Vaibhav Mhatre
559 views • 9 hours ago
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२०_ऑगस्ट_१६६६ शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले. ह्या ठिकाणी ठाणेदार होता लतीफखान. आग्र्याहून सुटल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले. तिकडे रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार आग्र्यामध्ये फुलादखनास सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२०_ऑगस्ट_१६६६
औरंगजेब बादशहाने "मिर्झाराजे जयसिंग" यांना फर्मान पाठवून आग्रा कैदेतून छत्रपती शिवराय निसटण्यामागे "कुंवर रामसिंग" जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_ऑगस्ट_१६८४ शहजादा अकबराने कवी कलशाला पत्र पाठवून त्याच्या तब्येतीची, भिमगडाच्या तहाची, मुहम्मद अज्जमच्या वकीलासोबत काय ठरले इ. गोष्टींची चौकशी केली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
• 15 shares