:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५३८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- लोकांनो मी संसार सोडला त्यामुळे तुम्ही माझ्यावर विविध आरोप का ठेवता खरे तर हे माझ्या पूर्व संचितामुळेच ओढावले आहे. हरीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम गोडी बसली त्यामुळे अंतःकरणात आनंद निर्माण झाला. माझ्या ज्ञानदृष्टीवर अज्ञानाचा पडदा पडला होता तो त्या विठ्ठलाने दूर केला त्यामुळेच सर्व जगच मला ब्रम्हानंदाने भरलेले दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "या गोपाळाने मला वासनेपेक्षा वेगळे करुन ठेवले त्यामुळे माझी गोपाळावर आवड बसली आहे." :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०८/०८/२०२६ वार-शनिवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏
13 likes
12 shares

More like this