mahesh m. shirkar
1K views • 1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ ऑगस्ट इ.स.१६६०*
विजापूरचा आदिलशाह छत्रपती शिवराय व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.
*१७ ऑगस्ट इ.स.१६६६*
"छत्रपती शिवराय" हे ९ वर्षाच्या बाळ शंभूराजेंना घेऊन तब्बल २,६०,००० मुघल सैनिकांच्या अजगर विळख्यातून वेशांतर करून आग्र्याच्या कैदेतून पसार झाले. छत्रपती शिवरायांबरोबर छत्रपती संभाजी राजांची आग्र्याहून सुटका (औरंगजेबाच्या मगरमिठीतून बाहेर )
मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवरायांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. छत्रपती शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ छ.संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवरायांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली.
ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
( तारखेबाबत संभ्रम आहे पण बहुतांश ठिकणी हीच आढळते ) #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
8 shares