छोटा भीम सैनिक💙💙💙💙

Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
7K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध धम्म.... बुद्ध, बोलणाऱ्यास बोलताना परिणामाचा विचार करुन बोलण्याचा सल्ला देतो. तो म्हणतो- आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा (प्रज्ञेचा) वापर करुन योग्य परिणामाचा विचार करुन बोला. मुर्खाचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून अकुशल कर्म घडेल आणि तुम्ही दुःखी व्हाल. शहाण्याचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून कुशल कर्म घडेल आणि तुम्ही सुखी व्हाल. समाजात सुख, संमृद्धी, शांतता नांदण्यास मुसाबादा वेरमणी ह्या शील पालनाची प्रत्येक माणसास गरज आहे, असे बुद्ध सांगतो. सुरामेश्यमज्ज पमाद‌ठ्ठाना वेरमणी : 'व्यसनाधिनता' ही आज प्रत्येक देशातील समाजाची गंभीर समस्या बनली आहे. व्यसनाधिन माणूस स्वतः ही सुखाने जगत नाही आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू देत नाही. अशा माणसाच्या घरात नेहमी कलह व भांडण असते. असा माणूस पहिल्या चारही शीलांचा भंग करु शकतो. हा प्रमादी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचाही असू शकतो. बुद्धाने ह्या शिलाद्वारे जो उपदेश केला आहे तो नीट समजून घेणे आवश्यक ठरते. चारही शीलांत नसलेला एक शब्द 'पमाद' (प्रमाद) ह्या शीलात आहे. त्याचे इथे विशेष महत्व आहे. सुरा ही धान्याचा अर्क, तर मेरय ही फळाचा अर्क. ह्या दोन्हीचा उपयोग औषध म्हणून अणि व्यसनासाठी मादक पदार्थ म्हणून केला जातो. वैद्याच्या सल्ल्याने रोग्याने, रोग निवारक औषध म्हणून वैद्याने सूचविलेल्या प्रमाणात, योग्य वेळी घेतले तर हे कुशल कर्म ठरेल; याला बुद्ध विरोध करीत नाही. परंतु निरोगी माणसाने, वैद्याचा सल्ला न घेता गरज नसताना प्रमाणाबाहेर हा अर्क (दारु) ढोसून घेतला तर तो प्रमादास (गुन्ह्यास) कारणीभूत ठरेल. म्हणजे हे त्या माणसाने केलेले अकुशल कर्म ठरेल. याला बुद्ध विरोध करतात. 'धम्मपदात' एक गाथा आहे' "अप्पमादो अमत पदं, पमादो मच्चूनो पदं।" अर्थ- अप्रमादी असणे (गुन्हेगार नसणे) हा (आदर्श) जीवनाकडे नेणारा मार्ग आहे, तर प्रमादी (गुन्हेगार) असणे हा मृत्युकडे (विनाशाकडे) नेणारा मार्ग आहे. पंचशीलांचे पालन करणारी व्यक्ती ही, गुन्हेगार प्रवृत्तीपासून मुक्त असते. जगातील प्रत्येक समाजाचे शासन, सुव्यवस्थेसाठी अनेक योजना राबवत असते. आणि त्यादृष्टीने लोकशिक्षणाची व्यवस्था करते. चीनमध्ये इ.स.च्या पहिल्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञानाचा समावेश सार्वजनिक शिक्षणात केला जात आहे. पंचशील हे व्यक्तीच्या जीवनाचे मापदंड, प्रमाणक Standard आहे, असे बाबासाहेब 'बुद्ध आणि त्याचा धम्म' मध्ये सांगतात. पंचशील पालनाने व्यक्ती सदवर्तनी व आदर्श बनते. धम्माचा प्रारंभ याचसाठी शीलपालनाने, माणसाला सदाचारी बनविण्यासाठी केला पाहिजे, असे बाबासाहेब सांगतात. बुद्धाची अन्य शिकवण : समता : माणसामाणसात, त्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी बुद्ध भेदभाव मान्य करीत नाही. स्त्री-पुरुष असमानता मान्य करीत नाही. मात्र स्त्री सुरक्षिततेची काळजी घेतो. उपासक वा भिक्खू होण्यास कोणतेही धंद्याचे वा जातीचे बंधन मान्य करीत नाही. त्यापूर्वी विशिष्ट जातीच्या पुरुषांनाच सन्यास घेण्याचा अधिकार होता. त्याला बुद्धाने नाकारले. बुद्ध सर्वांना समान लेखतो आणि प्रत्येकाला व्यक्तीमत्व विकासाची व प्रगतीची संधी बहाल करतो. स्त्रीयांना सुद्धा प्रव्रज्येचा अधिकार देतो. कम्मसिद्धांत : बुद्ध सांगतो पेराल तसे उगवेल, कुशलकर्म- चांगले काम, हितकारक काम कराल, तर त्याचे चांगलेच फळ मिळेल. तुमचा मुक्तीदाता, कुणी बाहेरचा परमेश्वर वा अन्य नाही. तुम्हालाच तुमचा उद्धार करावयाचा आहे. 