बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध धम्म....
बुद्ध, बोलणाऱ्यास बोलताना परिणामाचा विचार करुन बोलण्याचा सल्ला देतो. तो म्हणतो- आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा (प्रज्ञेचा) वापर करुन योग्य परिणामाचा विचार करुन बोला. मुर्खाचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून अकुशल कर्म घडेल आणि तुम्ही दुःखी व्हाल. शहाण्याचे सत्य बोलाल, तर तुमच्या हातून कुशल कर्म घडेल आणि तुम्ही सुखी व्हाल. समाजात सुख, संमृद्धी, शांतता नांदण्यास मुसाबादा वेरमणी ह्या शील पालनाची प्रत्येक माणसास गरज आहे, असे बुद्ध सांगतो.
सुरामेश्यमज्ज पमादठ्ठाना वेरमणी :
'व्यसनाधिनता' ही आज प्रत्येक देशातील समाजाची गंभीर समस्या बनली आहे. व्यसनाधिन माणूस स्वतः ही सुखाने जगत नाही आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू देत नाही. अशा माणसाच्या घरात नेहमी कलह व भांडण असते. असा माणूस पहिल्या चारही शीलांचा भंग करु शकतो. हा प्रमादी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचाही असू शकतो.
बुद्धाने ह्या शिलाद्वारे जो उपदेश केला आहे तो नीट समजून घेणे आवश्यक ठरते. चारही शीलांत नसलेला एक शब्द 'पमाद' (प्रमाद) ह्या शीलात आहे. त्याचे इथे विशेष महत्व आहे. सुरा ही धान्याचा अर्क, तर मेरय ही फळाचा अर्क. ह्या दोन्हीचा उपयोग औषध म्हणून अणि व्यसनासाठी मादक पदार्थ म्हणून केला जातो. वैद्याच्या सल्ल्याने रोग्याने, रोग निवारक औषध म्हणून वैद्याने सूचविलेल्या प्रमाणात, योग्य वेळी घेतले तर हे कुशल कर्म ठरेल; याला बुद्ध विरोध करीत नाही. परंतु निरोगी माणसाने, वैद्याचा सल्ला न घेता गरज नसताना प्रमाणाबाहेर हा अर्क (दारु) ढोसून घेतला तर तो प्रमादास (गुन्ह्यास) कारणीभूत ठरेल. म्हणजे हे त्या माणसाने केलेले अकुशल कर्म ठरेल. याला बुद्ध विरोध करतात.
'धम्मपदात' एक गाथा आहे' "अप्पमादो अमत पदं, पमादो मच्चूनो पदं।" अर्थ- अप्रमादी असणे (गुन्हेगार नसणे) हा (आदर्श) जीवनाकडे नेणारा मार्ग आहे, तर प्रमादी (गुन्हेगार) असणे हा मृत्युकडे (विनाशाकडे) नेणारा मार्ग आहे.
पंचशीलांचे पालन करणारी व्यक्ती ही, गुन्हेगार प्रवृत्तीपासून मुक्त असते. जगातील प्रत्येक समाजाचे शासन, सुव्यवस्थेसाठी अनेक योजना राबवत असते. आणि त्यादृष्टीने लोकशिक्षणाची व्यवस्था करते. चीनमध्ये इ.स.च्या पहिल्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञानाचा समावेश सार्वजनिक शिक्षणात केला जात आहे.
पंचशील हे व्यक्तीच्या जीवनाचे मापदंड, प्रमाणक Standard आहे, असे बाबासाहेब 'बुद्ध आणि त्याचा धम्म' मध्ये सांगतात. पंचशील पालनाने व्यक्ती सदवर्तनी व आदर्श बनते.
धम्माचा प्रारंभ याचसाठी शीलपालनाने, माणसाला सदाचारी बनविण्यासाठी केला पाहिजे, असे बाबासाहेब सांगतात.
बुद्धाची अन्य शिकवण :
समता : माणसामाणसात, त्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी बुद्ध भेदभाव मान्य करीत नाही. स्त्री-पुरुष असमानता मान्य करीत नाही. मात्र स्त्री सुरक्षिततेची काळजी घेतो. उपासक वा भिक्खू होण्यास कोणतेही धंद्याचे वा जातीचे बंधन मान्य करीत नाही. त्यापूर्वी विशिष्ट जातीच्या पुरुषांनाच सन्यास घेण्याचा अधिकार होता. त्याला बुद्धाने नाकारले. बुद्ध सर्वांना समान लेखतो आणि प्रत्येकाला व्यक्तीमत्व विकासाची व प्रगतीची संधी बहाल करतो. स्त्रीयांना सुद्धा प्रव्रज्येचा
अधिकार देतो.
कम्मसिद्धांत : बुद्ध सांगतो पेराल तसे उगवेल, कुशलकर्म- चांगले काम, हितकारक काम कराल, तर त्याचे चांगलेच फळ मिळेल.
