पंतप्रधान झाले… पण जन्मगावाची माती पुन्हा कपाळी लावता आली नाही...! डॉ. मनमोहन सिंग म्हणजे भारताचे अर्थमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि जगातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ... पाकिस्तानातील गाह गावचा एक साधा मुलगा...मनमोहन सिंग यांचा जन्म १९३२ मध्ये तत्कालीन पंजाब प्रांतातील गाह गावात झाला....अगदीच लहान वयात त्यांच्या आईचं छत्र हरपलं....त्यांंचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला...फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलली..... पुढे ते भारताचे पंतप्रधान झाले. जगभरात त्यांचा सन्मान झाला. पण बालपणीची ती माती, ते घर आणि गावाच्या आठवणी त्यांच्या मनातून कधीच पुसल्या गेल्या नाहीत.... पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी त्यांना गाह गावाला भेट देण्याचे निमंत्रणही दिले होते. मात्र सुरक्षा आणि इतर कारणांमुळे ही भेट प्रत्यक्षात होऊ शकली नाही.... कल्पना करा… ज्या माणसाने आयुष्यात जगातील सर्वोच्च राजकीय पदांपैकी एक पंतप्रधानपद भुषवले, त्याला आपल्या जन्मगावाच्या मातीत पुन्हा एकदा पाऊल ठेवण्याची ,ज्या शाळेत ते चवथी पर्यंत शिकले त्या शाळेला भेट त्यांना खुप इच्छा होती… पण ती इच्छा शेवटपर्यंत अपुर्णच राहिली....🥹 फाळणीने केवळ देशाची सीमा बदलली नाही; तिने असंख्य लोकांच्या आठवणी, घरे आणि मातीशी असलेली नाळही तोडली....💔 मनमोहन सिंग यांचा प्रवास म्हणूनच एका महान अर्थशास्त्रज्ञाचा किंवा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास नाही तर तो आहे एका विस्थापित मुलाचा, संघर्षातुन उभा राहिलेल्या माणसाचा आणि आयुष्यभर आपल्या मातीतल्या आठवणी जपणाऱ्या एका हळव्या मनाच्या व्यक्तीचा प्रवास आहे... माणुस पद,पैसा,प्रतिष्ठा ने कितीही मोठा होऊद्या त्याला आपल्या जन्मभूमीची ओढ असते हेच यातुन दिसुन येते... जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला पदोपदी टिका , अपमान आला त्या महाण व्यक्तीची कमी आज देशाला पदोपदी जाणवत आहे... अशा या महान नेत्याला विनम्र अभिवादन....👏👏 #मनमोहनसिंग #DrManmohanSingh #मनमोहनसिंगयांच्या_आठवणी #जन्मभूमी #जन्मगाव #गाहगाव #फाळणी #भारत #पाकिस्तान #भारतीयइतिहास #इतिहासातीलपाने #भावनिककिस्सा #प्रेरणादायीप्रवास #मातीतलीनाळ #देशाचापंतप्रधान #मनमोहनसिंगजी #IndianHistory #India #PartitionHistory #🏛️राजकारण #😏मतलबी दुनिया #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #😍Marathi Status King #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
10 likes
9 shares

More like this