❤🚩शिवभक्त🚩❤
4K views • 8 hours ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२ ऑगस्ट इ.स.१६७७*
*आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लपाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगंडापुराम ला आले.शेरखान पठाणाच्या या मुख्य ठाण्याचा भुईकोट किल्ला जिंकून महाराजानी तिथे यशवंतराव कदम यांना नामजाद केले.३०जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला.या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगंडापुरम सोडून तुंदुमगुर्ती ला आले.तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या एलवनसुर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली.महाराज मात्र आपण स्वतः वृद्धाचलम च्या मंदिरात शिवदर्शन करण्यास गेले.मराठी सैन्याने व्यंकोजीराजेंचे वेलवान्सोर हे ठाणे घेतले ती तारीख होती २ ऑगस्ट १६७७*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ ऑगस्ट इ.स.१६८०*
*दि.५ मे १६८० च्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते.विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता.त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ ऑगस्ट इ.स.१६८०*
*डिचोलीच्या मराठी सुभेदाराने बारदेश मधील सिओलीम गाव लुटले. २ ऑगस्ट इ.स.१६८० ५ मे १६८० दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही छत्रपती संभाजीराजेंना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ ऑगस्ट इ.स.१६८१*
*(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार मंगळवार)*
*सिद्दी संबळने जंजिऱ्याचा बंदोबस्त वाढविला.*
*सध्या सिद्दी व इंग्रजांचेही बिनसले होते. मात्र हे सिद्दी व इंग्रज दोघे सुद्धा सागरी सर्प आपल्या भक्षासाठी सदैव त्यांचा संचार सागरात अविरत सुरू असे अशातच सिद्दी संबळचा मुलगा सिद्दी मिस्त्री हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारात दाखल झाला. त्यामुळे मनातून हादरलेल्या सिद्दीने जंजिऱ्याचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ ऑगस्ट इ.स.१७६०*
*२ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
36 shares