Vaibhav Mhatre
977 views • 3 days ago
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२७_ऑगस्ट_१६५६
जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली.
जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता.
महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२७_ऑगस्ट_१६७९
१६७९ च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व सिद्दी आरमारासह सुरतेस गेला.
शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालींकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारूगोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली.
इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू हेरांकडून ही माहिती इंग्रजांना कळली.
हेरांनी स्पष्ट कळवले होते कि जर आज शिवाजीला रोखले नाही तर पुढे हे प्रकरण आवघड होईल त्यामुळे याचा लवकर बंदोबस्त करावा परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते कारण याच दिवशी इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली ‘हंटर’ नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिली.
दरम्यान पुढच्या ३-४ दिवसातच चौलला असणारा महाराजांचा ताफा सर्व रिसाल्यासह खांदेरीवर उतरला.
या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता मायनाक भंडारी.
मायनाक सोबत या वेळी सुमारे १५० माणसे व ४ लहान तोफा होत्या हे कळताच इंग्रजांना घाम फुटला आणि त्यांनी सप्टें १६७९ सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली तसेच नारायण शेणवी नामक वकिलाला शिवाजीराजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदवण्याकरिता रवाना केले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२७_ऑगस्ट_१६८३
गोव्याच्या पोर्तुगीज व्होईसरॉय याने जाहीर केले कि,
“संभाजीराजे मोठे सैन्य घेऊन गोव्यावर चाल करून येणार आहेत तरी सर्वांनी गोव्याच्या संरक्षणाच्या व्यवस्थेस लागावे”.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२७_ऑगस्ट_१६८५
उत्तर कोकणातील संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा काही प्रदेश
व किल्ले काबीज केले होते.
त्यातीलच “ किल्ले जीवधन” आजच्या दिवशी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून परत मिळवला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२७_ऑगस्ट_१६९०
किल्ले जिंजीस जुल्फिकार खानाचे वेढे पडले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
• 14 shares