*चाकूर येथील दरोडा प्रकरणाचा उलगडा, एक आरोपी जेरबंद; १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
चाकुरः- लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दिनांक २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित इसम ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध सापळा रचला.
काही वेळात संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न करताच वाहनातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून
१) रवि मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव)
यास शिताफीने ताब्यात घेतले. मात्र त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
आरोपी व वाहनाची सखोल झडती घेतली असता बोलेरोमध्ये ठेवलेल्या पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. त्यानंतर आरोपीची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारांसह दिनांक २० जून २०२६ रोजी नांदेड- चाकूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने लुटल्याची कबुली दिली.
त्यानंतर जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे
४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या), चांदीची चैन किंमत ०६ लाख २२ हजार रुपये, महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) – ₹११,००,००० असा एकूण जप्त मुद्देमाल ₹१७,२२,०००/- इतकी आहे.
या गुन्ह्यात अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे व कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
आरोपीला व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड, रामदास बाचीफळे यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. #📝मराठवाडा अपडेट्स
*चाकूर येथील दरोडा प्रकरणाचा उलगडा, एक आरोपी जेरबंद; १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
चाकुरः- लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दिनांक २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित इसम ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध सापळा रचला.
काही वेळात संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न करताच वाहनातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून
१) रवि मोहन काळे (वय १९ वर्षे, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव)
यास शिताफीने ताब्यात घेतले. मात्र त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
आरोपी व वाहनाची सखोल झडती घेतली असता बोलेरोमध्ये ठेवलेल्या पिशवीत दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. त्यानंतर आरोपीची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारांसह दिनांक २० जून २०२६ रोजी नांदेड- चाकूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने लुटल्याची कबुली दिली.
त्यानंतर जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे
४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने (दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या), चांदीची चैन किंमत ०६ लाख २२ हजार रुपये, महिंद्रा बोलेरो जीप (एमएच-०६-जे-९८१९) – ₹११,००,००० असा एकूण जप्त मुद्देमाल ₹१७,२२,०००/- इतकी आहे.
या गुन्ह्यात अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे व कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधी पेडी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
आरोपीला व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू नीटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड, रामदास बाचीफळे यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. #📝मराठवाडा अपडेट्स
बेकायदेशीर दारू विक्रीच्या विरोधात कलकोटी येथील महिलांचा आक्रोश,दारू विक्री करणाऱ्या इसामांस घरा घुसुन दिला चोप
पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांना दिले गावऱ्यांनी बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्याचे निवेदन
चाकुरः-तालुक्यातील कलकोटी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात शनिवारी (दि. 27) सकाळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. संतप्त महिलांनी थेट एका दारू विक्रेत्याच्या घरात घुसून त्याला चोप दिल्याने गावात एकच खळबळ उडाली.तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर दारूविक्री सर्रास सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अखेर महिलांचा संयम सुटला. त्यातूनच शनिवारी सकाळी कलकोटी गावात महिलांनी स्वतः पुढाकार घेत अवैध दारूविक्री करणाऱ्याला जाब विचारत त्याच्यावर हल्ला केला.
*चौकट*
*अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून गावातील दारू विक्री कायमची बंद करावी-ग्रामस्थाची मागणी*
*कलकोटी गावातील बेकायदेशीर रित्या देशी दारु विकणाऱ्यांना लोकांना तात्काळ अटक करून* *त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी व गावातील तरूण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासुन प्रवृत्त करण्यासाठी अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कडक करवाई करण्याची* *मागणी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.*
*सध्या गावा मध्ये बेकायदेशीर पणे दारु विक्री चालू असुन बरेच संसार उध्वस्त झाले आहे. बरेच बाई विधवा झाले आहे. बरेच लोक आपले शेत घाण ठेवुन लोकाकडुन व्याजाने पैसे घेवुन दारुची लत लागली आहे.* *आम्ही बरेचदा समजावुन सांगण्याचा पर्यंत केला परंतु आम्हाला काही यश आले नाही. आमच्या गावातील अवैध दारू विक्री कायम बंद करावी अशी अपेक्षा आम्ही सर्व गावकरी आपल्याकडे करीत आहोत.यापुढे कलकोटी गावात अवैध दारु करण्यात येऊ नये यासाठी आपल्या स्तरावरून कायदेशीर कारवाई करून अवैध दारू विक्री वर आळा घालावा.*
*तालुक्यात बेकायदेशीर दारू विकणाऱ्यां विरोधात कारवाई*
*चाकुर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळताच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात चाकुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चापोली,घरणी,लातुररोड,झरी,कलकोटी,मष्नेवाडी,येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आली* #📝मराठवाडा अपडेट्स
महिला पतंजली समितीच्या वतीने 12 आंतरराष्ट्रीय योग दिवस चाकुरात हर्षोउत्सवाने साजरा
चाकुरः-
12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
युगपुरुष योगऋषी स्वामीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्री यांना व मुख्य केंद्रीय प्रभारी श्रद्धामयी साध्वी देव प्रिया दीदी माँ यांना प्रणाम करून .
