mahesh m. shirkar
844 views 1 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *१० ऑगस्ट इ.स.१६४८* छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळचे ठाणे जिंकले. *१० ऑगस्ट इ.स.१६६०* "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली. *१० ऑगस्ट इ.स.१६६६* "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती. *१० ऑगस्ट इ.स.१७४९* चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. *१० ऑगस्ट इ.स.१७५५* थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म. . *१० ऑगस्ट इ.स.१७६०* सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
16 likes
5 shares

More like this