'अत्ताही अत्तनो नाथो।' तुम्ही स्वतःच स्वतःचे स्वामी आहात. यासाठी तसे कुशल कर्म करा. स्वतःला विकसित करा. विकासाची इच्छा बाळगा (Desire to develop) हे तत्व म्हणजेच बुद्धाचा कम्म सिद्धांत होय. चित्त आहे, आत्मा नाही : प्रत्येकाला मन म्हणजेच चित्त आहे. चित्त हे निरंतर प्रवाही आहे. चित्त चंचल आहे. ते मनोविकाराने म्हणजे लोभ (Greed) मोह, (Attraction) आणि विचिकित्सा, अज्ञान (Stupidity, Illusion) यांनी विचलित होते. माणसावर नियंत्रण ठेवणारे असे एखादे, आत्मा नावाचे (Sole) स्थीर तत्व शरीरात किंवा अन्य कुठेही नाही, असे बुद्ध मानतो. गॉलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन, आणि स्टीफन हॉकींग्ज अशा अनेक महान शास्त्रज्ञांनी आत्मा, परमात्मा, पृथ्वी व सृष्टीची निर्मिती, तिची संरचना आणि निसर्गाचे कार्य याबद्दल जे हल्लीच्या युगात संशोधनांती सांगितले तेच बुद्धाने काय म्हणावे ? अडीच हजार वर्षापूर्वी भारतीयांना सांगितले. पण ऐकतो कोण? याला भारतीयांचे ध्यान : चित्ताला/मनाला कुशल कर्मावर स्थिर करणे म्हणजे चांगल्या वा हितकारक कामात मनाला गुंतवून ठेवणे, अशी ही चित्ताची एकाग्रता, हे ध्यान आहे. चित्ताला वाईट (अकुशल) अहित कारक विचारात, कामात प्रवेश करु देऊ न देणे, मनात वाईट विचार आला तर मनाला त्यापासून परावृत्त करणे हे ही ध्यान आहे. मनात चांगला विचार आला तर मनाला त्यात गुंतवून ठेवणे हे ही ध्यान आहे. हे सारे माणसाच्या आयुष्यभर चालले पाहिजे. ध्यान विकसित करण्यास अनेक माणसे मार्गदर्शकाकडून सराव करुन घेतात. दीर्घ कालीन ध्यान ही समाधी असते. कुशल कर्मावरुन कधीही विचलीत न होणारे मन/चित्त हे स्थीर चित्त असते. असा माणूस 'सम्म समाधीस' (सम्यक समाधीस) पात्र ठरतो. हे कार्य कठीण आहे. सम्म समाधी प्राप्त माणसाच्या मनातील सर्व विकारांचा नाश झालेला असतो. ही स्थिती 'निर्वाणास' (दुःख मुक्तीस) पोषक असते. चित्ताची सततची ही जागृतावस्था म्हणजेच अर्हतत्व. लोभ, राग, द्वेष, मोह यांचा कसलाही प्रभाव होऊ न देणारे चित्त, हे अर्हताचे चित्त असते, असे बुद्ध सांगतो. क्षण भंगुरता : जगात स्थीर असे काहीही नाही. जगात सतत परिवर्तन होत असते. म्हणजे जगातील सारं काही अनित्य आहे, क्षणभंगूर आहे म्हणून जगातील कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा ही बुद्धाची शिकवण आहे. याचा 'प्रतित्य समुत्पादाशी' संबंध आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ह्या कार्यकारण भावालाच 'प्रतित्य समुत्पाद' म्हणतात. हे प्रथमतः बुद्धाने जगाला सांगितले. म्हणून जगातल्या वैज्ञानिक संशोधन कार्याचा प्रारंभबुद्धापासून होतो, असे म्हटले जाते. शीलपालन, समानता, बुद्धाचा कर्मसिद्धांत, आत्मा परमात्म्यावरील अविश्वास सम्मसमाधी, अनित्यता, प्रतित्य समुत्पाद सांगणारा बुद्धाचा धम्म व्यक्तिला सदाचारी, कार्य करण्यास सक्षम आणि जबाबदार बनवून त्याच्यात आत्मविश्वास जागवितो. व्यक्तिला निर्भय बनवितो. खऱ्या अर्थाने संपूर्णपणे स्वतंत्र बनवितो. म्हणून धम्म, बहुजन हिताय, बहुजन सुखाय असतो... मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक संदर्भ ग्रंथ : १. The seeker's Glossary of Buddhism, Sutra Translation committee of US and Canada. २. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदिक्षेचा अविस्मरणीय इतिहास वामनराव गोडबोले. सुप्रिया प्रकाशन, अलंकार चित्रपट गृह, नार्थ अंबाझरी, ३. नागपूर-१० बुद्ध आणि त्याचा धम्म. The Buddha and this Dhamma, Dr. B. R. ४. Ambedkar बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-११ बौद्ध पूजापाठ - डॉ. बी. आर. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-१६, पृष्ठ क्र. -७२३ ते ७४२. ५. Buddhism as an Education, Ven. Master Chin-king. #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
589 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
