Amar kokate Patil
5K views 1 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१६५४ शिवाजीराजांनी निळोपंताना पुरंदरसाठी इनामपत्र दिले. हे पत्र खालील प्रमाणे मसरूल हजरत अखंडित लक्ष्मी राजमान्य नीळकंठराऊ प्रती राजेश्री सिवाजी राजे दंडवत ।। उपरी ।। तुम्ही राजेश्री बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिल्याप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले व कित्येक मुखवचने नाईक माइले हाती सांगोन पाठविले तिही सविस्तर सांगितले व नाईक बोलिले की आम्ही त्यांसी तह केला आहे की जैसे काही राऊ गोसावी साहेबांसी वर्तत होते तैसेची हेही साहेबांसी वर्ततील व साहेब जैसे राजश्री राऊ गोसावी यांचे चालवत होते तैसेच यांचेही चालवावे ऐसा निश्चय करून आपण आलो असो म्हणऊन बोलिले ।। तरी जे काही बाबाजी नाईक तुम्हासी निश्चय केला तोच आमचा निश्चय आहे ।। जैसे काही राऊ गोसावी आम्हासी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हास वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राऊ गोसावी यांचे चालवित होतो तैसेच तुमचे चालऊन ।। एविशई आम्हास श्रीची व राजश्री साहेबांच्या पायांची व सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायांची आण असे व ये विशयी श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमान वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तोन ।। तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही ।।छ ६ सौवाल सु।। खमस खमसैन अलफ ।। हे पत्र पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले दिसते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_ऑगस्ट_१९४२ #ऑगस्ट_क्रांती_दिन इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे #९_आॅगस्ट अर्थात #क्रांती_दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी #९_आॅगस्ट_१९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ आॅगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. #जय_हिंद🇮🇳 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
38 likes
1 comment 37 shares

More like this