सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views • 5 hours ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 १४ जुलै इ.स.१६५९
(श्रावण शुद्ध ५, पंचमी, शके १५८१, संवत्सर विकारी, वार गुरुवार)
महाराजांचे वकिल सोनोपंत डबीर महाराजांकडे दाखल!
शिवरायांचे वकील सोनोपंत डबीर मसलतीच्या चर्चेसाठी औरंगजेबास भेटून शिवाजीराजांसमोर हजर सोनोपंत डबीर हे महाराजसाहेब शहाजी राजे यांचे विश्वासू सेवक स्वराज्याचे पहिले पेशवे पुत्र रघुनाथपंत डबीर हेही स्वराज्य सेवक चोख कारभारी स्वामीनिष्ठ पेशवे आणि एक चांगला माणूस.सोनोपंत पंत म्हणून जनमानसात प्रसिद्ध होते.स्वराज्याच्या बाल्यावस्थेत त्याचे लालनपालान पंतांनी अगदी मनापासून केले म्हणूनच स्वराज्य उभे राहतानाच सुराज्य बनले. राजे पंतांना आपल्या पित्याप्रमाणे वागवत.पंतंही आपला अधिकार जाणून जर कधी राजेंचे चुकलेच तर वडीलकीच्या नात्याने कान धरीत.अशी ही स्वराज्याच्या पहिल्या पेशव्याची ओळख.अफझुल्या स्वराज्यात असताना सोनोपंत काका यशस्वी मसलतीसाठी औरंगाबादेस गेले. औरंग्याशी चर्चा करून मोघलांची आघाडी शांत केली.महाराज आता अफझलखानवर पूर्ण लक्ष देऊ शकत होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/y58uiuUmQYc?feature=share
📜 १४ जुलै इ.स.१६६०
( आषाढ वद्य द्वितीया, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शनिवार )
बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू यांचे विशाळगडावर अंत्यसंस्कार!
बाजी काका, फुलाजी काका, नरवीर शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले यात काही शंकाच नाही. " साहेब तुम्ही विशालशैल गाठा आम्ही साहेब कामावरी मरतो " बाजीप्रभू काकांचे हे अंतिम शब्द खरे झाले. अखेर आजच्या दिवशी विशाळगडी शिवरायांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करण्यात आले. आजही बाजी आणि फुलाजी काकांच्या समाधीसमोर उभे राहिले असता त्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे आपले शब्द फिके पडतात.
धन्य ते बाजी काका,
धन्य ते फुलाजी काका,
धन्य ते शिवकाशीद काका!
अखेर आज शिवरायांच्या उपस्थितीत बाजी व फुलाजी काका यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
#धन्य ते बाजी
#धन्य ते फुलाजी
#धन्य ते शिवा काशीद
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १४ जुलै इ.स.१६७४
"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली.
राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली. पेडगावची लूट छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी मुघल सुभेदार बहादूरखानचा केलेला "एप्रिल फुल"
छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक राज्याभिषेक सोहळा रायगडवर संपन्न झाल्यावर आर्थिक रसद मिळण्यासाठी महाराजांचं लक्ष मोगली अधिपत्यात असलेल्या पेडगांवकडे गेलं. योजना तयार झाली.
स्वराज्याच्या सैन्याच्या लहान तुकडीनं बहादूरखानाच्या बहादूरगडवर हल्ला चढवला. मोगली सेनापती बहादूरखानानं जोराचा प्रतिकार केला, तेव्हा स्वराज्याचं सैन्य माघार घेऊ लागलं, हे पाहून मोगली सैन्यानं पाठलाग सुरू केला. हा पाठलाग फार दूरपर्यत गेल्यावर मराठी सैन्याच्या दबा धरून बसलेल्या मोठ्या तुकडीनं या गडावर हल्ला केला. बहादूरखानाचं सैन्य मराठ्यांच्या लहान तुकडीचा पाठलाग करत गेल्यामुळे फारसा प्रतिकार झाला नाही.
परिणामी भरघोस लूट करण्यात मराठ्यांना यश आलं. या लुटीत दोनशे जातीवंत घोडे मिळाले जे औरंगजेबाला भेट देण्यासाठी बहादूरखानानं आणले होते. सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती स्वराज्यासाठी मिळाली. दमलेला बहादूरखान मराठ्यांचा पाठलाग करायचा सोडून पेडगावला आला. गडाची लूट पाहून तो धास्तावला.
गनिमी काव्याचा धडा खान ए जहान बहादूरखानाला शिकायला मिळाला होता.
तेव्हा पासून अतिशहाणपणा करणाऱ्याला "पेडगावचा शहाणा" असं म्हणण्यात येऊ लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
23 likes
16 shares