ShareChatUser
857 views 4 months ago
चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाची हजेरी यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान ! चाकूरः-चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत तसेच या अवकाळी पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीजही गुल झाली होती.रविवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ही संध्याकाळी उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.तसेच सोमवारी दिंनाक २३ फेब्रुवारीला शहरात आणि परिसरात सांयकाळी साडे चार-पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे व प्रचंड वाऱ्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच वैरणीचेही नुकसान झाले आहे.या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतातील ज्वारी,गहू ,हरभरा सह आंबा,द्राक्षे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कांही शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक काढून ठेवले होते मात्र अवकाळी पावसामुळे गहू भिजला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चाकूर शहरातील विठ्ठल डाके,पंडित मोरे सह इतर शेतकरी यांचे रब्बी हंगामातील पीक पावसामुळे खराब झाले आहे.तसेच डोंगरज ,शेळगाव शेत शिवारात ही वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरणी,गांजुर शेत शिवारातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.घरणी येथील रब्बीची ज्वारी जमीनदोस्त झाली आहे तसेच शिरीष आणि आकाश शिंदे यांच्या सह इतर शेतकऱ्यांचे कापुन ठेवलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गांजुर गावात तसेच शेतशिवारात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतातील रब्बी हंगामातील पिंकाचे मोठे नुकसान झाले आहे.एकंदरीत तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात रब्बी हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
12 likes
10 shares

More like this