Vaibhav Mhatre
596 views • 1 days ago
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_ऑगस्ट_१६७८ शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची एक वर्षानंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. हे स्वराज्य व्हावे हि तो श्रीं ची इच्छा हेच विचार मनात ठेऊन शिवरायांनी भगवा रोवत जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली. आता लक्ष दक्षिणेकडे, आपले स्वराज्य दक्षिणेत हि वाढवले पाहिजे म्हणून छत्रपती श्री शिवरायांनी आपले बंधू व्यंकोजी राजे यांची भेट घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_ऑगस्ट_१८०३ शके १७२५ श्रावण व .नवमी फिरंगी दि.११ ऑगस्ट इ.स.१८०३ रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती. शिंदे-होळकर आदी मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले होते. अहमदनगर चा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता. इंग्रजांची राजनीती मोठी धूर्त पणाची होती. श्रावण व.५ रोजी वेढया चे काम सुरू झाल्यावर जनरल वेलस्ली याने जाहीरनामा प्रसिद्ध केला की शिंदे-भोसले यांच्याविरुद्ध आमना सामना होणार आहे, प्रजेविरुद्ध नाही. जणू प्रजा आणि शिंदे-भोसले वेगळेच होते! दुसऱ्या दिवशी वेढ्याचे काम जोरात सुरू झाले. किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील काही लोक होते. थोडे घोडेस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते.या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याच्या तटास वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही. परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले. तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व वेलस्ली हा इंग्रज करत होता. किल्ल्याची तट व्यवस्था मजबूत असल्या कारणाने किल्ला मिळवणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने भिंगार गावा जवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले आणि त्याला चार हजार रुपये लांचं देऊ केली.त्याबरोबर हल्ला कोठे करावा याचे ज्ञान इंग्रजांना मिळाले श्रावण व. नवमी रोजी सहजा सहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_ऑगस्ट_१९०८ भारतातील सर्वात तरूण वयाचे तसेच सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
11 likes
8 shares