mahesh m. shirkar
1K views • 1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१९ ऑगस्ट इ.स.१६७५*
छत्रपती शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली.
*१९ ऑगस्ट इ.स.१६००*
बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.
*१९ ऑगस्ट इ.स.१६६६*
शिवराय औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा छत्रपती शिवराय सुटले आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले होते .महाराज आग्र्याच्या भेटीस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले होते .
*१९ ऑगस्ट १६८९*
छत्रपती राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
20 shares