महाराष्ट्र पूर्व राज्य प्रभारी आदरणीय संजीवनी ताई माने जी यांच्या मार्गदर्शनात, राज्य संवाद प्रभारी मीनाक्षीताई स्वामी, जिल्हा प्रभारी सुमन पवार, जिल्हा संरक्षिका कलावती ताई भातंबरे व संपूर्ण टीम लातूर जिल्हा प्रत्येक वर्षी प्रमाणे प्रत्येक ठिकाणीच आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. त्याप्रमाणे विश्वशांती धाम चाकूर येथे महिला पतंजली योग समिती ,पतंजली योग समिती, रोटरी क्लब ,तहसील कार्यालय ,नगरपंचायत कार्यालय ,ओम शांती. यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुमन पवार ,धनंजय गोलावार यांनी प्रोटोकॉल नुसार योग साधना करून घेतली . जिल्हा प्रभारी सुमन पवार यांनी सर्व महिलांचे दोन दिवस अगोदर योग शिबिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये घेण्यात आले व आज विश्वशांती धाम येथे सर्व बंधू आणि महिलांना एकत्रित घेण्यात आले .योग प्रेमींना योग घेताना निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि योग आहे याची गुरुकिल्ली .
योग्य व्यायाम ,प्राणायाम ध्यान, पहाटे चालणे हे प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्यानुसार केलेच पाहिजे जिथे योग असे तेथे रोग नसे .
व्यायाम संतुलित आहार आपले आरोग्य चांगले तरच आपले मन प्रसन्न राहते म्हणून स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे आणि रोजचा एक तास हे सर्वांनी स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे असे या सत्रामध्ये सांगण्यात आले. शासकीय वस्तीगृहाच्या मुली यामध्ये उपस्थित होत्या महिला पतंजली ची संपूर्ण टीम यामध्ये महामंत्री चंद्रकला केंद्रे, शहराध्यक्ष रत्नमाला नंदागवळे ,योगशिक्षिका शारदा मिरजकर, शोभा माने नंदिनी धनशेटे, रंजना चंदिले ,लक्ष्मीताई काटे, उषा महालिंगे वाघ ताई शेट्टी ताई स्वामी ताई अशा सर्व महिलांनी व शहराध्यक्ष ओम लोहिया ,जानकर, माने भैया ताई ,महादेव देवशेटे यांनी कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. #📝मराठवाडा अपडेट्स
राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटले;सोन्यांचे दागिने रोख रक्कम लुटले
महामार्गावर पोलीस गस्त वाढविण्याची वाहनधारकांची मागणी
चाकूरः-लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ २० ते २५ वर्षे वयातील चार अज्ञात दरोडेखोरांनी दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करीत महिला जवळील सुमारे ३ लाख ४७ हजार २५० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिं. २० जून च्या पहाटे साडे चार वाजता घडली आहे, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
घरणी येथील महामार्ग पोलिस ठाण्याच्या अतिशय जवळ ही घटना घडली असल्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्ग पोलिसांच्या गस्तीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
लातूर येथील कांताप्रसाद तापडीया हे एम. एच. २४ बी. एल. ६०० क्रमांकाच्या कारने आपल्या कुटुंबीयासह शेगाव येथे दर्शन घेऊन लातूरकडे येत असताना घरणी गावाच्या जवळ कारच्या खाली काहीतरी आवाज आल्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली असता पाठीमागून अचानक चार अनोळखी तरूण कारच्या जवळ आले व कार मधील महिला व पुरूषांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या पत्नी सीमा तापडीया, बहिण अलकनंदा बियाणी, मुलगी स्नेहा यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसुत्र, बांगड्या, चैन, लॉकेट, इतर सोन्याचे दागिने असा २ लाख ८३ हजार २५० रूपयाचा रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
याच दरम्यान कोल्हापुरहून नागपुरकडे निघालेल्या माधव दियेवार यांचीही कार दरोडेखोरांनी लुटली त्याच्या कुटुंबीयाकडील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे ६४ हजार रूपयाचा ऐवज लुटला आहे. रस्त्यावर कार लुटल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.याबाबत कांताप्रसाद तापडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत शेंडगे हे करीत आहेत. घटनेच्या जवळच महामार्ग पोलिस ठाणे आहे, रात्री यांची गस्त सुरु असते तरीही अशी घटना घडत आहेत. दोन महिन्यापुर्वी चापोली येथेही कार चालकांना लुटल्याची घटना घडलेली आहे, पहाटेच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या धाडसी लुटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मार्गावर पोलीस गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
