:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५६५ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज - ज्याला तीर्थाच्या ठिकाणीच देव आहे आणि इतर सर्व ठिकाण देवा शिवाय ओस आहेत असे दिसते त्याच्या ज्ञानी पनातच दोष आहे, देव सर्वत्र आहे हे न कळल्याचा दोष त्याच्या ज्ञानी पनातच आहे असे समजावे. अशा भक्तांला देवाला चुकवण्यासाठी चांगली संधी मिळते आणि त्याच्यावर त्याच्या पूर्व पापाच्या संचिताची सत्ता असते त्यामुळे देवापासून तो अंतरतो. एखादे ठिकाण शुध्द आहे आणि एखादे ठिकाण अशुध्द आहे असे मानने म्हणजे पाप पुण्याचे बीज चित्तामध्ये उत्पन्न होणे व त्यामुळे जे हरीच्या कृपेचे फळ आपल्याला प्राप्त होणार असते ते न मिळता दुसरेच फळ आपल्याला मिळते आणि जन्म-मरण चालूच राहते. तुकाराम महाराज म्हणतात विश्वंभर सर्व विश्वात व्यापक आहे हे जर वर्म कोणाला समजले नाही आणि केवळ तीर्थव्रत केले तर त्याचे सर्व धर्म हे मिथ्या होतात. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०४/०९/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏शिव पार्वती सॉंग्स 🙏 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩
3 shares

More like this