डॉ. आंबेडकरांची मुलाखत... १९५५ च्या पहिल्या तीन महिन्यांत लंडनच्या ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कारिशनचे मॉरिस ब्राऊन आणि फ्रान्सिस वॅटसन यांनी भारताला भेट दिली. येथे त्यांनी प्रवास केला. मुलाखती घेतल्या आणि जे लोक काही विशेष सांगू शकतील याची त्यांना कल्पना होती त्यांचे ध्वनिमुद्रण केले. महात्मा गांधींसंबंधीच्या त्यांच्या आठवणी आणि मते ध्वनिमुद्रित केली. त्यांनी घेतलेल्या डॉ. आंबेडकरांच्या मुलाखतीतील काही भाग पुढे दिला आहे. चर्चेतील सातत्य टिकवण्यासाठी इतरांची मतेही तशीच ठेवली आहेत. मीराबेन : आम्ही कारमधून गेलो. मी एक प्रकारच्या समाधी अवस्थेत होते. माझ्या मनात एकच विचार होता तो म्हणजे बापूंच्या चरणाशी जाण्याचा आणि तरीही मला रस्त्यावरचे सारे काही दिसत होते. प्रत्येक दगड, विटांच्या वाटेतील प्रत्येक वीट, फळझाडे प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब माझ्या मनःपटलावर उमटत होते. जेव्हा तीव्र भावनेच्या आवेगात आपण असतो तेव्हा घडते तसेच सारे घडत होते. नदीकाठाशी असलेल्या त्या खोलीत आम्ही शिरलो आणि बापू तेथे होते. मला खरे तर फक्त एक तेजस्वी प्रकाशझोत दिसला आणि मी ओळखले हेच बापू, ते उठले आणि माझ्या दिशेने आले. मी गुडघ्यावर बसले आणि त्यांनी मला वर उठवते, आपल्या कवेत घेतले आणि म्हणाले, 'तू माझी मुलगी.' आणि मी बापूंच्या जेवढी निकट गेले तेवढे कोणीही कोणाच्या निकट जाऊ शकत असेल असे मला कधीच वाटले नव्हते. कमालीचे साधे, कमालीचे स्वाभाविक आणि तरीही इतक्या उंचीवर। निवेदक : आपण आता खूप उंचावर आहोत, त्या संतासोबत, त्या महात्म्यासोबत. बी. आर. आंबेडकर : ते कधीच महात्मा नव्हते. मी त्यांना महात्मा म्हणणार नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधी त्यांना 'महात्मा' म्हटले नाही. ते त्या अभिधानाला पात्र नाहीत. अगदी नैतिक दृष्टिकोनातूनसुद्धा नाहीत. निवेदक : विरोध, भारतातील अनुसूचित जातीचे अस्पृश्यांचे राजकीय नेते डॉ. आंबेडकर यांचा विरोध अनुसूचित जातींना हिंदुत्वाच्या छत्राखाली आणून आणि त्यांच्या सर्व सामाजिक अपात्रतांचा निरास करून गांधी अस्पृश्यतेचे उत्पादन करू पाहात होते. एक स्वतंत्र समाज म्हणून त्यांना संरक्षण मिळवन देण्याचे प्रयत्न डॉ.आंबेडकर करत होते. ते गांधीना नैतिकदृष्ट्या चूक आणि राजकीयदष्टा धोक्याचे वाटत होते. अत्यंत निकराचा हा लढा होता. त्याचेच पर्यवसान गांधींच्या एका सुप्रसिद्ध उपोषणात झाले होते. बी. आर. आंबेडकर : खचितच ते एकसारखी घासाघीस करत होते. मी तुमचा जीव वाचवण्यास तयार आहे. पण हे पहा तुम्ही उगाच कडक अटी घालू नका. आमच्या लोकांचा जिवाचा बळी देऊन मी काही तुमचा जीव वाचवू शकणार नाही मी नेहमी सांगतो की विरोधक म्हणून मी मिस्टर गांधीना भेटलो तेव्हा मला अशी भावना होती की या माणसाला मी इतर अनेक जणांपेक्षा अधिक चांगला ओळखतो कारण त्यांनी त्यांचे अंतरंग माझ्यासमोर उघडे केले होते आणि हा माणूस आतून कसा आहे ते मी पाहू शकलो होतो... निवेदक : पण महात्मा या कल्पनेबद्दल साशंक असण्यासाठी कोणाला काही त्यांचे विरोधकच असण्याचे कारण नाही. जे.वी. कृपलानी हे भारतीय समाजवादी पुढारी काही त्यांचे विरोधक नव्हते. १९१७ पासून गांधीजींच्या मृत्यूपर्यंत ते त्यांचे अनुयायी होते जे. बी. कृपलानी : नरश्रेष्ठाची कल्पना गांधींनी नाकारली होती. ते असेही म्हणायचे की ते जर महात्मे असते तर तुम्हाला त्यांनी समजून घेणे शक्य झाले नसते माझ्या मते मूलतः गांधींचा संदेश हा सामाजिक, राजकीय व आर्थिक होता. सामान्यतः आध्यात्मिकचा जो अर्थ घेतला जातो त्या अर्थाने तो आध्यात्मिक नव्हता. मी असे म्हणेन की आधीच आपल्याकडे खूप देवदेवता आणि नरश्रेष्ठ आहेत, तेव्हा गांधीना माणूस म्हणूनच राहू द्यावे. धीरेंद्र मोहन दत्त : मला स्वतःला महात्मा गांधी हे खास भारतीय कधी वाटलेच नाहीत. निवेदक : डॉ. दत्त हे सुप्रसिद्ध तत्वज्ञ आहेत. हल्ली ते रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनात वास्तव्य करून आहेत. शांतिनिकेतन हे आता विद्यापीठ आहे. धीरेद्र मोहन दत्त : आधुनिक हिंदूसाठी ते आदर्शवत आहेत, ही मंडळी स्वतःचे युरोपीय शिक्षण आणि युरोपीय पार्श्वभूमी वगैरे सांभाळून ज्याचे अनुकरण करू शकतात जसा ते आदर्श आहेत. हिंदू आदर्शाबद्दल त्यांना सहज सहानुभूती वाटू शकते. पण पुराणमतवादी हिंदूंच्या दृष्टीने मात्र ते विश्वासघातकी आहेत. त्यांचे