राहुल बोराडे
950 views 4 months ago
जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर हे चिंतनशील विचारवंत होते. राजघराण्यात जन्मलेल्या महावीरांचे बालपण ऐषारामात गेले होते. परंतु त्यांना ऐहिक सुखाबद्दल अजिबात आकर्षण नव्हते. भगवान महावीर यांनी शांतता, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण सार्‍या मानवजातीला दिली. आज सुमारे अडीच हजार वर्षानंतरही महावीरांचे हे विचार तेवढेच महत्त्वाचे असून ते आचरणात आणण्याची गरज आहे. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #भगवान महावीर जयंती💐
8 likes
10 shares

More like this