:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५४४ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- धर्म कोणाला कळत असेल किंवा नसेल तरी त्याचे एक वर्म मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. ते म्हणजे तुम्ही माझ्या विठोबाचे नाम आटटाहासाने उच्चारा. ज्याला जी चांगली वाट पाहिजे ती वाट विठोबा त्याला दाखवील. तो खूप मोठा कृपावंत आहे परंतु त्याच्याविषयी आपल्या हृदयामध्ये कळवळा पाहिजे. जर एखाद्या अज्ञानी व्यक्तीला प्रवास करताना वाट विचारली तर आपण चुकण्याची शक्यता असते त्यामुळे तो जो ज्ञानी आहे त्यालाच मार्ग विचारतो. त्याप्रमाणे आपल्याला परमार्थामध्ये विठोबा सारखा सर्वज्ञानी वाटाड्या पाहिजे तो आपल्या बरोबर असला की तो आपल्याला नरकाच्या वाटा मोडू देणार नाहीये आणि आपल्या जवळील भक्ती प्रेमाचे सामान देखील कामक्रोधादी चोरांना घेऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात याच्या बदल्यांमध्ये त्या विठोबाला कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही केवळ तुमच्या वाणीने एवढेच बोला. विठ्ठल विठ्ठल असे केवळ म्हणा आणि तो छंद मनाला लावा. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१४/०८/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏आई एकविरा 🙏 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #📜विठ्ठल-माऊली बॅनर #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
9 likes
14 shares

More like this