-Kalpana K
#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश . . ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. ----------------------------------------
. .. त्रिगुण एकमेकांच्या सहाय्याने व आश्रयाने कार्य करतात. हे त्रिगुण एकमेकांना कधीही सोडून रहात नाहीत. रज व तत्र हे दोन गुण कमी करून सत्त्वगुणाकडे झेपावणे म्हणजे सद्गुणांची प्राप्ती करून मोक्ष मिळवणे होय.
. **********************************************
. जे सात्विक हन भाव l कां रजतमा दि सर्व l
. ते मम रूप संभव l ओळखे तू ll
. ***************[ ज्ञानेश्वरी अ.७/५३]************
. ----ll अर्थ ll---
. सात्विक, राजस व तामस हे सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. पण यात मी मात्र नाही..
. ll भावार्थ ll
. वरील ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात, सर्वात मी आहे, पण मी कशातच नाही. याचा अर्थ असा की, सर्व जड तत्त्वे जरी माझ्यापासून तयार झाली असली तरी त्यांतील सूक्ष्म, अव्यक्तभाव मी आहे. त्यामुळे मी कोठेच दिसत नाही. सत्त्व, रज, तम या त्रिगुणातील भाव माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत पण त्यात मात्र मी नाही. विकार जरी भगवंतापासून उत्पन्न झाले तरी तो विकारी नाही.
. पृथ्वीच्या पाच मात्रा आहेत- शब्द, रूप, रस, गंध व स्पर्श होय. जलाच्या एकूण चार मात्रा अहेत त्या म्हणजे शब्द, रूप, रस, स्पर्श होय. तेजाला एकूण तीन मात्रा आहेत त्या म्हणजे शब्द, रूप, रस होय. वायूला मात्र फक्त दोनच मात्रा सांगितल्या आहेत शब्द, स्पर्श होय. आणि आकाशाची एकमेव तन्मात्रा म्हणजे शब्द अशी सांगितली आहे.
. ढगात पाणी असते; पण पाण्यात ढग नसतो. बीजापासून लाकूड उत्पन्न होते; पण लाकडात बी नसते. धुरापासून अग्नी निर्माण होत नाही अग्नीपासून धूर उत्पन्न होतो. सत्त्व, रज, तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत. म्हणजे प्रकृती त्रिगुणात्मक आहे. सत्त्वगुण हा बोधात्मक प्रकाशदायी व आनंददायी आहे. सर्व सद्गुण सत्त्वगुणी असतात. प्रवृत्ती हे रजोगुणाचे लक्षण आहे. तो चंचल आहे. सत्त्व आणि तम गुणांना कार्य प्रवृत्त करण्यास रजोगुणच उपयोगी आहे. तमोगुण हा जडत्व निर्माण करून अज्ञानाचे आवरण घालणारा आहे अज्ञान, आळस, निष्क्रियता, मोह हे तमोगुणी आहेत.
. हे त्रिगुण एकमेकांच्या सहाय्याने व आश्रयाने कार्य करतात. हे त्रिगुण एकमेकांना कधीही सोडून रहात नाहीत. रज व तत्र हे दोन गुण कमी करून सत्त्वगुणाकडे झेपावणे म्हणजे सद्गुणांची प्राप्ती करून मोक्ष मिळवणे होय.
. ll रामकृष्ण हरी, माऊली ll