Vaibhav Mhatre
580 views • 17 hours ago
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१९_ऑगस्ट_१६०० बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#१९_ऑगस्ट_१६६६ शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटले आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि. १९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेतोजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#१९_ऑगस्ट_१६७५ शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१९_ऑगस्ट_१६८९ राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#१९_ऑगस्ट_१७५३ नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली १६५१ च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले. तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला. अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला, पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले. यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले, युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली आणि त्या बदल्यात मराठ्यांना १ कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले. रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले ती तारीख होती १९ ऑगस्ट १७५३
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
10 shares