सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
800 views • 15 hours ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜१ सप्टेंबर इ.स.१६६०
( भाद्रपद शुद्ध सप्तमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शनिवार )
छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते बांदा हा प्रदेश जिंकून घेतला.
“चौल” जगाच्या नकाशातील एके काळचे भरभराटीचे बंदर इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे. त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते. असे हे विस्मरणात गेलेले चौल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना फारचं वेगळे भासले. चौल आज समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. जगाच्या नकाशात त्याकाळी “दक्षिण काशी” अशी महत्वाची भूमिका बजावणारे चौल आज त्याच नकाशात शोधावे लागते, कालाय तस्मै नम:, म्हणतात ते हे असे इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो. पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी,
असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले.
इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 १ स्पटेंबर इ.स.१६८२
दक्षिणेत येताच औरंगजेबाने स्वराज्यातील महत्वाचे किल्ले आणि मुलुख घेण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या.यात त्यांनी १६८२ च्या सुरुवातीला सातारा परिसरात हल्ले चढवले.या मोहिमेसाठी बादशाहाने खानजहान बहादूरला पाठवले होते. त्याने मराठ्यांच्या ताब्यातील साताऱ्या जवळील रहिमतपूर आणि इतर गावे लुटली.यासह खानजहानने सातारागड,आदल,सुबदल,रहिमतपूर या भागातील जंगल ताब्यात घेतले आणि काही ठिकाणी आगी लावल्या.सरदार भीमराव आणि त्याची मुले त्याच्या हाती सापडली.त्यांच्याबरोबरच २५ हजार कैदीही सापडले.त्यात १० हजार मुसलमान होते.याबरोबरच ८ हजार जनावरेही त्याने पकडली.ही सर्व लूट पेडगाव येथे ठेऊन तो मराठी मुलाखत पुन्हा हल्ले करणार होता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १ सप्टेंबर इ.स.१७६०
सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात,
"माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत,
कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत
आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी".
दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहाअब्दाली, नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं. अब्दाली आपल्या सैन्यासह, यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता, तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ सप्टेंबर इ.स.१८१६
१९ सप्टेंबर इस. १८१५ रोजी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रज अधिकारी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने कैदेत ठेवले...
त्रिंबकजी डेंगळे हे एक उत्तम कारभारी आणि प्रशासक होते. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर गेल्या पंधरा वर्षात असा उत्तम कारभारी पेशव्यांना मिळालेले नव्हते. नानांची काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त, कडवेपणा आणि मुख्यतः दौलतीचे हीत हे सारे गुण जसेच्या तसे त्रिंबकजींत पुरेपूर उतरले होते. वसईच्या तहामुळे पेशव्यांची झालेली नामुष्की आणि या गोऱ्यांच्या अवलादीपासून दौलत वाचवायची असेल तर त्रिंबकजींच हवे हे बाजीरावही पक्के जाणून होतेच. बाजीरावांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याकरिता गुप्त हालचाली सुरू केल्या. अन् अखेर एक वर्षानंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. दि. १ सप्टेंबर १८१६ या दिवशी त्रिंबकजी डेंगळे इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या त्या कडक बंदोबस्तातून अलगद निसटले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १ सप्टेंबर इ.स.१९३०
धुळय़ाचा पाठीराखा लळींग
लळिंगच्या डोंगरावर अनेक खुरटी झाडे आहेत. पावसाळय़ानंतर यामध्ये गवताळ कुरण तयार होते. या गवतातून अनेक रानफुलेही उमलतात, कोंबडतुरे डोकावू लागतात. लळींगच्या या गवतालाही खरेतर ऐतिहासिक संदर्भ! महात्मा गांधींनी ज्या वेळी 'मिठाचा सत्याग्रह'चे आंदोलन जाहीर केले, त्या वेळी त्याच्या समर्थनार्थ खान्देशातही चळवळ उभी राहिली. फक्त अडचण आली, ती इथे समुद्र-मीठ कुठून आणायचे? मग या भिल्ल, आदिवासी जनतेने ब्रिटिशांनी गवत कापण्याविरोधात केलेला कायदा मोडण्याचे ठरवले. १ सप्टेंबर १९३० रोजी ही सारी जनता इथे लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाली आणि गवताची कापणी करत त्यांनी सविनय कायदेभंग केला. लळींगच्या गवताला जणू दांडीच्या मिठाचे महत्त्व आले!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
11 shares