❤🚩शिवभक्त🚩❤
5K views 21 hours ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२३ जुलै इ.स.१६६६* *शिवरायांना मारण्याचा कट..!* *आग्र्यात नजरकैदेत असताना औरंगजेबाने आजच्या दिवशी शिवरायांना विठ्ठलदास हवेलीत नेऊन राजांचा काटा काढण्याची गुप्त मसलत राजांच्या कानावर आली होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ जुलै इ.स.१६७१* *छत्रपती शिवाजी महाराजांचे पाटीलकीवरून चाललेल्या तंट्याविषयी पत्र* *पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ जुलै इ.स.१६८२* *मराठ्यांनी रेवदंड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला. एकाचवेळी त्यांनी ह्या किल्ल्यावर सदरहू शहराच्या तटावर तसेच कोरलाईच्या किल्ल्यावर हल्ला केला. कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो.* *त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ जुलै इ.स.१७२४* *कान्होजी आंग्रेंचे इंग्रज गव्हर्नर फिप्स यास पत्राद्वारे उत्तर* *इंग्रज वा पाश्चात्य देशातील लोक सर्व समुद्र स्वतःच्या मालकीचा मानीत. शत्रूचा उल्लेख चोर, चाचे, लुटारू, दरोडेखोर असाच करत असत. इंग्रजांच्या पत्राद्वारे आलेल्या उद्दाम उत्तराला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे इंग्रजांचा मुंबईचा गव्हर्नर फिप्स यास* *२३ जुलै सन १७२४ पत्राद्वारे उत्तर. "आमचा कारभार चोरीच्या धंद्यावर चालला आहे हें म्हणणें तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांस शोभत नाही. शिवाजीमहाराजांनी चार पातशहांशी युध्द करून मराठी राज्य स्थापिलें, त्यांचा मी केवळ एक चेला आहें. कायदेकानू पाळून जे कोणी व्यापार करतील त्यांस आमचेकडून उपद्रव होणार नाही."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ जुलै इ.स.१७४१* *महमदखान बंगश व गुजरातचा अभयसिंग. बादशहाने या सुभेदारांकडून जर चौथाईच्या रकमा घेऊन त्या मराठ्यास दिल्या असत्या तर मराठ्यांना माळवा, बुंदेलखंड, गुजरात या प्रांती मुलूखगिरी स्वाऱ्या करण्याचा प्रसंग आलाच नसता. बादशहाने बहाल केलेले चौथाईचे हक्क मराठ्यास प्रस्थापित करणे भाग पडले. साध्या मागणीने त्याची अंमलबजावणी होईना. त्या त्या प्रांतातील सुभेदार मराठ्यांची ही मागणी धुडकावून देऊ लागले, म्हणून मराठ्यांना ह्या प्रांतावर मुलूखगिरी करून आपले हक्क प्रस्थापित करावे लागले. मुलूखगिरी करत असता संघर्ष निर्माण होणे अपरिहार्य होते. असे संघर्ष निर्माण होऊन लढाया होत व या लढायात शत्रू सैन्यात धुव्वा उडे. मराठ्यांची सत्ता वाढीस लागे. अशा रीतीने मुलूखगिऱ्या करून माळवा मराठ्यांच्या ताब्यात आला. बादशहाने त्यास मराठ्यांचा मुलूख म्हणून मान्यता दिली (२३ जुलै १७४१). गुजरातवर मुलूखगिरी स्वाऱ्या होतच होत्या, पण तो प्रदेश मराठ्यांच्या अंकित्वाखाली इ. स. १७४७ मध्ये पूर्णपणे आला. मराठी सत्ता तिथे प्रस्थापित झाली ती मुलूखगिरीद्वाराच.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ जुलै इ.स.१८५६* *लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांचा जन्मदिन समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी.* *(मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२३ जुलै इ.स.१९०६* *चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
72 likes
84 shares

More like this