Marathi Social Media
8K views • 1 days ago
२२ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांनी तातडीने सतर्क राहा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. २९ जुलै रोजी विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित बहुतांश महाराष्ट्रात यलो अलर्ट आहे. ३० जुलै रोजी जळगाव, चंद्रपूर, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असून भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर, साकोली आणि लाखनी तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
#⛈️'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा⚠️
• 59 shares