तुमचा मुक्तीदाता, कुणी बाहेरचा परमेश्वर वा अन्य नाही. तुम्हालाच तुमचा उद्धार करावयाचा आहे. 'अत्ताही अत्तनो नाथो।' तुम्ही स्वतःच स्वतःचे स्वामी आहात. यासाठी तसे कुशल कर्म करा. स्वतःला विकसित करा. विकासाची इच्छा बाळगा (Desire to develop) हे तत्व म्हणजेच बुद्धाचा कम्म सिद्धांत होय.
चित्त आहे, आत्मा नाही :
प्रत्येकाला मन म्हणजेच चित्त आहे. चित्त हे निरंतर प्रवाही आहे. चित्त चंचल आहे. ते मनोविकाराने म्हणजे लोभ (Greed) मोह, (Attraction) आणि विचिकित्सा, अज्ञान (Stupidity, Illusion) यांनी विचलित होते. माणसावर नियंत्रण ठेवणारे असे एखादे, आत्मा नावाचे (Sole) स्थीर तत्व शरीरात किंवा अन्य कुठेही नाही, असे बुद्ध मानतो.
गॉलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन, आणि स्टीफन हॉकींग्ज अशा अनेक महान शास्त्रज्ञांनी आत्मा, परमात्मा, पृथ्वी व सृष्टीची निर्मिती, तिची संरचना आणि निसर्गाचे कार्य याबद्दल जे हल्लीच्या युगात संशोधनांती सांगितले तेच बुद्धाने काय म्हणावे ? अडीच हजार वर्षापूर्वी भारतीयांना सांगितले. पण ऐकतो कोण? याला भारतीयांचे
ध्यान : चित्ताला/मनाला कुशल कर्मावर स्थिर करणे म्हणजे चांगल्या वा हितकारक कामात मनाला गुंतवून ठेवणे, अशी ही चित्ताची एकाग्रता, हे ध्यान आहे. चित्ताला वाईट (अकुशल) अहित कारक विचारात, कामात प्रवेश करु देऊ न देणे, मनात वाईट विचार आला तर मनाला त्यापासून परावृत्त करणे हे ही ध्यान आहे. मनात चांगला विचार आला तर मनाला त्यात गुंतवून ठेवणे हे ही ध्यान आहे. हे सारे माणसाच्या आयुष्यभर चालले पाहिजे. ध्यान विकसित करण्यास अनेक माणसे मार्गदर्शकाकडून सराव करुन घेतात. दीर्घ कालीन ध्यान ही समाधी असते. कुशल कर्मावरुन कधीही विचलीत न होणारे मन/चित्त हे स्थीर चित्त असते. असा माणूस 'सम्म समाधीस' (सम्यक समाधीस) पात्र ठरतो. हे कार्य कठीण आहे. सम्म समाधी प्राप्त माणसाच्या मनातील सर्व विकारांचा नाश झालेला असतो. ही स्थिती 'निर्वाणास' (दुःख मुक्तीस) पोषक असते. चित्ताची सततची ही जागृतावस्था म्हणजेच अर्हतत्व. लोभ, राग, द्वेष, मोह यांचा कसलाही प्रभाव होऊ न देणारे चित्त, हे अर्हताचे चित्त असते, असे बुद्ध सांगतो.
क्षण भंगुरता : जगात स्थीर असे काहीही नाही. जगात सतत परिवर्तन होत असते. म्हणजे जगातील सारं काही अनित्य आहे, क्षणभंगूर आहे म्हणून जगातील कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा ही बुद्धाची शिकवण आहे. याचा 'प्रतित्य समुत्पादाशी' संबंध आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ह्या कार्यकारण भावालाच 'प्रतित्य समुत्पाद' म्हणतात. हे प्रथमतः बुद्धाने जगाला सांगितले. म्हणून जगातल्या वैज्ञानिक संशोधन कार्याचा प्रारंभबुद्धापासून होतो, असे म्हटले जाते.
शीलपालन, समानता, बुद्धाचा कर्मसिद्धांत, आत्मा परमात्म्यावरील अविश्वास सम्मसमाधी, अनित्यता, प्रतित्य समुत्पाद सांगणारा बुद्धाचा धम्म व्यक्तिला सदाचारी, कार्य करण्यास सक्षम आणि जबाबदार बनवून त्याच्यात आत्मविश्वास जागवितो. व्यक्तिला निर्भय बनवितो. खऱ्या अर्थाने संपूर्णपणे स्वतंत्र बनवितो. म्हणून धम्म, बहुजन हिताय, बहुजन सुखाय असतो...
मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक
संदर्भ ग्रंथ :
१. The seeker's Glossary of Buddhism, Sutra Translation committee of US and Canada.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदिक्षेचा अविस्मरणीय इतिहास वामनराव गोडबोले. सुप्रिया प्रकाशन, अलंकार चित्रपट गृह, नार्थ अंबाझरी,
३. नागपूर-१० बुद्ध आणि त्याचा धम्म. The Buddha and this Dhamma, Dr. B. R.
४. Ambedkar बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-११ बौद्ध पूजापाठ - डॉ. बी. आर. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि भाषणे खंड-१६, पृष्ठ क्र. -७२३ ते ७४२.
५. Buddhism as an Education, Ven. Master Chin-king.
#bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर