❤🚩शिवभक्त🚩❤
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१४ ऑगस्ट इ.स.१६४९*
*पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....*
*शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ ऑगस्ट इ.स.१६५७*
*"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ ऑगस्ट इ.स.१६६०*
*शास्ताखानाने किल्ले चाकणवर सुरुंगामार्फत हल्ला केला, किल्ल्याचा बुरुज ढासळला व लढाईस तोंड फुटले.*
*राजं तीकडं पन्हाळ्यावर अडकून पडल्याती, इकडे या खानाने रयतेत डुकरावाणी हैदोस घातलायती त्यामुळे रसद मिळत न्हाय किल्लेदार. बातमी घेऊन आलेल्या नाईकांच्या माणसाने फिरांगोजीना बातमी दिली. स्वराज्य दुहेरी संकटात सापडले होते विजापुरी सरदार सिद्दी जौहर. पन्हाळ्याला वेडा देऊन बसला होता, आणि औरंगजेबाचा मामा शास्ताखानाने चाकणच्या संग्रामदुर्गाला वेटोळे मारले होते. पुण्यापासून चाकण पावेतो सर्व भाग शास्ताखानाने व्यापला होता. त्यामुळे चाकण किल्ल्याला (किल्लेदार-फिरांगोजींना). मदत मिळत नव्हती. राजगडावर जिजाऊ साहेब चिंतेत होत्या. शास्ताखानास संग्रामदुर्गाला वेढा देऊन ५०चे वर दिवस झाले होते. पण किल्ला तो वश होत नव्हता. जमिनीवरील हा किल्ला, किल्ला किल्ला तो कसला ती एक गढीच. जास्तीत जास्त ४०० - ५०० मावळे राहू शकतील एवढे ते आवार, हा छोटेखानी एक दिवसात घेऊ याच ऐटीत २१ जून १६६० रोजी खानाने वेढे दिले पण किल्ल्यातील मराठ्यांनी मोगलांशी एकाकी झुंज मांडली होती. मराठ्यांचे धैर्य तिळमात्र ही कमी झाले नव्हते. किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, हा माणूस इतके दिवस तग धरून होता. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती. अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. "या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे". एक दिवस त्याने आपल्या शामियान्यात प्रमुख सरदारांसमवेत एक गुप्त मसलत केली. बेत ठरला किल्ल्याच्या एका बुरुजापर्यंत गुप्त सुरंग खोदून त्यात दारू भरायची आणि बार उडवून टाकायचाअसा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे ते काम मात्र मोगल सैनिकांनी अतिशय शिस्तीत केले. किल्ल्यातील मराठ्यांना याची काडीमात्र खबर नव्हती. मंगळवार दि. १४ ऑगस्ट १६६०. रोजी सुरुंगात दारूगोळा भरला आणि आणि दिली वात पेटवून सुरसुर करत ती वाताडी पेटत बुरुजाच्या दिशेने निघाली. आणि क्षणार्धात एकच धमाका उडाला. बुरुजावरील मराठे आकाशात उडाले. हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली. खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. खानच्या सैन्यास ते पुढे सरकू देत नव्हते. मारःयान्नाचा आवेश एवढा विलक्षण होता की, अशा विपरीत व प्रतिकूल स्थितीतही पुढे येण्याची हिंमत नव्हती. उण्यापुर्या ३०० ते ५०० मावळ्यांनी २०००० पेक्षा जास्त सैन्याला समोरासमोरच्या युद्धातही १२ तासांपेक्षा जास्त वेळ. थोपवून ठेवले. शमसुद्दीन खान व राव भावसिंह यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण मराठ्यांनी या दिवशी संग्रामदुर्ग हातातून जाऊन दिला नाही. पराक्रमाची शर्थ व प्रयत्नांची शिकस्त करूनही आता मराठा लढू शकत नव्हता अन् समोरून येणारा. लोंढा कमी होत नव्हता. राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी' जणू हे शब्दच फिरांगोजींना आठविले असावेत. आणि म्हणूनच फिरंगोजी नरसाळा यांनी भावसिहांच्या मध्यस्तीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला तरी राजे फिरांगोजींवर नाराज झाले नाहीच उलट आनंदाने, त्यांची पाठ थोपटून त्यांचे सांत्वन केले आणि भूपाळगडाची किल्लेदारी राजेंनी फिरांगोजीस बहाल केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ ऑगस्ट इ.स.१६६६*
*शिवाजीराजांची 'मिठाई'*
*तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'*
*औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.*
*ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.*
*याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच, शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.*
*औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व संभाजी एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.*
*महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, शिवाजीराजे, संभााजीराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ ऑगस्ट इ.स.१६७९*
*खांदेरी किल्ला बांधकामास सुरुवात*
*जंजिऱ्याचा सिद्दी आणि इस्ट इंडिया कंपनीचे मराठ्यांविरोधात कायमच सख्य असे. या दोन रिपु सत्तांमध्ये पाचर मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १४ ऑगस्ट १६७९ रोजी खांदेरी वर किल्ला बांधयास सुरुवात केली. यावरून मराठे आणि इस्ट इंडिया कंपनीमध्ये नाविक युद्ध भडकले.*
*हे युद्ध जानेवारी १६८० पर्यंत चालू होते. सिद्दी व इंग्रज या दोन्ही आरमाराना तोंड देत देत अखेर मराठ्यांनी खांदेरी बेट जिंकलेच व तिथे किल्ला बांधला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