सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
2K views • 4 hours ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २० ऑगस्ट इ.स.१६४३
अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र!
रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजल खानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आगस्ट इ.स.१६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/nUG1HKWp6NQ
📜 २० ऑगस्ट इ.स.१६६६
( श्रावण अमावस्या, १५८८, संवत्सर पराभव, सोमवार )
औरंग्याचे मिरझा जयसिंगला फर्मान :-
रामसिंगाने फितुरी करून शिवरायांना जाऊ दिले व त्याबदल्यात मात्र, औरंग्याने रामसिंगला शिक्षा करण्यास फर्मावले. त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांचे दोन विश्वासू साथीदार रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबक डबीर, फौलाद खानाच्या धरपकडीत सापडले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २० ऑगस्ट इ.स.१६८३
औरंगजेबने दिनांक २० ऑगस्ट १६८३ रोजी शहाजादे अजम व त्याचा मुलगा बेदारबख्त यांची विजापुरच्या मोहिमेवर नेमणूक केली. ऑक्टोबरला अजम आपल्या फौजेसह मोहिमेवर निघाला. या मोहिमेचा मूळ हेतू विजापुराकडील छत्रपती संभाजी राजांकडे असलेला मुलूख काबीज करणे हा होता. इ. स. १६८४ च्या सुरुवातीस ह्या फौजेस रसद न मिळाल्यामुळे फारच हालांत दिवस काढावे लागले. ही दैन्यावस्था औरंगजेबस समजताच त्याने ४ फेब्रुवारी १६८४ रोजी अजम व बेदारबख्त भेटावयास आले असता त्यांस विजापुरांकडील मुलूख लुटण्याचा हुकूम दिला. त्या आज्ञेवरून त्यांनी सर्व मुलूख लुटून धारवाडच्या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि थोड्याच दिवसांत तो किल्ला फत्ते करून माघारे छावणीस गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजी महाराजांचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २० ऑगस्ट इ.स. १७६१
पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर माधवराव पुण्यात आले आणि पहिल्यांदा नजर वळविली ती निजामाकडे. निजामाने मराठे आता पुरते मोडले आहेत, असे समजून घोरपडे, जाधव, घाटगे अशा मराठा सरदारांना पेशव्यांविरुद्ध फितवले आणि नळदुर्ग काबीज केल्यानंतर तो थेट पुण्याच्या रोखाने निघाला. इकडे माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या 'उरूळी- कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही तोडून देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
28 shares