंद्र सरकारचा निधी असताना या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव दिले होते. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करुन भारत सरकारच्या वतींने देण्यात येणारी स्कॉलरशिप मधील 10 टक्के रक्कम वाढवून 60 टक्के करण्यातआली . त्या स्कॉलरशिप मध्ये आता भारत सरकारचा वाटा 60 टक्के आणि राज्य सरकारचा वाटा 40 टक्के या अशा पध्दतीने भारत सरकार च्या स्कॉलरशिपची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मागील 15 वर्षापासुन या स्कॉलरशिपच्या रक्कम मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तेव्हा अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या स्कॉलरशिपमध्ये महागाईच्या निर्देशाप्रमाणे वाढ झाली पाहिजे. त्यामुळे स्कॉलरशिपच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर आपण विचार करु असे आश्वासन ना.रामदास आठवले यांना दिले. प्रधानमंत्र्यांनी सदाबहार असा माझा संसदेत गौरवाने उल्लेख केला. तुम्ही मला म्हणत आहात सदाबहार, कारण मी करतो कॉग्रेसवर प्रहार अशी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्र्यांना आपली शिघ्र कविता यावेळी ऐकवली. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE ##Breakingnews #Politics.... #☸️जय भीम #follow
Dr Ramdas Athawale
628 views
14 days ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे समर्थन* मुंबई दि. 23 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचे समर्थन केले असून, " रिपब्लिकन पक्ष" हा केवळ एका समाजाचा पक्ष राहू नये, अशी भूमिका मांडली आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी या उपवर्गीकरणाला समर्थन दिले आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वच घटकांचा समावेश पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही तशी अपेक्षा होती. विरोध केल्यास रिपब्लिकन पक्ष फक्त महार, बौद्धांचा पक्ष आहे, असा संदेश जाईल. पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार होते. ते सर्व बौद्ध समाजाचे आहे, असे म्हणत होते. इतरही समाजातील लोक रिपब्लिकन पक्षासोबत आले पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. सर्वच जातीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिते. परंतु ते करताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पोहिजे. आरक्षणामुळे बौद्ध समाजाने शिक्षणाचा लाभ घेतला. ते शिकल्याने फायदा झाला. तसाच इतरांचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे उपवर्गीकरण योग्य आहे. बदर समितीचा अहवाल आला असून सरकार योग्य निर्णय घेईल, असे ना. रामदास आठवले म्हणाले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उपवर्गीकरणाचे त्यांनी समर्थन केले. तर व्हीजेएनटी समाजातील घटक मागास आहे. त्यांना वेगळे आरक्षण दिले गेले पाहिजे. त्यांना राजकीय आरक्षणही मिळाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जात वैधता प्रमाणपत्रासाठी १९५० च्या पुराव्याची अट जाचक समजल्या जाते. परंतु हा केंद्राने नियम केला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू, असे ना. रामदास आठवले म्हणाले. दलितांवर आजही अत्याचाराच्या घटना होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा करण्यात आला. परंतु त्याचा गैरवापर होता कामा नये. ज्यांनी अत्याचार केला, त्याच्यावरच हा कायदा लावल्या गेला पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात चौकशी झाल्यावरच अटक करता येईल, असे सांगितले होते. त्यावर ना. रामदास आठवले म्हणाले की, अॅट्रॉसिटी हा केंद्राने केलेला कायदा आहे. त्यात राज्याला बदल करण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्ष- आठवले पक्षाला दोन राज्यात मान्यता आहे. त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पोर्टब्लेअरला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १७ मे महिन्यात होणार आहे. त्याच प्रमाणे तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीत निवडणुका लढविण्यात येतील. पश्चिम बंगालमध्ये भाजपला समर्थन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य पाहिजे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी याचे नेतृत्त्व करावे असेही ते म्हणाले. अशोक खरातांवर कारवाई झाली पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. लोकांनी श्रद्धा ठेवावी, परंतु अंधश्रद्धा ठेवू नये. दिल्लीत मला अनेक बाबा भेटायला बोलावतात. परंतु, मी जात नाही. बाबाच माझ्याकडे येतात, असे ना. रामदास आठवले म्हणाले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #Politics.... ##Breakingnews #follow ###Politics #RAMDASATHAWALE