-Kalpana K
#🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश . .ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. ***********************
.परमेश्वराबद्दल जी आसक्ती निर्माण होते त्यामुळे मनुष्य प्रपंचात गुंतून न राहता एकेका पाशातून मुक्त होत मोक्ष गाठतो. परमेश्वर म्हणजे ज्ञानियांचे गुज आहे. मुक्तीचे बीज आहे.
. .*********************************************.. पैं गा मानुष्यचिया सहस्त्रशा lमज विपायले याचि धिंवासा l
तवसे यां यम धिवसेकरं बहुवसां ।माजी विरळा जाणे ll
. **************[ ज्ञानेश्वरी-७/१०]***************
. ll अर्थ ll
. हजारो माणसात एखाद्यालाच ज्ञानप्राप्तीची इच्छा असते. आणि त्या पुष्कळ इच्छा करणाऱ्यांमध्ये माझ्या स्वरूपज्ञानास एखादाच जाणतो.
ll स्पष्टीकरण ll
. या सातव्या अध्यायात भगवंत आपणास विज्ञान योगाचे महत्त्व सांगणार आहेत हे ऐकून अर्जुनास खूप आनंद झाला. भगवंत म्हणतात, अर्जुना तू आता योगयुक्त झालास मी आता तुला प्रपंचासह ब्रह्मज्ञान सांगणार आहे. त्यायोगे तू सर्वव्यापी अशा मला तळहातावरील रत्नाप्रमाणे स्पष्टपणे जाणशील.
. जिथे जाणीव संपते, विचारही मागे फिरतात, चातुर्यही चालत नाही याचेच नाव ज्ञान आणि प्रपंचाची सत्यत्व बुद्धी याचेच नाव अज्ञान, वक्त्याचे बोलणे थांबते व ऐकणाऱ्याच्या इच्छा संपतात त्याचेच नाव ज्ञान होय. हजारो माणसात एखाद्यालाच ज्ञानप्राप्तीची इच्छा असते आणि त्या पुष्कळ इच्छा करणाऱ्यांमध्ये माझ्या स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो.
. परमेश्वराबद्दल जी आसक्ती निर्माण होते त्यामुळे मनुष्य प्रपंचात गुंतून न राहता एकेका पाशातून मुक्त होत मोक्ष गाठतो. परमेश्वर म्हणजे ज्ञानियांचे गुज आहे. मुक्तीचे बीज आहे. संतांची विश्रांती आहे. ईश्वर म्हणजे लावण्याचा सागर आहे. तो सुकुमार आहे, राजहंस आहे. त्याच्या रूपासमोर लक्ष लक्ष सूर्यसुद्धा म्लान होता. ईश्वराचे नाम म्हणजे पंचम वेदच आहे.
. शब्दाच्या माध्यमातून परोक्षज्ञान होऊ शकते तर अनुभूतीने अपरोक्षज्ञान होते. माऊली म्हणतात, दृष्य सृष्टीला सत्य मानणे म्हणजे अज्ञान होय. अवघी दृष्य सृष्टी म्हणजे विज्ञान होय आणि या सर्वांचा निरास करणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान व विज्ञान म्हणजे विश्वज्ञान.
. अशी विद्या शिकली पाहिजे की जिच्याने ज्ञानाचा उदय होऊन माणूस खरोखर कृतार्थ झाला पाहिजे. सामान्य लोक. लौकिक विद्याभ्यास करतात तर महात्मे आत्मविद्येचा ध्यास धरतात.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll