Politics....

Dr Ramdas Athawale
6.7K views
3 months ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *रहिमतपुर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* *रहिमतपुर परिषदेच्या शताब्दी वर्ष सोहळयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन* सातारा दि. 05 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा जिल्हयातील रहिमतपुर येथे 5 मे 1926 रोजी तत्कालीन महार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रहिमतपुर येथे आले होते. रहिमतपूर मध्ये ते ज्या ठिकाणी थांबले होते तेथे भव्य समता स्तंभ उभारण्यात आलेला आहे. तेथे आज ना. रामदास आठवले यांनी भेट दिली. 5 मे 1926 रोजी रहिमतपुर येथे ही परिषद महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी जनजागृतीचा मानवमुक्तीचा लढा सुरु केला, त्याचा भाग म्हणून महार परिषद रहिमतपुर येथे 5 मे 1926 रोजी घेण्यात आली होती. त्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दीपूर्ती महोत्सव आज रहिमतपुर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहिमतपुरच्या या समता स्तंभाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिले. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापु गायकवाड, भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रलेखा माने, रहिमतपुरच्या नगराध्यक्ष वैशाली माने ; मयुर बनसोडे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची आहे. त्यानुसार रहिमतपुरमधील महार परिषदेच्या शताब्दी वर्षानिमीत्त रहिमतपुरच्या समता स्तंभाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडुन मदत मिळवून देऊ. याठिकाणी भव्य भिम स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले दिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारताचे संविधान जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. सर्व जाती धर्मियांचे संविधान आहे. सर्वाना न्याय देणारे संविधान आहे. या संविधानाला ज्यांनी कोणी बदलण्याचा विचार करू शकत नाही. जर बदलण्याचा कोणी विचार केला तर त्यांना आमची आंबेडकरी जनता फाडुन टाकल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा देशभर मी पोहचवला आहे, नागालॅन्ड आणि मणिपुरमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेचा दर्जा मिळेल. सध्या देशात भाजप, कॉग्रेस, बसपा आणि आम आदमी पार्टी हे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. पाचवा राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला अधिकृत मान्यता मिळेल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. सता-यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भिमाई यांचे स्मारक सातारा येथे आहे.. सातारा जिल्हा आंबेडकरी चळवळीसाठी ऐतिहासिक आहे. 5 मे 1926 ला रहिमतपूर येथे आयोजित केलेल्या महार पषिदेला आज शंभर वर्ष होत आहेत. या शताब्दी वर्षानिमीत्त रहिमतपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीची चळवळ उभी केली, त्यांना दलित सवर्ण हा जातीभेद मिटवायचा होता. जातीभेद मिटवुन सामाजिक ऐक्य साधणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्दीष्ट होते. जातीभेद निर्मुलन करुन समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तीच प्रेरणा घेऊन आपणही काम करीत आहोत, समाजात जातीभेद नष्ट करुन सामाजिक समता, दलित सवर्ण हा भेद मिटवुन सामाजिक एकजुट उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #Politics.... ###Politics ##Breakingnews #follow
Dr Ramdas Athawale
564 views
3 months ago
*काश्मीर मध्ये रिपब्लिकन पक्षाची नदीपात्रात सभा* केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी जम्मू काश्मीर दौऱ्यात काश्मीर मधील श्रीनगर; कुलगाम; अनंतनाग या जिल्ह्यांत तीन मोठ्या सभांना संबोधित केले.या भागात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे; रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय भीम चे निळे मफलर घालून काश्मीर मध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण दिसत होते.कुलगाम मधील येशो नदीपात्रात रिपब्लिकन पक्षाच्या सभेला मोठी गर्दी जमली होती.नदीच्या दुतर्फा गाव असून रहदारी साठी नदीवर पूल नाही.नदीवर पूल बांधावा.जम्मू काश्मीर च्या राज्य सरकार पेक्षा आमचा केंद्र सरकार वर अधिक विश्वास असल्याचे सांगत येथील स्थानिकांनी नदीवर पूल बांधण्याचे निवेदन ना. रामदास आठवले यांना दिले.यावेळी रिपब्लिक पक्षाचे जम्मू काश्मीरचे प्रमुख नेते मन्सूर खान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #follow #Politics....
