सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views • 4 hours ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ११ आगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य ६, षष्ठी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)
आग्रा येथे नजरकैदेत महाराजांच्या आजारपणाची औरंगजेब बादशहास बातमी!
औरंगजेब बादशहास त्याच्या हेरांकरवी महाराज आजारी असल्याची बातमी समजली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏 प्रेरणादायक बॅनर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/BYoxxtY975Q?feature=share
📜 ११ ऑगस्ट इ.स.१६७८
छत्रपती श्री शिवरायांनी
त्यांचे सावत्र बंधु व्यंकोजीराजे यांची पुन्हा एक वर्षा नंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. हें स्वराज्य व्हावे ही तो श्री ची इच्छा हेच विचार मनात ठेवून छ. शिवरायांनी भगवा रोवत जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली आता लक्ष दक्षिणेकडे,आपले स्वराज्य दक्षिणेतही वाढवले पाहिजे म्हणून छ.शिवरायांनी आपले बंधु व्यंकोजी राजे यांची भेट घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१० ऑगस्ट इ.स.१७६३
दक्षिण तीरी राक्षसभुवनावर दहा-पंधरा हजार फौज व गारदी व तोफखाना घेऊन विठ्ठल सुंदर राहिला होता. त्यावर पेशव्यांच्या सैन्याने झडप घातली. चार-सहा घटका निकराचे युद्ध होऊन मोगलांचा मोड झाला. बिट्ठल सुंदर, विनायकदास व खंदारचा राजा हे मारले गेले. उदाजी पवार, जोत्याजी घाटगे, मालोजी घोरपडे, बाबूराव जंगी, माधवराव व रघुनाथराव पिंगळे, बाबूराव जाधव, शहाजी सुपेकर, जयाप्पा जाधव, बाजीराव पाटणकर, शिवराव पवार, मुरादखान, अजमखान पठाण आदि सोळा सरदार पाडावात सापडले. शिवाय मोगलांच्या कमीत कमी वीस तोफा, पधरा हती, घोडे, उंट, बैल, डेरे, राहुट्या वगैरे सर्व सामान मराठ्यांचे हाती सापडले. अशा रीतीने मोगलांचा पराभव झाला. या युद्धात मराठ्यास जे यश आले त्याचे श्रेय माधवराव पेशव्यांच्या शौर्य, धोरण व व्यवस्थितपणा याकडे जाते. निजामअल्ली औरंगाबादेस येऊन पोचल्यावर त्याच्या पाठोपाठ त्याचा औरंगाबादचा गव्हर्नर मुरादखान यास मराठ्यांनी आपल्या कैदेतून सोडवून त्यास औरंगाबादेस निजामअल्लीकडे तहाच्या अटी घेऊन रवाना केले. एक कोट मुलूख, दहा लाख रुपये आणि तीन किल्ले सलुखासाठी मराठ्यास द्यावे अशी मराठ्यांची मागणी होती. निजामअल्लीने ही मागणी नाकारल्यावर मराठे औरंगाबादेवर चालून गेले. पण अनेक कारणांमुळे मराठ्यास निजामाचा पूर्ण पराभव करता येईना. पावसाळाभर मराठा सैनिक रणांगणात असल्यामुळे युद्धास कंटाळून घरी जाण्याची वाट पाहू लागले. इतक्यात तिकडे कर्नाटकात हैदरअल्लीने मराठ्यांचा मुलूख पादाक्रांत केल्याच्या बातम्या येऊन ठेपल्या. अशा स्थितीत निजामअल्लीशी तह करणेच पेशव्यास भाग पडले. तहात उदगीरच्या तहातला साठ लाख व नवीन बावीस लक्ष असा एकंदर ब्याऐंशी लक्षावर २५ सप्टेंबरला तह कायम झाला. उभयतानी युद्धप्रसंगी एकमेकांचे सहाय्य करावे असा करार ठरला. राक्षसभुवनाची लढाई १० ऑगस्टला होऊन वरील तह २५ सप्टेंबरला कायम झाला.बाळाजी जनार्दन उर्फ नानासाहेब फडणीस यास फडणिशी दिली. या तहापासून तो तह १७९५ पर्यंत निजाम व पेशवे यांचे वितुष्ट आले नाही. राक्षसभुवनावरील विजयामुळे माधवरावाचा दरारा आणि वचक दक्षिणउत्तरेच्या राज्यकारभारांत बसला. इथून रघुनाथराव मागे पडून माधवरावाकडे मराठी सत्तेची सर्व सूत्रे आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ ऑगस्ट इ.स.१८०३
शके १७२५ श्रावण व .नवमी फिरंगी दि.११ ऑगस्ट इ.स.१८०३ रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती.शिंदे-होळकर आदी मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले होते.अहमदनगर चा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता.इंग्रजांची राजनीती मोठी धूर्त पणाची होती.श्रावण व.५ रोजी वेढया चे काम सुरू झाल्यावर जनरल वेलस्ली याने जाहीरनामा प्रसिद्ध केला की शिंदे-भोसले यांच्याविरुद्ध आमना सामना होणार आहे,प्रजेविरुद्ध नाही.जणू प्रजा आणि शिंदे-भोसले वेगळेच होते! दुसऱ्या दिवशी वेढ्याचे काम जोरात सुरू झाले.किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील काही लोक होते.थोडे घोडेस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते.या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याच्या तटास वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही.परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले.तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व वेलस्ली हा इंग्रज करत होता.किल्ल्याची तट व्यवस्था मजबूत असल्या कारणाने किल्ला मिळवणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने भिंगार गावा जवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले.आणि त्याला चार हजार रुपये लांचं देऊ केली.त्याबरोबर हल्ला कोठे करावा याचे ज्ञान इंग्रजांना मिळाले श्रावण व.नवमी रोजी सहजा सहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜११ ऑगस्ट इ.स.१९०८
भारतातील सर्वात तरूण वयाचे तसेच सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇.
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
17 likes
18 shares