चाकुर जवळील हायवे [बायपासवर] भीषण अपघात;तिघांचा जागेवरच मृत्यू एक गंभीर जखमी
चाकुर परिसरात अपघाताची माहिती मिळताच हळहळ
चाकुरः-चाकूर हायवे बायपासवरील नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र रक्ताचे सडे पडले होते. विदारक दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेली माहिती अशी, अहमदपूरहून लातूरकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एमपी ०९ जीएच १०२०) भरधाव वेगाने येत असताना चाकूरकडून (अलगरवाडी पाटी) बायपासजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मोटारसायकलवरील जनार्धन काळबा येणगे वय ६० वर्षे व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येनगे वय ५५ रा. तेलगाव हे पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. मृत दाम्पत्य हे तेलगाव येथील रहिवासी आहेत.दरम्यान, या धडकेनंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने समोरून लातूरहून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या वॅगनर एम एच २४ बी आर ७१२१ कारवर जोरदार धडकले. या अपघातात वॅगनरमधील श्रेयश सचिन वाघमारे वय १६ वर्षे रा. शिरूर ताजबंद याचा जागीच मृत्यू झाला असून त्या गाडीतील सुशील शिवमुर्ती स्वामी ४२ वर्षे रा. शिरूर ताजबंद हे गंभीर जखमी झाले आहेत. ते दोघेजण शिरूर ताजबंदचे रहिवासी आहेत. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चाकूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हा अपघात इतका भीषण होता की काही क्षण परिसरात एकच आक्रोश पसरला. मदतीसाठी धावलेल्या नागरिकांचेही मन हेलावून गेले. रस्त्यावर पडलेले रक्ताचे डाग आणि वाहनांचा चक्काचूर झालेला अवस्थेतील अवशेष पाहून अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येत होती. #📝मराठवाडा अपडेट्स
विधानपरिषद निवडणूकीसाठी महालिंगे यांनी दाखल केली उमेदवारी
चाकूरः-धाराशिव, लातूर व बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मिलिंद महालिंगे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
चाकूर तालुक्यात आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण काम करणारा मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.दलित चळवळीतूनच राजकीय पटलावर विराजमान होण्याचा आणि चाकूरचा प्रथम ऐतिहासिक नगराध्यक्ष होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. नगराध्यक्षाच्या काळात त्यांनी चाकूरच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.ते सामान्य जनता विसरणार नाही. त्याचीच पावती म्हणून त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २९ मे रोजी धाराशिव येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कडवकर यांच्याकडे अधिकृतपणे अर्ज भरला या प्रसंगी प्रा. दिनकर काकनाटे, प्रभाकर गायकवाड, राजू पटणे यांच्यासह समर्थक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय तसेच तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार मिलिंद महालिंगे यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.* #📝मराठवाडा अपडेट्स
घरकुल विभागाचा अहवाल सादर करण्याचे कर्मचाऱ्यांना निर्देश: सभापती जयश्री नागरगोजे
चाकूरः- मागील अनेक दिवसापासून चाकूर तालुक्यातील विविध नागरिकांच्या तक्रारी घरकुला संदर्भात येत होत्या . या तक्रारीची दखल घेत चाकुर पंचायत समितीच्या सभापती जयश्री मच्छिंद्र नागरगोजे यांनी दिनांक ५ मे रोजी झालेल्या मासिक बैठकीत टाकू तालुक्यातील प्रत्येक गावातील 2024 ते 2026 या कालावधीतील प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना इत्यादी घरकुलाचे मंजूर घरकुले, पूर्ण अपूर्ण घरकुले याची आपल्या स्तरावरून चौकशी करून त्याचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करावा अशी स्पष्ट निर्देश सभापती जयश्री नागरगोजे यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिली आहेत. #📝मराठवाडा अपडेट्स
*शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करणे गरजेचे: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील*
चाकूर: शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी बोथी तालुका चाकूर येथे केले.
बोथी तालुका चाकूर येथे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ तसेच जलतारा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, उपसभापती भुजंग शिंदे, , जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, नगरसेवक भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, राम कसबे, भालचंद्र चाटे, धनंजय चाटे, मधुकर मुंडे, नरेंद्र हाके, विष्णू तीकटे, अनिल वाडकर, संदीप शेटे, सचिन तोरे, जावेद पटेल कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग , गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी सह विविध मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून , बोथी गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रम ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. आपल्या गावातले पाणी आपल्याच गावात जिरवले पाहिजे . यामुळे पाण्याचे स्त्रोत अधिक उपलब्ध होतील. शेतकऱ्यांनी चांगल्या शेतीच्या उत्पन्नासाठी माती परीक्षण केलं पाहिजे असेही सहकार मंत्री ना . पाटील म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक बळी पाटील यांनी केले. यावेळी सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनीही जलतारा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी केले.
*चौकट*
जलतारा प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एका एकर शेतात ५ फूट बाय ५ फूट आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे. यामुळे पावसाचे लाखो लीटर पाणी थेट जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढून हेच पाणी पुन्हा विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होते. यंदा एल निनोचे संकट येण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाई भासू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाणी जमिनीत जिरविण्यासाठी आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्यासाठी पुढे आले पाहिजे. प्रत्येक गावात किमान १ हजार जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी केले. #📝मराठवाडा अपडेट्स
स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी सोनटक्के यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना... राज्याच्या सहकार मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती... कार्याचा गौरव...
चाकूर : चाकूरचे भूमिपुत्र मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी व सशस्त्र लढ्याचे अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के (वय १०१) यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा सोमवारी (दि. ४) त्यांच्या जय भवानी गल्ली येथील घरापासून सकाळी नऊ वाजता निघाली. त्यांचावर सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के नगर येथील माय मंदिरात लिंगायत धर्माच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून बंदुकीच्या एक्केविस गोळ्या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञतेने केली. सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे, सोसायटीचे चेअरमन गोविंदराव माकणे, बालाजी पाटील चाकूरकर, लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नरसिंग जाधव, ह.भ.प.मोहन महाराज खुर्दळीकर यांनी सोनटक्के यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. चाकूर शहरातील व्यापाऱ्यांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली तर ओम साई प्रसाद अन्नछत्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, माजी नगराध्यक्ष कपिल माकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, अनिल वाडकर, भाजयुमो प्रदेश सचिव ॲड.युवराज पाटील चाकूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद निला, अखिल भारतीय छावा संघटनेचे मच्छिंद्र चिंचोले, नगरसेवक भागवत फुले, नगरसेविका हिरकण लाटे, नगरसेविका सुजाता रेड्डी, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे, तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवकुमार होळदांडगे, संजय पाटील, महादेव देवशेट्टे, यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी, राजकिय, सामाजीक, व्यापार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मंडळी, नातेवाईक, नागरीक मान्यवर उपस्थित होते. चाकूर तालुक्यासह लातूर जिल्हा आणि मराठवाडा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य अध्याय काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. #📝मराठवाडा अपडेट्स














