Suraj Chavan
527 views • 6 hours ago
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 २१ ऑगस्ट इ.स.१६६१
सण १६६१ च्या एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी पालवणच्या जसवंतराव दळवी आणि त्याचा आश्रयादाता शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे यांचा बंदोबस्त केला. महाराजांच्यासोबत यावेळी १५ हजारांची पायदळ सेना होती.पुढे या सूर्यराव सुर्वेला आश्रय देणारे कुडाळकर लखम सावंतही महाराजाच्या भीतीने कुडाळ सोडून डोंगरात निघून गेले. तेथील व्यवस्था लावून महाराज महाडला आले. राजापूराच्या महाराजांच्या कैदेत असणारे परकीय कैद्यांच्या सुटकेसंदर्भात सुभेदार रावजी पंडित यांना सूचना देऊन महाराज शाहिस्तेखानाच्या हालचालीना पायबंद घालण्यासाठी कल्याणला आले.पण त्यांना त्यात अपयश आले. पावसाळ्याच्या पूर्वी महाराज राजगडावर आले आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत शामराज निळकंठ रांझेकर यांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवेपद दिले तर अनाजीपंताना वाकेनिस पद दिले. याबरोबरच सर्व मंत्र्यांना पालखीचा मान दिला. राजगडावर झालेल्या या बदलाची तारीख होती.
📜 २१ ऑगस्ट इ.स.१६८२
"किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले.
📜 २१ ऑगस्ट इ.स.१६८८
ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता, पुरंदरच्या तहात तो पुन्हा मोगलांकडे गेल्यावर १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की,'साल्हेरचा किल्लेदार आसोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन,आणि ४० हजार रुपये,१० घोडे,खिलत,इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन.'किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादिरला भेटला.
📜 २१ ऑगस्ट इ.स.१७११
चंद्रसेन जाधवरावांच्या ह्या उघड बंडाने महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली. ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. छत्रपती शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू महाराज राजे डगमगले नाहीत. त्यांनी चंद्रसेन जाधवांकडील सेनापतीपद काढून ते ता. १ ऑक्टोबर १७११ रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११). याच सुमारास शाहू राजास बातमी समजली की, आपल्याकडील परशुरामपंत
प्रतिनिधीसुद्धा ताराबाईच्या पक्षास मिळण्याच्या बेतात आहे, तेव्हा प्रतिनिधींना कैद करून (२० नोव्हेंबर
१७११) त्यांचा सरंजाम, घर, जिंदगीसुद्धा जप्त केली. चंद्रसेन जाधवांचा फितवा हेच शाहू राजांवर आलेले सर्वात अरिष्ट होय. या अरिष्टाची उठावणी दाऊदखान पन्नीच्या कारवाईने सिद्ध झाली. ताराबाईंनी त्यांत भर घातली आणि शाहू राजांवर नाराज झालेले खटावकर, थोरात, चव्हाण इत्यादी सरदारांना उठाव करण्यास राणीनी प्रोत्साहन दिले, मोठा पेच उत्पन्न झाला. त्यास शाहू राजांनी धिमेपणानें तोंड देऊन सर्वाच्या बंडाचा उपशम वर्ष सहा महिन्यात केला.
📜 २१ ऑगस्ट इ.स.१७३३
रोजी विश्वासराव बाजीराव पेशव्यांना लिहितात, “अंजनवेलीत अडकलेला सिद्दीसात पुन्हा जंजीऱ्यात न्यावा आणि अंजनवेलीत संबूळला ठेवावं असा व विचार झाला आहे” (पेशवे दफ्तर ३ लेखांक ६९). मध्यंतरी सेखोजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्याने अंजनवेलच्या कामात थोडा ढिलेपणा आला. याचा फायदा प्रतिनिधींनी घेतला आणि त्यांनी आपली माणसं अंजनवेलच्या मोर्चावर बसवली. त्यात प्रतिनिधींनी साताऱ्यात शाहू महाराजांना लिहिलं की, “अंजनवेली घेऊन तरीच उठोन, अन्यथा उठतो ऐसे नाही”, आणि म्हणूनच महाराज प्रतिनिधींवर खुश होते. यानंतर अचानक प्रतिनिधींनी आपला मुक्काम चिपळूणच्या प्रदेशातून हलवला, बाजीरावांना स्वतःलाही उत्तरेच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं लागलं आणि मोहीम जवळपास स्थगित झाल्यासारखी झाली. इ.स. १७३५ मध्ये चिमाजीअप्पा, नारोराम मंत्री वगैरे लोक पुन्हा फौजेनिशी कोकणात उतरल्यावर मोहिमेला पुन्हा तरतरी आली. एप्रिल १७३६ मध्ये खास जंजिरेकर सिद्दी सात हा मारला गेला. हि खबर साताऱ्यात शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी तोफा उडवण्याची आणि नौबत वाजवण्याची आज्ञा दिली, म्हणाले, “सिद्दीसातासारिखा गनीम मारिला, हे कर्म सामान्य न केले” (पेशवे दफ्तर ३ लेखांक १८२). अप्पांना वस्त्रं, तलवार आणि बहुमान तसेच मानाजी आंग्रे यांनाही वस्त्रं आणि पदक पाठवलं. बाजीरावही म्हणतात, “राजश्री स्वामींचे (शाहू महाराज) प्रतापे व कैलासवासी नानाचे (बाळाजी विश्वनाथ) आशीर्वादे व स्वामींचे (ब्रह्मेंद्र) आशीर्वादे राजश्री आपास यश थोर आले”
📜 २१ ऑगस्ट इ.स.१८५७
जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली. त्या सैनिकात बहुसंख्य राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला. तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणि आलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री स्वामी समर्थ📿
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
18 shares