हिंदुत्व हे खरे हिंदुत्व नाहीच. बी. आर. आंबेडकर : ते निरपवादपणे पुराणमतवादी हिंदू होते. निवेदक : असे डॉ. आंबेडकरांना वाटते. इतरही अनेकांना वाटते, पण सर्वांना नव्हे. मुस्लिमांना वाटत नाही. त्यांच्यापैकी काहींच्या दृष्टीने गांधींचे वेगळेपण हे त्यांच्या अस्पृश्यांविषयीच्या भूमिकेमुळेच होते. बी. आर. आंबेडकर : त्या सर्व अस्पृश्यतेबद्दलच्या गप्पा केवळ अस्पृश्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे एवढ्यासाठीच होत्या. ही एक गोष्ट आणि दुसरी अशी की त्यांच्या चळवळीला अस्पृश्यांनी विरोध करू नये अशी गांधींची इच्छा होती. यापलीकडे त्यांच्या मनात उद्धाराच्या खऱ्याखुऱ्या प्रेरणा होत्या असे काही मला वाटत नाही. औएच. एन. ब्रेल्सफोर्ड : एकदा ते असे म्हणाले होते की भारतीय लोकांपैकी ८५ टक्क्यांचे ते प्रतिनिधित्व करतात. ठीक आहे त्यात थोडीफार अतिशयोक्ती होती, कारण मुस्लिमांपैकी अगदीच छोट्या गटाचे ते प्रतिनिधित्व करत होते. पण हिंदू, शीख आणि अगदी अस्पृश्यांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा दावा खराच होता. निवेदक : सर्वच बाबतीत त्यांचा दावा प्रामाणिक होता. इतर कोणाही पेक्षा त्यांनाच अस्पृश्यतेचा प्रश्न हा आपला स्वतःचा प्रश्न वाटत होता. या संदर्भात त्यांचे ब्रेल्सफोर्ड यांच्याशी काही खासगी संवाद झाले होते. एच. एन. ब्रेल्सफोर्ड : ते या विषयावर इतके कळवळून बोलत असत की त्यावरून त्यांना त्याबद्दल एक कमालीची प्रातिनिधिक अपराधभावना छळत असावी हे स्पष्ट जाणवत असे. त्यांच्या लोकांनी म्हणजेच हिंदू राष्ट्राने त्या बहिष्कृतांना किती अघोरी पद्धतीची वागणूक दिली हे त्यांना माहीत होते, आणि म्हणून तेवढ्यासाठी त्यांनी पक्के ठरवले होते की आता त्यांच्याच लोकांनी म्हणजेच हिंदू राष्ट्रानेच सर्व बाबी नीट लावल्या पाहिजेत. निवेदक : सर्व बाबी नीट लावण्याचा स्वतः गांधींनी जो प्रयत्न केला ती त्या काळी एक नवीच मोहीम होती. त्यात एक नवा उत्साह होता. अगदी सुरुवातीच्या टप्यावर डॉ. व्हेरियर एल्विन हे त्यांच्यासोबत काही महिने भारतात होते. व्हेरियर एल्विन : होय. ते १९३१ साल असावे. त्यांच्यासोबत अहमदाबादच्या एका बिनीच्या मित्तमालकाच्या खासगी मंदिरात मी गेलो होतो. गांधींनी अस्पृश्य मुलांची एक टोळीच मंदिरात नेली. हे घडले तेव्हाचे पुजाऱ्यांचे चेहरे मला अजून आठवतात. त्यांना हे मुळीच आवडले नव्हते. पण त्यानंतर गांधींनी एक बैठक घेतली. बैठकीत बोलताना ते म्हणाले की येथून पुढे अस्पृश्यांना ईश्वराची मुले हरिजन असे संबोधण्यात यावे. तेव्हापासून ते त्याच नावाने ओळखले जाऊ लागले. निवेदक : पण गोलमेज परिषदेत एक नवा आणि भयोत्पादक चेहरा पुढे आला. अस्पृश्य म्हणून जन्माला आलेले आणि स्वतःच्या गुणांच्या व चारित्र्याच्या बळावर मोठेपणा प्राप्त केलेले डॉ. आंबेडकर तेथे होते. त्यांच्या मते कोण्याही सवर्ण हिंदूंनी त्यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याची गरज नव्हती. बी. आर. आंबेडकर : आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या... निवेदक : आंबेडकर धडक होते. आणि अशमनीय होते. नंतरही कधीच त्यांनी आपली गांधीविषयी भूमिका बदलली नाही. बी. आर. आंबेडकर : त्या सर्व अस्पृश्यतेबद्दलच्या गप्पा केवळ अस्पृश्यांनी काँग्रेसमध्ये यावे एवड्यासाठीच होत्या. ही एक गोष्ट, आणि दुसरी अशी की त्यांच्या स्वराज्याच्या चळवळीला अस्पृश्यांनी विरोध करू नये अशी गांधींची इच्छा होती. या पलीकडे त्यांच्या मनात उद्धाराच्या खऱ्याखुऱ्या प्रेरणा होत्या असे काही मता वाटत नाही. निवेदक : पण गांधींच्या प्रेरणा विशेषतः ते भारतात परत गेले तेव्हा बयाच प्रबळ होत्या. पुष्पाच्या सुप्रसिद्ध उपोषणात त्यांची कसोटी होती. ते तयार होते. प्यारेलाल महणतात त्याप्रमाणे लंडनच्या परिषदेतील संघर्षाच्या दरम्यानच त्यांनी त्याची तयारी केली होती. प्यारेलाल नायर : ते म्हणाले अगदी भारताच्या स्वातंत्र्याखातरही अस्पृश्यांच्या हिताचा बळी ते देणार नाहीत. पण स्वतंत्र मतदारसंघ हे बहुसंख्य सामान्य अस्पृश्य