ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
437 views • 4 hours ago
श्रीलंकेच्या खालच्या फलंदाजांनी 2020-21 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची आठवण करून दिली. ज्यात हनुमा विहारी आणि रवी अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाने जिंकलेला सामना ड्रॉ करायला भाग पाडला होता. कालच्या सामन्यात देखील श्रीलंकेने तसेच पराक्रम करून दाखवला. कधी कधी ड्रॉ केलेला सामना देखील विजयापेक्षा कमी नसतो.
सोनलने शेवटच्या 4 फलंदाजांना सोबत घेऊन तब्बल 538 बॉल खेळून काढले. म्हणजेच, तब्बल 90 ओव्हर्स यांनी खेळण्याचा पराक्रम केला. असे वाटत होतं की शेवटच्या दिवशी पहिल्या सेशन मध्येच सामना भारत जिंकणार, तिथे यांनी अख्खा दिवस खेळून काढला. जितके श्रेय सोनल दिनुशाला मिळाले पाहिजे, तितकेच श्रेय केशारा नुवांथा, प्रभात जयसुरिया, लहिरु कुमारा आणि असिस्था फर्नांडो यांना दिले पाहिजे. तसेच, टॉपचे फलदांज पसिंदु सुरियाबंदारा(92), कमींदु मेंडीस(55) यांनी देखील उत्तम फलंदाजी केली होती. हा सामना क्रिकेट मधील 1 अविस्मरणीय सामना म्हणून ओळखला जाईल... #🤜श्रीलंका #🏏दिनुशाने भारताच्या तोंडचा घास पळवला👊 #🔥श्रीलंका vs इंडिया 🏏 #🏆कसोटी क्रिकेट अपडेट्स🏏 #🏏क्रिकेट
16 shares