Dr Ramdas Athawale
726 views
4 months ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *द्रमुक सरकार उलथवुन टाका - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* *तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात* कोईमतुर/मुंबई दि. 09 - तामिळनाडु विधानसभेच्या एकुण 234 जागांपैकी 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असून उर्वरित 216 जागांवर एनडीएला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा दृष्टीकोन दक्षिणेतील जनतेलाही पटलेला आहे. एनडीए सरकारने देशाचा वेगाने केलेला विकास पाहुन दक्षिणेतही एनडीएचा महाविजय होणार आहे. अभिनेते विजय यांनी तामिळनाडुत सर्व जागांवर उमेदवार उतरविल्याने मतविभागणीचा लाभ भाजप आणि एनडीएला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तामिळनाडुतील स्टॅलिन यांचे द्रमुक सरकार उलथवुन टाका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. कोईमतुर जिल्हयातील त्रिपुर नॉर्थ विधानसभा मतदारसंघाच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला उमेदवार के. कार्तिकादेवी यांच्या निवडणुक प्रचार रॅलीला संबोधीत करतांना ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडु प्रदेशाध्यक्ष फादर एन सुसाईआणि अनेक रिपब्लिक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दोन दिवसांच्या तामिळनाडु दौ-यांवर आले असून आज त्यांनी कोईमतुर आणि नामक्कल जिल्हयातील विविध मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा तसेच भाजप प्रणित एनडीए उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या तामिळनाडुमध्ये 18 उमेदवारांमध्ये 5 उमेदवार हे अनुसुचित जातीचे 11 उमेदवार हे इतर मागास वर्गातील असुन 2 उमेदवार हे मुस्लिम आहेत. तामिळनाडु हे दक्षिणेतील महत्वाचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए यंदा तामिळनाडु, पाँडेचेरी आणि केरळ या सर्व राज्यांवर विजय मिळवुन एनडीएचा दक्षिण विजय निश्चत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 57 कोटी लोकांचे बँक खाते खोललेले आहे. 50 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा लाभ दिला आहे. 6 कोटी लोकांना उज्वला योजनेद्वारे सिलेंडर गॅस दिलेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला आहे. देशभरातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेली आहे. देशभरातील अनेक रस्ते चांगले करण्यात आलेले असून देशाची आर्थिक व्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. देशात विकास झपाटयाने होत आहे. भारताचे उपराष्ट्रपती असणारे सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडुचे सुपुत्र आहेत. तामिळनाडुच्या जनतेला तामिळनाडुचे सुपुत्र उपराष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे. तामिळनाडुच्या यंदाच्या निवडणुकीत विजय या सुपरस्टार अभिनेत्याने आपल्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात मताची विभागणी होणार आहे. याचा लाभ एनडीए ला होणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. मोदींनी अनेक चांगल्या योजना राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. देशाच्या विकासाचे राजकारण जनतेला आवडणारे असल्याने तामिळनाडुत जनता यंदा एनडीएला महाविजय मिळवुन देईल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. महिलांना संसदेत राजकीय आरक्षण देणारे महिला विधेयक संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंजुर करणार असून महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे हे विधेयक आहे. त्यामुळे देशभरातील महिला या विधेयकावर खुष आहेत. तामिळनाडुतील महिला सुध्दा या विधेयकामुळे आपल्या मतांचे दान एनडीए उमेदवारांना देतील. त्यामुळे तामिळनाडुमध्ये एनडीएचा महाविजय होईल.यंदाच्या निवडणुकीत द्रमुक चा निश्चित पराभव होईल असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow #RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम #Politics....
Dr Ramdas Athawale
758 views
4 months ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ* मुंबई दि. 05 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या तिस-या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातुन राज्यसभेवर 7 खासदार बिनविरोध निवडुन गेलेले आहेत. त्यात ना. रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिस-यांदा बिनविरोध निवड होवून ना. रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिस-या टर्मची सुरुवात ना. रामदास आठवले उद्या दिनांक 6 एप्रिल2026 पासुन करणार आहे. ना. रामदास आठवले यांची एप्रिल 2014 ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये दुस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांच्या दुस-या टर्मची मुदत होती. उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत ना. रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दिनांक 6 एप्रिल 2026 पासुन राज्यसभेच्या त्यांच्या तिस-या टर्मला सुरुवात होणार आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 ते एप्रिल 2032 पर्यत ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. नारामदास आठवले यांना तिस-यांदा राज्यसभेवर निवडुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे. आपल्या तिस-या राज्यसभा सदस्यत्वाची ना. रामदास आठवले उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत शपथ घेणार आहेत. त्यांना देशभरातील आंबेडकरी जनतेने शुभेच्छा दिलेल्या आहेत. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख ##Breakingnews #follow #Politics.... #RAMDASATHAWALE #☸️जय भीम
Dr Ramdas Athawale
721 views
4 months ago
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा - केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 26 - व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे, असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन 2020 ते 2025 या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते. पुढे बोलताना ना.रामदास आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. देशाचे भविष्य तरुणाईच्या हातात आहे. ही तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडने ही गंभीर समस्या आहे. व्यसन ही सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी सरकार कडून कठोर पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन देखील ना.रामदास आठवले केले. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय टाळावे हे स्वतः ठरवायचे असते, पण व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. एखादे कुटुंब वाचविणे हेच मोठे यश असून त्यातून मिळणारा आशीर्वाद हा खरा ठेवा आहे, असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले. पुरस्कारांतर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी 15 हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, साडी, खण आणि श्रीफळ तसेच संस्था पुरस्कारासाठी 30 हजार रुपये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले या 5 वर्षांच्या पुरस्कार निवडीमध्ये एकूण 100 व्यक्ती व 13 संस्थांचा समावेश आहे. या 100 व्यक्तींपैकी 88 पुरुष व 12 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणि संस्थांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला ना. रामदास आठवले यांनी व्यसनमुक्तीवर काही कविता सादर केल्या..... जर केली तुम्ही रोज नशा; तर समाजात होईल तुमचा हशा ; तुम्ही आहात आमची फार मोठी आशा, आणि मराठी आहे आमची भाषा ! मग का करता तुम्ही नशा? मी करतो नशा... पण ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नशा !! म्हणुन आहे माझ्या जीवनात फार मोठी आशा !!! होईल जर व्यसनमुक्ती; तर वाढेल महाराष्ट्राची शक्ती ! भेंदुबाबाची करु नका भक्ती, असं केल तर कधी होणार नाही तुमची मुक्ती ! ना.रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत या कविता सादर करताच सभागृहात प्रचंड टाळया आणि हशांनी प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow #☸️जय भीम #Politics.... #RAMDASATHAWALE ##Breakingnews