जनतेच्या दृष्टीने हितावह ठरणार नाहीत अभी त्यांची खात्री होती, त्यामुळे ते म्हणाले की ते एकटे पडले तरीही ते त्यास प्रतिकार करतील. प्रसंगी त्यासाठी प्राणांचीही पर्वा करणार नाहीत. त्यावेळीही पुन्हा एकदा शेवटी याचे पर्यवसान काय होईल याचा कोणालाय अंदाज करता आला नव्हता,. संदर्भ बी. बी. सी. टॉकिंग ऑफ गांधी, ओरियन्ट लॉगमन्स, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, लेखन आणि निवेदन फ्रान्सिस वॅटसन, निर्मिती- मॉरिस ब्राऊन पृष्ठे ९, १०, १६,७८ आणि ७९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अनुभव आणि आठवणी लेखक नानकचंद रत्तू #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
608 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#शिक्षणाबरोबर_शीलही_सुधारले_पाहिजे... पूर्वी ठरल्याप्रमाणे रावली कॅप महिला मंडळाच्या विनंतीला मान देऊन, दि. ३ जून १९५३ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सौ. माईसाहेब आंबेडकर यांचेसह रावळी कैपला भेट दिली. सदर प्रसंगी स्त्री-पुरुष समुदाय अतिशय प्रचंड होता. प्रथम अनेक भगिनींनी व संस्थांनी डॉ. बाचासाहेब व सौ. माईसाहेब आंबेडकर यांस हार अर्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण "भगिनींनो व बंधूंनो, आपण शिक्षणाचीच गोष्ट घेऊ. माझ्यावेळी मला शाळेत घ्यावे याचा खल करण्यासाठी ३ दिवस मास्तरांची सभा भरली होती. मला त्यावेळी सरकारकडून ३ रु. स्कॉलरशीप मिळत होती. या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे, या सबबीवर मला सरकारी हायस्कूलमध्ये घ्यावयाचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो. पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये गेलो तर माझ्या ४० वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेले शर्ट असा त्यावेळी माझा अवतार होता. त्यावेळी एल्फिन्सटन हायस्कूलमध्ये असंख्य मुले शिकावयास होती तर महाराचा मी एकटाच पोर त्या शाळेत होतो. आज सिद्धार्थ कॉलेजात पाहा, इतरापेक्षाही आपल्या मुलांचा पोषाख चांगला असतो. पहिल्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजात १५-२० मुलेच होती. परंतु आज पाहा, अस्पृश्यांची ३०० मुले सिद्धार्थ कॉलेजात शिकत आहेत. दुसरी गोष्ट धर्माची. मनुष्याने स्वार्थच करीत न राहता थोडाफार परार्थही केला पाहिजे. यासाठीच धर्माची जरुरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांडरळीसुद्धा भरते. "कबीर कहे कुच उद्दम कीजे! आप खाये, और औरन को दीजे।" या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा, घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा. लोहित नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला दोन प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न हा की विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्गांनाच शिकविली पाहिजे शूद्र या चौथ्या वर्गाला विद्या शिकविता कामा नये, हे तत्त्व तू का मान्य करीत नाहीत? याला उत्तर मिळाले ते असे चार वर्ग हे धंद्याकरिता पडलेले आहेत परंतु ज्ञान हा काही रोजगारीचा प्रश्न होऊ शकत नाही. ज्ञान हे जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले नुकसान होते. उदा. नाशिकला एका शेतकऱ्याकडे एक खतपत्र होते. सर्व काही व्यवस्थित होते. केस त्यांच्या बाजूची व्हावयास पाहिजे होती. परंतु त्याच्या वकिलाने त्याला दगा दिल्यामुळे विरुद्ध निकाल लागला. हे झाले ते त्या शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे झाले. हिंदुस्थानात जातीभेद राहिला, याला मुख्य दोन कारणे आहेत, एकतर सर्वांना शस्त्रे वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट अज्ञान. मी पूर्वजांना पुष्कळ शिव्या देतो की त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार का केला नाही. परंतु त्याला वर वर्णन केलेली परिस्थितीच कारणीभूत होती. 'तव्याया जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा' या न्यायाने आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी मदत केली नाही तरी आपली सुधारणा आपणच केली पाहिजे आणि आपण अशा रीतीने सुधारली तर इतरांना आपणाला दोषी ठरविता येणार नाही. आपला कलंक आपणच काढला पाहिजे. समजा आपल्यातले लोक शिकले, ऑफिसर झाले तर इतरांना त्यांच्या हाताखाली काम करावेच लागणार व त्यांना मान घावाच लागणार, आमची व त्याची स्थिती एक झाल्यावर आपल्याला ते कमी लेखणारच नाहीत. प्रत्येक माणसाची काया, वाचा व मन अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशारीतीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार? त्यांच्यापेक्षा तुमचे कपडे डौलदार असल्यावर तुम्हाला कोण कमी लेखणार? आमच्या उत्रतीचा प्रयत्न आता आम्हालाच करावयास पाहिजे. आपण धर्मासाठी सत्याग्रह केला. धर्मांतराचा ठराव केला, सर्वकाही केले. आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्‌गुणांकडे ओवा असला पाहिजे. अशारीतीने आपण धार्मिक बनावयास पाहिजे, आपण शिकलो म्हणजे सर्वकाही इथले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे, शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तरवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तरवार आहे. तिचा सदुपयोग की दुरुपयोग करावयाचा हे त्या माणसाच्या शौलावर अवलंबून राहील. तो त्या तरवारीने एखाद्याचा खूनही करील किंवा एखाद्याचा बचावही करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील परंतु त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्याकडेही खर्च करील, शील हे धर्माचे मोठे अंग आहे. शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. ज्यांना स्वार्थापलीकडे काही दिसत नाही, ज्यांना थोडाही परार्थ करता येत नाही ती माणसे नुसती शिकली म्हणून काय झाले? त्यांचा दुसऱ्याला उपयोग काय? 'तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा' शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे. ज्योतिबा फुले त्यांना मी आपला गुरु मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला व पुष्कळ मराठेही त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झाली आहे. ज्योतिबाचे नाव आज कोणीच घेत नाही. आज मांग चांभार हे निव्वळ उष्ठ्‌याचे धनी झाले आहेत. प्रगतीचे खरे मालक आम्ही आहोत. आज आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीप्रमाणे पाहात आहेत. परंतु आमची चळवळ निष्काम बुद्धीने व फळाची आसक्ती न धरता चालू आहे. आम्हाला आशा आहे की एक दिवस असा येईल की या वृक्षाचे धनी आम्हीही होऊ. आज जे काही एक न करता चैन करतात, आपण कमविलेले खात आहेत त्यांनाच पुढे शरम वाटेल. प्रत्येकाने बुद्धाचा फोटो आपल्या घरात लावावा एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो... मुक्तीदाता विशेषांक संदर्भ जनता, दि. १३ जून १९५३. #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
598 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत रविवार, ता. २८-७-४० रोजी सकाळी १० वाजता दामोदर ठाकरसी हॉल, परेल बेचे, ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वसतीगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमानाने अस्पृश्य समाजाची जंगी जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब अबिडकरांनी पुढीलप्रमाणे भाषण केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण "आजच्या प्रसंगी विशेष भाषण करण्याची जरुरी नाही. ठाणे बोर्डिंग १९२६ साली काहण्यात आले. १४-१५ वर्षे समाजावर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता ते चालविले. ह्या बोर्डिंगच्या बाबत मुंबई सरकारशी मी काही अटी ठरविल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मुलामागे १० रु. देण्याचे ठरले होते. पण काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी माझ्याशी वाटाघाटी न करता दरमहा मुलामागे १० रुपयांऐवजी ४ रुपये मंजूर केले. प्रत्येक मुलाचा खर्च ४ रुपयात भागवून बोर्डिंग चालविणे अतिशय कठीण काम आहे. आता ठाणे बोर्डिंगची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे. हिंदूंच्या दारी जाणे स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. आपण स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन बोर्डिंग अव्याहत चालविले पाहिजे. बोर्डिंग सतत चालविण्याच्या दृष्टीने आज मिळालेली मदत अपुरी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येईल इतकी मदत करा. ती मदत कशी करावयाची ते तुम्ही ठरवा. पण मला वाटते आपल्यात सुशिक्षित शिक्षक, कारकून इत्यादी मंडळी प्रामुख्याने दिसत आहे. त्यांना दरमहा बोर्डिंगला मदत करणे शक्य आहे. म्यु. युनियनच्या सभासदाकडून वर्षाच्या काठी काही मदत मिळवून द्यावी. लग्नादिविधी होतात त्यावेळी बोर्डिंगला मदत करावी. समाजात १०० च्या वर संस्था आहेत. त्यांनी वर्षाखेर २०-२५ रु. दिल्यास वावगे होणार नाही. पण मला वाटते पैशाच्या अभावी बोर्डिंग बंद पडणार नाही. आपल्या समाजात एकात्र चित्ताने काम करणारा एकही मनुष्य आज वीस वर्षात मला दिसून आला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या सभासदाच्या जागेकरिता १०० अर्ज तयार असतात पण एकेक काम एका मागनि, एकाच ध्येयाने करणारा एकही मनुष्य अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजे, जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. आंह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की त्यांनी मिळविलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहतात. ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयात्मक निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करावयास सुरुवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहणार नाही... मुक्तीदाता विशेषांक संदर्भ जनता, दि. ३ ऑगस्ट १९४०० #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
729 जणांनी पाहिले
6 दिवसांपूर्वी
बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या कर्तव्यावरच बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून... बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक संमेलन पुणे येथे बहिष्कृतांचे सुप्रसिद्ध पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार ता. २ ऑक्टोबर १९२७ रोजी उत्साहाने पार पडले. समारंभासाठी डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल सुशोभित केला होता. संमेलनाचा कार्यक्रम शनिवार व रविवार असे दोन दिवस ठेवण्यात आला होता. शनिवारी विद्यार्थ्यांच्या संभाषणाचे व खेळांचे सामने झाले. या सामन्यात महार मांग व चांभार या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हे नमूद करण्यास आनंद वाटतो. संभाषणात व खेळात बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार होता. त्यासाठी नियोजित अध्यक्ष व बहिष्कृतांचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. सोळंकी, कदम वगैरे मंडळीसमवेत ५ वाजता येऊन दाखल झाले. पाहुणे मंडळीत डॉ. सोळंकी, प्रि. तायडे, रा. श्रीधरपंत टिळक, रा. संगमनेरकर, कदम, ऐदाळे, बाराथ, भंडारे, राजभोज, लांडगे, वायदंडे, डी. सी. मिशनचे रा. पाताडे, सुभेदार घाटगे बंधु, गायकवाड तसेच सेवासदनातील प्रौढ विद्यार्थिनी ट्रेनिंग कॉलेजचे प्रौढ विद्यार्थी वगैरे मंडळी प्रामुख्याने दिसत होती. नंतर जॉ. सेक्रेटरी रा. रणपिसे यांनी निरनिराळ्या सामन्यातील बाबींचे मार्मिक विवेचन केले आणि अध्यक्षांनी स्वहस्ताने यशस्वी उमेदवारास बक्षीसे वाटली. नंतर अध्यक्षांनी आपले भाषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण त्यात त्यांनी बहिष्कृत वर्गाच्या सध्याच्या भयानक व चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करून अशा विषम, हिरमोड करणाऱ्या परिस्थितीत बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनीही आपले शील व कर्तव्य सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा उपदेश केला. सुशिक्षित असूनही केवळ अस्पृश्य मानले गेल्यामुळे बहिष्कृतातील लायक माणसांची कशी कुचंबणा होते हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जेव्हा पटविले त्यावेळी सभागृहात भीषण गांभीर्य पसरले. डॉक्टरसाहेब मनापासून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या जीवाची तळमळ व मनाची खळबळ त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रतिबिंबित होत होती. एकंदरीत अध्यक्षांचे भाषण अस्खलित, जोरदार व चित्ताकर्षक झाले... मुक्तीदाता विशेषांक संदर्भ बहिष्कृत भारत, दि. ४ नोव्हेंबर १९२७. #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
