Suraj Chavan
595 views • 12 hours ago
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
📜 १८ जुलै इ.स.१६७२
छत्रपती शिवरायांनी जाधवरावांचा पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले.
📜 १८ जुलै इ.स.१६८१
(श्रावण शुद्ध त्रयोदशी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार सोमवार)
छत्रपती संभाजी महाराजांचा उंदेरीवर हल्ला!
इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत व उंदेरीवर राहून सिद्दी मराठी मुलखाची नासधूस करत असल्यामुळे सिद्दीकडून उंदेरी घ्यायचे छत्रपती संभाजी महाराजांच्या मनात घोळत होते. मराठ्यांची २२ गलबते आणि ३ हजार नाविक दल नागोठण्यास सुसज्ज करून ठेवले होते. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी ६ महिन्याचा पगार आगाऊ देऊन ठेवला होता. व जो ही मोहीम यशस्वी करण्याची पराकाष्ठा करेल त्यांना २ शेर सोने बक्षीस द्यावयाचे, महाराजांनी कबूल केले. "जर सिद्दीला उंदेरीवरून हुसकावला आणि त्याला मुंबईतही थारा मिळाला नाही तर सिद्यांच्या हालचालींना पायबंद बसेल अशी महाराजांची अटकळ होती. त्यादृष्टीने पहाटे उंदेरीवर हल्ला केला. मराठे आणि सिद्दी पुर्ण एक प्रहर एकमेकांवर हल्ले करत होते. दोन्ही बाजूकडची पुष्कळ माणसे पकडली गेली. मात्र अखेर सिद्दीने कसाबसा हा हल्ला परतवून लावला.
📜 १८ जुलै इ.स.१६८३
शहाबुद्दीनखान आणि कासीमखान पावसाळा सुरू झाला तरी चिवटपणे किल्ले रामसेजला झुंजत होते. किल्ले रामसेजला वेढा अंदाजे १६८३ रोजी एप्रिल महिन्याच्या १६ तारखेपुर्वीच दिला असे वाटते. ११ जुलै इ.स.१६८३ त्यांनी किल्ले रामसेजला वेढा दिला. रामसेज किल्ल्याच्या दरवाज्याला सैनिक जाऊन भिडले. शहाबुद्दीनखान आणि बहादुरखान यांनी किल्ले रामसेजवर तुटून पडण्याचा जणू निर्धारच केला होता. हल्ला एवढ्या ताकदीचा होता की किल्ल्याच्या आत ४ माणसांना प्रवेश करता आला. दि. १८ जुलै इ.स.१६८३ जी माणसे किल्ल्याच्या आत शिरली, त्या सर्वांना मराठ्यांनी कंठस्नान घातले. येणारा प्रत्येक माणूस जखमी झाला. मराठ्यांपुढे मोगलांचे काही चालेना. अखेर शहाबुद्दीनखान याने आपला हात आखडता घेतला. त्यानंतर किल्ले रामसेजला छत्रपती संभाजी महाराजांकडून १ हजार सैन्याची कुमक आली. मुहंमद खलीलच्या तुकडीवर त्यांनी हल्ला केला. महासिंह करोदिया पण मराठ्यांवर तुटून पडला. मात्र शहाबुद्दीनखानाने पळ काढला.
📜 १८ जुलै इ.स.१७४८
शिवाजी महाराजांच्या काळात १६७०- ७२ दरम्यान हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. १८ जुलै १७४८) घरगड उर्फ गडगडा किल्ला शंकराजी केशव सबनीस यांनी घेतल्याचें समजते. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्सने हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी गडाला दोन दरवाजे असल्याचा उल्लेख येतो.
📜 १८ जुलै इ.स.१९४७
ब्रिटीश पार्लमेंटने 'इंडिया इनडिपेंडन्स अॅक्ट १९४७' मंजूर केला ज्याद्वारे भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्रे जन्माला आली.
📜 १८ जुलै इ.स.१९६९
अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी
(जन्म - १ ऑगस्ट १९२०)
प्रतिकुल परिस्थितीत हि जातीभेद,भांडवलदार,अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरुद्ध आपली लेखणी उगरणारे,लेखणीच्या जोरावर परिवर्तनाच्या चळवळीस ताकत देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी.
|| कडकडे डफावर थाप ||
|| तू शोषीतांचा मायबाप ||
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩शिवराय #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
17 likes
18 shares