Vaibhav Mhatre
525 views • 7 hours ago
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑगस्ट_१६६१
(भाद्रपद शुद्ध षष्टी, शके १५८३, संवत्सर प्लव, बुधवार )
सर्व सरकारी कारकूनांना पालखीचा मान!
पावसाळा सुरू झाल्याने महाराजांनी प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी, प्रशासन व्यवस्थेत लक्ष घातले. आजच्या दिवशी राजगडी वास्तव्यास असताना शिवरायांनी रामराजपंतांच्या जागी "नरहरी आनंदराव" यांना पेशवेपदी नेमले, तर "अनाजीपंतास" वाकनिशी दिली. तसेच इतर काही मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑगस्ट_१६८१
औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” हि पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑगस्ट_१६८२
"दुर्ग रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने रामशेज दुर्गाच्या बरोबरीने डेरे (मनोरे ) उभे केले, पण मराठ्यांनी जबरदस्त हल्ला करून रात्रीतच ते नेस्तनाबूत केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑगस्ट_१६८८
माहुली गड मुघलांच्या ताब्यात गेला.
शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की,
'साल्हेरचा किल्लेदार आसोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन,आणि ४० हजार रुपये, १० घोडे, खिल्लत, इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन.
'किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादिरला भेटला ती तारीख होती २१ ऑगस्ट १६८८
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑगस्ट_१७३३
रोजी विश्वासराव बाजीराव पेशव्यांना लिहितात, “अंजनवेलीत अडकलेला सिद्दीसात पुन्हा जंजीऱ्यात न्यावा आणि अंजनवेलीत संबूळला ठेवावं असा व विचार झाला आहे” (पेशवे दफ्तर ३ लेखांक ६९).
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
12 shares