666 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणे - हेच आयुष्याचे सार "वैयक्तिक सौख्याचे ध्येय नजरेसमोर न ठेविता स्वतःच्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणे यातच आपल्या आयुष्याचे सार आहे." डॉ. बाबासाहेब अबिडकरांनी नागपूर येथे दि. २५, २६, २७ जाने, १९४७ रोजी भरलेल्या ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट विद्यार्थी परिषदेस खालील पत्र पाठवून ओजस्वी संदेश दिला आहे. ते पत्र जसेच्या तसे येथे छापले आहे; वेस्टर्न कोर्ट, नवी दिल्ली. श्री. गेडाम यांस - माझ्याकडे आगाऊ आलेल्या कामाच्या गर्दीमुळे आपणांस शक्य तितक्या लवकर पत्र पाठविता न आल्यामुळे मला अत्यंत दुःख होत आहे. आपण ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन परिषदेहून स्वतंत्र अशी ऑल इंडिया शेडयुल्ड कास्ट विद्यार्थी परिषद भरवित असल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत असून आपण आखलेल्या या योजनेला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. (आपल्या सूज्ञ मतप्रणालीला) कायदेमंत्री नामदार जे. एन. मंडल यांना मी तसे कळविले असून ते परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी निश्चितपणे येत आहेत. माझी तिकडे येण्याची इच्छा होती. परंतु कार्य बाहुल्यामुळे मला ते शक्य होणार नाही याबद्दल अत्यंत दिलगिरी वाटते. तरीपण ही परिषद यशस्वी होवो असे मी सुयश चिंतितो. अस्पृश्य विद्यार्थ्यांनी मुख्य दोन गोष्टी शिकावयास पाहिजेत. पहिली म्हणजे (१) अस्पृश्य विद्यार्थ्यांस संधी मिळाली असता बौद्धिक बाबतीत दुसऱ्या कोणापेक्षाही आपण बुद्धीने निकस आहोत असे होता कामा नये आणि (२) दुसरी म्हणजे त्यांनी वैयक्तिक सौख्याचे ध्येय आपल्या नजरेसमोर न ठेवता आपला समाज स्वतंत्र, सामर्थ्यवान व स्वाभिमानी (मानास पात्र) कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. या दोन गोष्टी या परिषदेद्वारा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसल्यास या परिषदेने पुष्कळच कार्य केले असे म्हणावयास कोणताच प्रत्यवाय नाही. आपण अंगिकारीलेले कार्य चांगल्यात-हेने पार पाडाल अशी माझी पूर्ण खात्री आहे. आपला भीमराव आंबेडकर संदर्भ जनता, दि. १ फेब्रु. १९४७. मुक्तीदाता विशेषांक #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
692 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे. बाबासाहेबांची 135 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया...जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया...! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम! #bhimjayanti #भीमजयंती #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
646 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे. बाबासाहेबांची 135 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया...जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया...! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम! #bhimjayanti #भीमजयंती #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
1.1K जणांनी पाहिले
23 दिवसांपूर्वी
*तू धरलास हात वादळाचा अन संसार झाला माझ्या भीमाचा हा साज आज आमच्या जिंदगीचा आहे रमाई तुझ्या त्यागाचा* *४ एप्रिल १९०६ रोजी रमाई आणि बाबासाहेबांचा विवाह सोहळा भायखळा भाजी मार्केट मध्ये पार पडला. सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought