Santosh D.Kolte Patil
530 views • 1 days ago
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी म्हणून सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख होतो. ब्रिटिशांच्या सत्तेचा सूर्यास्त करून स्वातंत्र्याचा सूर्योदय व्हावा म्हणून इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी भारताची पहिली सेना सुभाष बाबुंनी उभारली. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते नेताजी सुभाषचंद्र बोस झाले. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी त्यांनी फक्त आझाद हिंद सेना उभारली नाही तर, परराष्ट्रीय धोरण आखून ब्रिटिशांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय लढा देखील उभारला होता.
प्रखर राष्ट्राभिमानी नेताजींची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन!
#नेताजी_सुभाषचंद्र_बोस #नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी #नेताजी सुभाष चंद्र बोस पुण्यतिथी #💐नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी🙏 #🙏नेताजी सुभाषचंद्र बोस #नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतीदिन
11 shares