राजा रणांगणात असल्यावर प्रशासन सुव्यवस्था सुस्थितीत असावी म्हणून राजकारणाच्या समुदायात उतरणाऱ्या, महाराणी सरकार येसूबाईसाहेब महाराज...🙏🚩
एखादा महापराक्रमी योध्दा हा लाखात एक असतो, पण त्याची पत्नी नक्कीच दहा लाखात एक असते ! तीच हृदय कशाचं असत हे तिलाच ठाऊक. ‘श्री सखी राज्ञी जयती ।’ महाराणी येसूबाईसाहेब म्हणजेच राजमाता जिजाऊंच्या नंतर मराठा इतिहासातील सर्वात कणखर व्यक्तिमत्त्व...!
मुलकी कारभाराची सूत्रे महाराणी येसूबाईसाहेबांकडे सोपवून "महिलांना सत्तेत समान वाटा हा विचार छत्रपती संभाजी महाराजांनी राजेशाहीच्या काळात राबवून आपण ‘स्त्री सत्ताक’ चे कडवे समर्थक असल्याचे सिद्ध केले. तर मुलकी कारभाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून चांगल्या प्रशासनाचा आदर्श येसूबाईसाहेबांनी उभा केला, ही घटना इतिहासात आगळी वेगळी आहे...
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी सत्तासूत्रे सांभाळणाऱ्या युवराज संभाजी राजांसमोर औरंगजेबाची अफाट सेना होती. अंतर्गत मोठ्या अडचणी होत्या. अशा आणीबाणीच्या काळातही त्यांनी मुलकी कारभार आपली पत्नी येसूबाईसाहेबांकडे सोपवून स्त्रीशक्तीचा सन्मान केला. हा निर्णय राबविताना त्यांनी येसूबाईंना केवळ ‘नामधारी’ मुलकी कारभारी बनविले नाही, तर आणखी दोन पावले टाकली. येसूबाईंना राजपत्रे, राजव्यवस्थेचे हुकूम काढण्याची परवानगीही बहाल केली...
‘श्री सखी राज्ञी जयति' असा शिक्काही दिला. या शिक्क्याचा वापर येसूबाईसाहेब कौलनामा, अभयपत्रावर करीत असत. येसूबाईं साहेबांनी जारी केलेल्या हुकुमावरील शब्दयोजनाही अधोरेखित करावी अशीच आहे. हुकूम छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने निघत असले तरी त्यात ‘आज्ञा' या शब्दाऐवजी ‘राजाज्ञा' असा शब्द असे. विशेष म्हणजे येसूबाईंसाहेबांच्या पत्राचा मायनाही “ई कौलनामे सौभाग्यवती राजश्री बाईसाहेब दामदौलत हु...” असा आकर्षक असे...!
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त