mahesh m. shirkar
1K views • 12 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ ऑगस्ट इ.स.१६८८*
माहुली गड मुघलांच्या ताब्यात गेला.
*२१ ऑगस्ट इ.स.१६६२*
छत्रपती शिवरायांनी रामराजपंतांच्या जागी "नरहरी आनंदराव" यांना पेशवेपदी नेमले, तर "अण्णाजी दत्तो" यांना वाकनिशी दिली. तसेच इतर काही मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.
*२१ ऑगस्ट इ.स.१६८१*
औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” हि पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले.
*२१ ऑगस्ट इ.स.१६८२*
"किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
7 shares